शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने दिला कोविड रूग्णांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि त्यामुळे शरिरावर होणारे विपरीत परिणाम पाहता, अनेकांनी कोविड काळात आयुर्वेदाला प्राधान्य दिले. अनेक रूग्णांनी महिनाभर उपचार घेऊन कोविडमुक्तीची वाट स्वीकारल्याचीही उदाहरणे आहेत. साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने या काळात रूग्णालयांवरील ताण कमी करण्याबरोबरच रूग्णांमध्ये सकारात्मकताही तयार केली.

गतवर्षापासून कोविडने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. नोव्हेंबरनंतर कोविड आटोक्यात येतोय, असे वाटत असतानाच दुसऱ्या लाटेने हैदोस मांडला. बाधितांबरोबरच मृतांचा आकडा वाढू लागल्याने सर्वांनीच कोरोनाची धास्ती घेतली. त्यानंतर सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेली व्यक्ती कोविड रूग्ण म्हणूनच तपासा, असे जिल्हा प्रशासनानेही सूचित केले. त्यामुळे रूग्णांवर इंजेक्शन आणि औषधांचा मारा होऊ लागला. याचे गंभीर दुष्परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर अनेकांनी आयुर्वेदीय उपचाराकडे मोर्चा वळवला.

आयुर्वेदात वेगवेगळे औषधी कल्प, काढे, चुर्णांचा वापर प्रभावी पध्दतीने होतो. रसौषधीसारख्या प्रभावी वापराने रूग्णांमध्ये लवकर आराम मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ५ दिवसात सर्दी, घशात खवखव, घसा दुखणे, अंग दुखणे, थकवा, मंद ताप ही लक्षणे कमी-अधिक प्रमाणात आढळतात.

चौकट :

आठवडा ते महिन्याचाही कालावधी!

प्रचलित उपचार पध्दतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला औषधांचे तेच डोस दिले जातात. वयोमानाच्या हिशेबाने एखादी गोळी कमी-अधिक सोडली तर बहुतांशी एकसारख्याच गोळ्या दिल्या जात आहेत. याउलट आयुर्वेदीय उपचारात रूग्णाचे वय, प्रकृती, शारीरिक दोष या सर्वांचा विचार आणि अभ्यास करून मगच उपचार दिले जातात. त्यामुळे प्रत्येक रूग्णाला त्याच्या शरिराच्या गरजेनुसार दुष्परिणाम होणार नाहीत, याचा विचार करून मगच औषधे दिली जातात. त्यामुळे कमी लक्षणं असलेला रूग्ण एका आठवड्यात बरा होतो तर अधिक लक्षणे असलेल्या रूग्णाला बरे व्हायला महिन्याचा कालावधी जातो. हा कालावधी मोठा वाटत असला, तरीही रूग्णांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय बरे वाटत असल्याने हे उपचार सुखावह ठरत आहेत.

कोट :

कोविड काळात अनेकांना आयुर्वेद उपचारांचे महत्त्व लक्षात आले आहे. या कठीण काळात आयुर्वेद आशेचा किरण ठरला आहे. भारतीय वैद्यकशास्त्र या कोरोना महामारीच्या संकटात स्वत:ला सिध्द करत आहे. आता गरज आहे ती शासनाची आणि समाजाची आयुर्वेद उपचार पध्दतीकडे सकारात्मकतेने पाहण्याची.

- वैद्य संतोष महाडिक, सातारा