शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

राहुरी कृषी विद्यापीठाच्या फुले, रेवती ज्वारी वाणांमुळे राज्यात क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST

सध्याच्या काळात शेती बेभरवशाची होत आहे. उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. असे आपण नेहमी ऐकतो. ज्याठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध ...

सध्याच्या काळात शेती बेभरवशाची होत आहे. उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. असे आपण नेहमी ऐकतो. ज्याठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत, अशा भागामध्ये शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे अधिक असतो. बरेच शेतकरी आले, हळद, भाजीपाला, फुले पिके यासारख्या नगदी पिकांकडे वळत आहेत.

राहुरी विद्यापीठाने रब्बी ज्वारीचे सुधारित वाण हे जमिनीच्या प्रतवारीनुसार वापरण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये भारी जमिनीसाठी फुले रेवती व वसुधा, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा व चित्रा तसेच हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली हुरडयासाठी फुले मधुर, लाह्यांसाठी फुले पंचमी यासारखे सुधारित वाण विकसित केलेले आहेत. शेतकऱ्यांना विद्यापीठाचे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, यासाठी कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्हयात विक्री केंद्र स्थापन केलेले आहेत. सातारा जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून दिले. २०२०-२१ रब्बी हंगामात यावर्षी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या पीक प्रात्यक्षिकातील शेतकऱ्यांना बोरगाव केंद्रामार्फत फुले रेवती या वाणाचे बियाणे तसेच बीजप्रक्रियेसाठी जिवाणू खते वितरित करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे पीक उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी माहितीपत्रके पुरविण्यात आली.

जावली तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे (रा. सोनगाव) यांनी हेक्टरी १०१ क्विंटल उच्चांकी उत्पादन घेऊन राज्यात रब्बी ज्वारी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. वरखडवाडी येथील शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.