शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

राहुरी कृषी विद्यापीठाच्या फुले, रेवती ज्वारी वाणांमुळे राज्यात क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST

सध्याच्या काळात शेती बेभरवशाची होत आहे. उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. असे आपण नेहमी ऐकतो. ज्याठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध ...

सध्याच्या काळात शेती बेभरवशाची होत आहे. उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. असे आपण नेहमी ऐकतो. ज्याठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत, अशा भागामध्ये शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे अधिक असतो. बरेच शेतकरी आले, हळद, भाजीपाला, फुले पिके यासारख्या नगदी पिकांकडे वळत आहेत.

राहुरी विद्यापीठाने रब्बी ज्वारीचे सुधारित वाण हे जमिनीच्या प्रतवारीनुसार वापरण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये भारी जमिनीसाठी फुले रेवती व वसुधा, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा व चित्रा तसेच हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली हुरडयासाठी फुले मधुर, लाह्यांसाठी फुले पंचमी यासारखे सुधारित वाण विकसित केलेले आहेत. शेतकऱ्यांना विद्यापीठाचे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, यासाठी कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्हयात विक्री केंद्र स्थापन केलेले आहेत. सातारा जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून दिले. २०२०-२१ रब्बी हंगामात यावर्षी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या पीक प्रात्यक्षिकातील शेतकऱ्यांना बोरगाव केंद्रामार्फत फुले रेवती या वाणाचे बियाणे तसेच बीजप्रक्रियेसाठी जिवाणू खते वितरित करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे पीक उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी माहितीपत्रके पुरविण्यात आली.

जावली तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे (रा. सोनगाव) यांनी हेक्टरी १०१ क्विंटल उच्चांकी उत्पादन घेऊन राज्यात रब्बी ज्वारी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. वरखडवाडी येथील शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.