शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

सात कारखाने बंद; उर्वरित महिनाभर सुरू

By admin | Updated: April 6, 2016 00:23 IST

३ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक : कडक उन्हाचा होतोय गाळपावर परिणाम

वाठार स्टेशन : वाढत्या साखर कारखानदारीमुळे यंदाच्या ऊस गाळप हंगामाचा समारोप एप्रिलअखेर होत आहे. वेळेत सुरू झालेल्या साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत जवळपास ७३ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सात कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहे. तर शिल्लक ३ लाख मेट्रिक टन ऊस तोडण्याचे आव्हान उरलेल्या सात कारखान्यांपुढे आहे. ३० एप्रिलपर्यंत या संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण होईल, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली आहे. या हंगामात उसाचे क्षेत्र गेल्यावर्षी एवढेच असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप मेअखेर पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती व पावसाने ओढ दिल्याने उसाचे सरासरी उत्पादनही कमी झाले आहे. या हंगामात दोन नवीन कारखानेही सुरू झाल्याने ऊस गाळपाचा वेग वाढला. याचाच परिणाम म्हणून या हंगामात वेळेत उसाचे क्षेत्र संपवण्याचे काम झाले. शिल्लक ऊसही महिन्याभरात संपवण्याचे काम कारखान्याकडून पूर्ण होईल; परंतु सद्य:स्थितीत वाढत्या उन्हाचा परिणाम ऊसतोडणी यंत्रणेवर होत आहे. बहुतांशी कारखाने क्षमतेपेक्षा कमी गाळप करू लागले आहेत. ऊसतोड मजुरांनाही आता परतीचे वेध लागल्यामुळे हे मजूर ऊस पेटवूनच आता तोड करू लागले आहेत.जिल्ह्यात गेल्या वर्षीपर्यंत १३ कारखाने गाळप करत होते. या हंगामात स्वराज व शरयू हे दोन कारखाने नव्याने सुरूझाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली. आत्ता अंतिम टप्पा किसन वीर कारखान्याच्या पुढाकाराने खंडाळा तालुक्यातील कारखान्याचाही चाचणी गाळप हंगाम आता सुरू होणार आहे. पुढील वर्षी जिल्ह्यात १६ कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज होणार आहेत.हा हंगाम यशस्वी ठरला असला तरी पुढील गाळप हंगाम मात्र कारखान्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे. पुढील हंगामात सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका उसाच्या पिकावर बसला आहे. काही तालुके वगळता अनेक तालुक्यांत आडसालीखालील लागण क्षेत्र अत्यल्प आहे. सध्याचा खोडवा ठेवण्यास शेतकरी तयार नसल्याने पुढील हंगामात उसाची सर्वात मोठी पळवापळवी होणार आहे. यात जे कारखाने या हंगामात समाधानकारक दर देतील त्यानांना पुढील हंगामात ऊस घालण्याची मानसिकता शेतकऱ्यांची राहणार आहे. (वार्ताहर)लवकर तोडीसाठी फड पेटविलेदिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने ऊसतोडणीचे कामगारांचे हाल होऊ लागले आहे. यामुळे पहाटेच्या सुमारासच हे मजूर शेतात जाऊन ऊसतोडणीचे काम करत आहेत. तर लवकर ऊसतोडण्यासाठी उभ्या उसालाच काडी लावण्याचेही प्रकार अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यातील ही परिस्थिती मात्र पुढील हंगामात शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार आहे. पुढील हंगामात कारखानदारांना शेतकऱ्याच्या घरी यावे लागणार आहे.