शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

सातारकरांनी सोमवारपर्यंत रात्रीचा प्रवास टाळाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एसटीची सेवा सुरू झाली असली तरी अद्याप रातराणीच्या फेऱ्या ठप्प आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस तरी सातारकरांनी रात्रीचा प्रवास करणे टाळणेच योग्य ठरणार आहे.

कोरोनाचा शिरकाव सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला. त्यानंतर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणले होते. सुमारे सहा ते सात महिने एसटीच्या फेऱ्या बंद होत्या. दरम्यानच्या काळात कोरोना नियंत्रणात आला. दसरा दिवाळीनंतर एसटी पूर्ववत सुरू झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्याने रात्रंदिवस चोवीस तास प्रवासी वाहतूक सुरू होती. मात्र जिल्ह्यात पुन्हा एप्रिलमध्ये पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. यामुळे पुन्हा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांचा ब्रेक लागला. दोन ते तीन महिने गाड्या गुन्हा बंद होत्या.

दरम्यान, दुसरी लाटही ओसरू लागल्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र अद्यापही हवे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने एसटीच्या रातराणी गाड्या बंद आहेत. सातारा आगारातून शेवटची गाडी साडेपाच वाजता निघते. त्यानंतर गाडीच नाही. दरम्यान, बाहेरील विभागातून कलेढोण-मुंबई ही गाडी रात्री नऊच्या सुमारास येते. कोल्हापूर, सांगली विभागातून एखाद-दुसरी गाडी येते. पण त्याचेही वेळापत्रक निश्चित नसल्याने रात्री बसस्थानकात शुकशुकाट जाणवत असतो.

चौकट..

पुणे, मुंबईलाही दुपारपर्यंत प्रवासी

सातारा विभागातून स्वारगेट, मुंबई, बोरवली या मार्गांवर बऱ्यापैकी प्रवासी वाहतूक सुरू असते. सातारा-स्वारगेट विनाथांबासाठी दररोज ५८ फेऱ्या धावतात. त्यापैकी तीस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र अजूनही दुपारच्या गाड्यांना प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे त्या रद्द करण्याची वेळ सातारा आगारातील व्यवस्थापनावर येत आहे.

चौकट २

खूपच गरज असेल तर महामार्गावर...

साताऱ्यातील खासगी प्रवासी गाड्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात उभारत असायच्या. मात्र तेथे जम्बो कोरोना सेंटर सुरू झाल्यानंतर तिथून थांबा हलविण्यात आला. तेव्हापासून एसटी स्टँडच्या पाठीमागे रस्त्यावर उभे राहतात. मात्र त्यांनाही प्रवासी मिळत नसल्याने तेथे रात्रीच्या वेळी शुकशुकाट जाणवत असतो. रात्रीचा प्रवास करणे खूपच अत्यावश्यक असल्यास काही सातारकर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जाऊन इतर जिल्ह्यातून येणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांचा वापर करत असतात.

कोट

सातारा विभागातून सध्या २२५ गाड्या दररोज धावत असतात. यामध्ये गाड्यांच्या फेऱ्याही वाढविल्या जात आहेत. मात्र दुपारनंतर प्रवासी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. तरीही सोमवार दि. २१ पासून प्रमुख आगारातून लांब फेऱ्यांसाठी रातराणी गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सातारकरांची चांगली सोय होणार आहे.

- सागर पळसुले,

विभाग नियंत्रक सातारा.

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या फेऱ्या

२२५

रातराणी फेऱ्या

००

चालक

२२५

रातराणी

००