शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाल यात्रेतील कोट्यावधींची उलाढाल यंदा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST

उंब्रज : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा दरवर्षी लाखो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा ...

उंब्रज : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा दरवर्षी लाखो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली. परिणामी, गर्दी झाली नाही. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला; पण याचा फटका येथील अर्थकारणाला बसला. यात्रा कालावधीत होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली.

यात्रा दरवर्षी सर्वत्र मोठ्या उल्हासात साजऱ्या होतात. या पाठीमागे भाविकांची श्रद्धा असते. या श्रद्धेने ते मोठ्या उत्साहात यात्रेत सामील होतात. ज्या ठिकाणी गर्दी होते, मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी गर्दीच्या सर्व प्रकारच्या गरजा, सेवा पुरवणारे व्यवसाय आपोआप थाटले जातात. त्यामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यात्रा ही त्या परिसरातील अर्थकारणाचे मोठे निमित्त असते.

पाल यात्रेचा विचार केला तर यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांतून लाखो भाविक येतात. या भाविकांच्या प्रवासाचा खर्चच कोट्यवधी रुपयांचा होतो. यामध्ये एस.टी. महामंडळाच्या गाडीने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या तिकिटातून दरवर्षी महामंडळ लाखो रुपये आर्थिक फायद्यात असते. याचबरोबर या भाविकांच्या जेवणखाण्यावरही लाखो रुपयांची उलाढाल होत असते. फक्त पाल नव्हे तर महामार्गापासून पालपर्यंत येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील हॉटेल, ढाबे या कालावधीत तुडुंब असतात. हे चित्र यंदा दिसले नाही.

पालमधील वाळवंटात खाद्यपदार्थांसह विविध प्रकारची शेकडो दुकाने थाटली जातात. त्यामध्ये टुरिंग टॉकीज, तमाशाचे फडही लागतात. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका दुकानाची आर्थिक उलाढाल लाखाहून अधिक रुपयांची होत असते; तर करमणुकीचे थिएटर कायम हाऊसफुल्ल दिसून येत असल्यामुळे तेथील उलाढालही लाखोंच्या घरात जाते. या यात्रेचे विशेष म्हणजे मिरवणुकीवर पिवळा भंडारा व खोबऱ्याचे तुकडे यांची मोठ्या प्रमाणात उधळण होते. शेकडो पोती भंडारा व खोबरे यांची येथे विक्री होते. हे विक्री करणारे लोक स्थानिक व परिसरातील असतात. त्यांनाही या व्यवसायातून आर्थिक फायदा होत असतो. अशा पद्धतीने किरकोळ व्यवसायातून स्थानिक व परिसरातील व्यावसायिक यांची या यात्रेच्या निमित्ताने आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, यंदा एक रुपयाचीही उलाढाल येथे झाली नाही.

- चौकट

ग्रामपंचायतीलाही करही नाही !

या शेकडो व्यावसायिकांकडून ग्रामपंचायत प्रशासन कर गोळा करते. त्यातून ग्रामपंचायतीचाही मोठा आर्थिक फायदा होत असतो. असे अर्थचक्र या यात्रेच्या निमित्ताने या परिसरात मोठ्या प्रमाणात फिरत असते. यावर्षी ते पूर्णपणे थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता म्हणून यात्रेला बंदी घातली, ती योग्य होतीच; पण कोरोनाने या परिसरात यात्रेनिमित्त होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबवली, हे मात्र नक्की.