शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

कासजवळ रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 2, 2015 00:06 IST

कुसुंबी मुरा : शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांचे नुकसान; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

कुडाळ : कास पठारावर बांधण्यात आलेल्या संरक्षक कुंपणामुळे रानडुकरांना रस्ताच मिळत नसल्यामुळे पठाराच्या बाजूच्या गावांमध्ये पंधरा ते वीस रानडुकरांने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. पठारावरील कुसुंबीमुरा येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे या रानडुकरांच्या कळपाने नुकसान केले आहे. नुकसान केलेल्या पिकांचा पंचनामा व्हावा व योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.कास पठरराला संरक्षक जाळीदार कंपाउंड असल्यामुळे रानडुकरांना वनविभागाच्या हद्दीत जाण्याचा मार्गच मिळत नसल्यामुळे अशी रानडुकरे आजूबाजूच्या गावात शिरून नुकसान करत आहेत. शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने हातातोंडाला आणलेल्या ज्वारी पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. कुसुंबीमुरा येथील शशिकांत आखाडे, ज्ञानेश्वरी आखाडे, किसन आखाडे, गणपत आखाडे या शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे या कळपाने नुकसान केले आहे. तसेच एकीव, एकीवमुरा, सह्याद्रीनगर, सांगवीमुरा, दंदमुरा या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान केले आहे.तरी महसूल विभागाने या शेतीपिकांची पाहणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्षवनविभागाचा कोणताही वनमजूर, वनकर्मचारी, कास पठाराच्या गावांमध्ये फिरकतदेखील नाही. तर गावकऱ्यांनी वन्यप्राण्यांची माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तरी वनविभागाने हा कळप जंगलव्याप्त भागात हुसकावून लावावा, अशी मागणी पठारावरील गावांमधील नागरिक करत आहेत. रानडुकरांनी ज्वारी पिकात शिरून नुकसान केले आहे. रात्री येणारी रानडुकरे आता तर दिवसांदेखील पिकांत शिरत असल्यामुळे शेतात जाण्याचीदेखील भीती वाटत आहे. -ज्ञानेश्वर आखाडे शेतकरी, कुसुंबीमुरा