शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

माझ्यासाठी उदयनराजेंची मारामारी : रघुनाथराजे

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

फलटणमध्ये गौप्यस्फोट : दोन्ही राजे समोरासमोर येताच मिटेल संघर्ष; मठाचीवाडी येथील कार्यक्रमात भावनिक आवाहन

सातारा : सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकरांचे घराणे या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही घराण्यातील नातेसंबंध साडेचारशे वर्षांपासूनचे आहेत. सध्या या दोन घराण्यात जो राजेसंघर्ष सुरू आहे त्याचा नात्यांवर परिणाम होत आहे. राजकारण क्षणिक आहे. उदयनराजेंनी माझ्यासाठी पूर्वी मारामारी केली होती. त्यांचे माझ्यावर प्रेम असून राजकारणासाठी मी उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुखावणार नाही, असे भावुक उद्गार रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ‘राजेसंघर्ष’ सुरू असून यानिमित्तानं आता राजे घराण्यांतील दोस्तानाही समोर आला आहे. मठाचीवाडी, ता. फलटण येथील एका सत्कार समारंभात ते बोलत होते. जिल्ह्यात सध्या खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषद सभापती रामराज नाईक-निंबाळकर यांच्यात जी शाब्दिक चकमक सुरू आहे त्याअनुषंगाने बोलताना रघुनाथराजे यांनी याबाबत खंत व्यक्त केली.रघनाथराजे म्हणाले, ‘राजकारणामुळे उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुरावतात, त्यामुळे यापुढे प्रेमाच्या माणसांना एकही शब्द बोलणार नाही. दोन्ही घराण्याचे साडेचारखे वर्षांपासूनचे नातेसंबंध आहेत. आजपर्यंतच्या तेरा पिढ्यांमध्ये नऊवेळा दोन्ही घराण्यात नातेबंध प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही घराण्याला जाज्वल्य इतिहास आहे. केवळ क्षणिक राजकारणासाठी या नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे दोघे जोपर्यंत समोरासमोर येत नाहीत, तोपर्यंत दोघांमधील वैचारिक मतभेद संपणार नाहीत आणि आरोप-प्रत्यारोपांचे हे बॅडमिंटन असेच सुरूच राहणार आहे. या राजेसंघर्षाला पूर्णविराम मिळाला पाहिजे. मठाचीवाडी येथील स्वप्नील भोसले यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आरटीओपदी निवड झाली आहे. यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते स्वप्नील भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेलसध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेलसध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.