शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

माझ्यासाठी उदयनराजेंची मारामारी : रघुनाथराजे

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

फलटणमध्ये गौप्यस्फोट : दोन्ही राजे समोरासमोर येताच मिटेल संघर्ष; मठाचीवाडी येथील कार्यक्रमात भावनिक आवाहन

सातारा : सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकरांचे घराणे या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही घराण्यातील नातेसंबंध साडेचारशे वर्षांपासूनचे आहेत. सध्या या दोन घराण्यात जो राजेसंघर्ष सुरू आहे त्याचा नात्यांवर परिणाम होत आहे. राजकारण क्षणिक आहे. उदयनराजेंनी माझ्यासाठी पूर्वी मारामारी केली होती. त्यांचे माझ्यावर प्रेम असून राजकारणासाठी मी उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुखावणार नाही, असे भावुक उद्गार रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ‘राजेसंघर्ष’ सुरू असून यानिमित्तानं आता राजे घराण्यांतील दोस्तानाही समोर आला आहे. मठाचीवाडी, ता. फलटण येथील एका सत्कार समारंभात ते बोलत होते. जिल्ह्यात सध्या खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषद सभापती रामराज नाईक-निंबाळकर यांच्यात जी शाब्दिक चकमक सुरू आहे त्याअनुषंगाने बोलताना रघुनाथराजे यांनी याबाबत खंत व्यक्त केली.रघनाथराजे म्हणाले, ‘राजकारणामुळे उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुरावतात, त्यामुळे यापुढे प्रेमाच्या माणसांना एकही शब्द बोलणार नाही. दोन्ही घराण्याचे साडेचारखे वर्षांपासूनचे नातेसंबंध आहेत. आजपर्यंतच्या तेरा पिढ्यांमध्ये नऊवेळा दोन्ही घराण्यात नातेबंध प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही घराण्याला जाज्वल्य इतिहास आहे. केवळ क्षणिक राजकारणासाठी या नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे दोघे जोपर्यंत समोरासमोर येत नाहीत, तोपर्यंत दोघांमधील वैचारिक मतभेद संपणार नाहीत आणि आरोप-प्रत्यारोपांचे हे बॅडमिंटन असेच सुरूच राहणार आहे. या राजेसंघर्षाला पूर्णविराम मिळाला पाहिजे. मठाचीवाडी येथील स्वप्नील भोसले यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आरटीओपदी निवड झाली आहे. यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते स्वप्नील भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेलसध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेलसध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.