शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने दिला कोविड रूग्णांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनावर प्रचलित उपचार पध्दतीतही ठोस उपचार नाहीत. मात्र, प्रचलित उपचारांमध्ये औषधांचा अतिरिक्त वापर आणि त्यामुळे शरिरावर होणारे विपरीत परिणाम पाहता, अनेकांनी कोविड काळात आयुर्वेदाला प्राधान्य दिले. अनेक रूग्णांनी महिनाभर उपचार घेऊन कोविडमुक्तीची वाट स्वीकारल्याचीही उदाहरणे आहेत. साईडइफेक्टमुक्त आयुर्वेदाने या काळात रूग्णालयांवरील ताण कमी करण्याबरोबरच रूग्णांमध्ये सकारात्मकताही तयार केली.

गतवर्षापासून कोविडने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. नोव्हेंबरनंतर कोविड आटोक्यात येतोय, असे वाटत असतानाच दुसऱ्या लाटेने हैदोस मांडला. बाधितांबरोबरच मृतांचा आकडा वाढू लागल्याने सर्वांनीच कोरोनाची धास्ती घेतली. त्यानंतर सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेली व्यक्ती कोविड रूग्ण म्हणूनच तपासा, असे जिल्हा प्रशासनानेही सूचित केले. त्यामुळे रूग्णांवर इंजेक्शन आणि औषधांचा मारा होऊ लागला. याचे गंभीर दुष्परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर अनेकांनी आयुर्वेदीय उपचाराकडे मोर्चा वळवला.

आयुर्वेदात वेगवेगळे औषधी कल्प, काढे, चुर्णांचा वापर प्रभावी पध्दतीने होतो. रसौषधीसारख्या प्रभावी वापराने रूग्णांमध्ये लवकर आराम मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ५ दिवसात सर्दी, घशात खवखव, घसा दुखणे, अंग दुखणे, थकवा, मंद ताप ही लक्षणे कमी-अधिक प्रमाणात आढळतात.

चौकट :

आठवडा ते महिन्याचाही कालावधी!

प्रचलित उपचार पध्दतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला औषधांचे तेच डोस दिले जातात. वयोमानाच्या हिशेबाने एखादी गोळी कमी-अधिक सोडली तर बहुतांशी एकसारख्याच गोळ्या दिल्या जात आहेत. याउलट आयुर्वेदीय उपचारात रूग्णाचे वय, प्रकृती, शारीरिक दोष या सर्वांचा विचार आणि अभ्यास करून मगच उपचार दिले जातात. त्यामुळे प्रत्येक रूग्णाला त्याच्या शरिराच्या गरजेनुसार दुष्परिणाम होणार नाहीत, याचा विचार करून मगच औषधे दिली जातात. त्यामुळे कमी लक्षणं असलेला रूग्ण एका आठवड्यात बरा होतो तर अधिक लक्षणे असलेल्या रूग्णाला बरे व्हायला महिन्याचा कालावधी जातो. हा कालावधी मोठा वाटत असला, तरीही रूग्णांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय बरे वाटत असल्याने हे उपचार सुखावह ठरत आहेत.

कोट :

कोविड काळात अनेकांना आयुर्वेद उपचारांचे महत्त्व लक्षात आले आहे. या कठीण काळात आयुर्वेद आशेचा किरण ठरला आहे. भारतीय वैद्यकशास्त्र या कोरोना महामारीच्या संकटात स्वत:ला सिध्द करत आहे. आता गरज आहे ती शासनाची आणि समाजाची आयुर्वेद उपचार पध्दतीकडे सकारात्मकतेने पाहण्याची.

- वैद्य संतोष महाडिक, सातारा