शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ग्रामीण भागातील युवकांची ‘स्मार्ट फोन’साठी मोलमजुरी

By admin | Updated: May 22, 2014 00:21 IST

व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसाठी धडपड : काहीही करण्याची तयारी

 विशाल गुजर, परळी : दिवसेंदिवस शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असताना ग्रामीण भागात इंटरनेट वापरणार्‍या युवकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. पालकांकडून काहीही कारणे सांगून किंवा इतर उलाढाली करून युवक अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल खरेदीसाठी मोलमजुरी करत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी इंटरनेटचा निकाल आणि इतर माहिती मिळविण्यासाठी शहरात इंटरनेट कॅफेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नव्हता. सायबर कॅफेत तासन्तास चॅटिंग करणार्‍या युवक-युवतींही आता घरबसल्या मोबाईलवरती दहा रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतचे रिचार्ज मारून तो संपेपर्यंत चॅटिंग करण्यात मग्न आहेत. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसाठी चांगला मोबाईल असावा, असे प्रत्येक युवक-युवतीला वाटत असल्याने अगदी पालकांना काहीही कारणे सांगून तसेच युवक वर्ग गवड्यांच्या हाताखाली मोलमजुरी, हमाली, बिगारी काम, शेतकर्‍यांच्या शेतातील कामे करून कोणाकडूनही पैसे उसणे घेऊन, ओळखीच्या मोबाईल शॉपीमधून मित्राकडून हप्त्यावर मोबाईल खरेदी करत आहेत. नेटच्या साह्याने, व्हॉटस्अ‍ॅपच्या मदतीने कोणाचाही फोटो, कशाही पद्धतीने करून कोठेही पाठवत आहेत. दिवस असो वा रात्र फोटो चांगले येत असल्याने मोबाईलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ‘टूजी’ नंतर आता ‘थ्रीजी’ची क्रेझसुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ग्रामीण भागात, खोर्‍यात, दर्‍यात ज्या कोणत्या कार्डच्या कंपनीला जास्त रेंज व नेटस्पीड आहे, त्याची मागणीही वाढत आहे. ग्रामीण वातावरणही हायटेक झाल्याचे चित्र आहे.