शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने दिला कोविड रूग्णांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि त्यामुळे शरिरावर होणारे विपरीत परिणाम पाहता, अनेकांनी कोविड काळात आयुर्वेदाला प्राधान्य दिले. अनेक रूग्णांनी महिनाभर उपचार घेऊन कोविडमुक्तीची वाट स्वीकारल्याचीही उदाहरणे आहेत. साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने या काळात रूग्णालयांवरील ताण कमी करण्याबरोबरच रूग्णांमध्ये सकारात्मकताही तयार केली.

गतवर्षापासून कोविडने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. नोव्हेंबरनंतर कोविड आटोक्यात येतोय, असे वाटत असतानाच दुसऱ्या लाटेने हैदोस मांडला. बाधितांबरोबरच मृतांचा आकडा वाढू लागल्याने सर्वांनीच कोरोनाची धास्ती घेतली. त्यानंतर सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेली व्यक्ती कोविड रूग्ण म्हणूनच तपासा, असे जिल्हा प्रशासनानेही सूचित केले. त्यामुळे रूग्णांवर इंजेक्शन आणि औषधांचा मारा होऊ लागला. याचे गंभीर दुष्परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर अनेकांनी आयुर्वेदीय उपचाराकडे मोर्चा वळवला.

आयुर्वेदात वेगवेगळे औषधी कल्प, काढे, चुर्णांचा वापर प्रभावी पध्दतीने होतो. रसौषधीसारख्या प्रभावी वापराने रूग्णांमध्ये लवकर आराम मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ५ दिवसात सर्दी, घशात खवखव, घसा दुखणे, अंग दुखणे, थकवा, मंद ताप ही लक्षणे कमी-अधिक प्रमाणात आढळतात.

चौकट :

आठवडा ते महिन्याचाही कालावधी!

प्रचलित उपचार पध्दतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला औषधांचे तेच डोस दिले जातात. वयोमानाच्या हिशेबाने एखादी गोळी कमी-अधिक सोडली तर बहुतांशी एकसारख्याच गोळ्या दिल्या जात आहेत. याउलट आयुर्वेदीय उपचारात रूग्णाचे वय, प्रकृती, शारीरिक दोष या सर्वांचा विचार आणि अभ्यास करून मगच उपचार दिले जातात. त्यामुळे प्रत्येक रूग्णाला त्याच्या शरिराच्या गरजेनुसार दुष्परिणाम होणार नाहीत, याचा विचार करून मगच औषधे दिली जातात. त्यामुळे कमी लक्षणं असलेला रूग्ण एका आठवड्यात बरा होतो तर अधिक लक्षणे असलेल्या रूग्णाला बरे व्हायला महिन्याचा कालावधी जातो. हा कालावधी मोठा वाटत असला, तरीही रूग्णांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय बरे वाटत असल्याने हे उपचार सुखावह ठरत आहेत.

कोट :

कोविड काळात अनेकांना आयुर्वेद उपचारांचे महत्त्व लक्षात आले आहे. या कठीण काळात आयुर्वेद आशेचा किरण ठरला आहे. भारतीय वैद्यकशास्त्र या कोरोना महामारीच्या संकटात स्वत:ला सिध्द करत आहे. आता गरज आहे ती शासनाची आणि समाजाची आयुर्वेद उपचार पध्दतीकडे सकारात्मकतेने पाहण्याची.

- वैद्य संतोष महाडिक, सातारा