शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाण्याने तारले.. ..अवकाळीने मारले!

By admin | Updated: March 17, 2015 00:12 IST

फलटणमधील स्थिती : शेतकरी हवालदिल

आदर्की : फलटण तालुक्याच्या ८४ गावचा दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी युती शासनाने कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून धोम-बलकवडी प्रकल्पासाठी तालुक्याची एकहाती सत्तेचा वापर करून १५ वर्षांत फलटण तालुक्याचा दुष्काळी भागातील सालपे व उपळवेपर्यंत पाणी पोहचल्यामुळे पाण्याचा दुष्काळ हटला; परंतु गत आठवड्यात पडलेल्या पावसाने अवकाळी दुष्काळ पडला असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.शिवाजीराजे निंबाळकर, चिमणराव कदम, डॉ. कृष्णचंद्र भोईटे, हिंदुराव नाईक-निंबाळकर, सुभाषराव शिंदे यांनी पाणी प्रश्न सतत शासन दरबारी जीवंत ठेवल्यामुळे १९९५ मध्ये युती सरकारला कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना फलटण येथे येऊन कर्ज रोखेचा शुभारंभ केला. त्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडी धरणाचे काम व उजव्या कालव्यासाठी विशेष प्रयत्न केले. राज्य व केद्राकडून निधी उपलब्ध करून १७ बोगदे तेवढेच सेतू उभारून अशक्यप्राय पाणी उपळवे, बाणगंगेत पोहचल्याने पाण्याचा दुष्काळ अंतश: संपला; परंतु अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, मका, डाळींब, आंबा पिकावर घाला घातला अन् शेतकरी वर्गावर अस्मानी संकट कोसळले. पावसाची नोंद २० मि.मी. झाली. शासनाने पंचनामे केले. अवकाळी दुष्काळी पडल्याची चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)मालोजीराजेंचे विशेष प्रयत्न...फलटण तालुका स्वातंत्र्यपूर्ण काळात निसर्गाच्या लहरी पाण्यावर अवलंबून होता; परंतु पावसाळ्यात पाऊस पडतच होता; पण वर्षातील सहा महिनेच शेती पिकायची. फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी निरा उजवा कालव्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे फलटण शहराबरोबर तालुक्याचा उत्तरपूर्व भागातील शेती बागायती झाली. त्यानंतर उर्वरित ८४ गावाला दुष्काळी भागास पाणी मिळाले.