शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे गुणदान विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. अकरावीकडे बहुतांश विद्यार्थ्यांनी रेस्ट इयर म्हणून बघितल्याने यंदा विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शिक्षक मात्र विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचा सल्ला देत आहेत.

बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाच्या दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा आमच्या गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या फॉर्म्युल्यानुसार अकरावी विद्यार्थ्यांचा घात करेल असे त्यांना वाटते आहे. शैक्षणिक तज्ज्ञांच्या मतेही विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात, पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांची यामुळे अडचण होणार आहे, विद्यार्थ्यांत भीती आहे, पण अकरावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

कोट

शिक्षक काय म्हणतात

फॉर्म्युल्यानुसार दहावीतील बेस्ट ऑफ ३ ची सरासरी घ्यायला सांगितली. त्यानुसार दहावीत ज्या मुलाला ६० टक्के असेल आणि ३ विषयांत चांगले गुण असतील, तर त्याच्या गुणांच्या सरासरी आधारावर बारावीचे मूल्यांकन करायचे आहे. त्यामुळे बारावीत विद्यार्थ्यांचे गुण कमी न होता वाढणार आहेत.

- विशाल ढाणे, खासगी क्लास चालक.

बहुतांश विद्यार्थी अकरावीला रेस्ट म्हणून बघतात, पण कोरोनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. मंडळाने दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार अकरावीच्या गुणालाही महत्त्व आले आहे. विद्यार्थी नापास होणार नाही, पण अकरावीच्या गुणांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर काहीसा परिणाम होईल.

- प्रा. डॉ. चंद्रकांत माने, पाटण.

विद्यार्थी काय म्हणतात

आमच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीची तयारी सुरू होते. त्यासाठी नाही म्हटलं तरी अकरावीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा परिणाम गुणांवरही होतो, पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो, अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे, पण बोर्डाने दिलेल्या फॉर्म्युलामुळे आमचे नुकसान होणार अशी भीती वाटते.

-

कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. हे विद्यार्थीहिताचे आहे. दहावीला चांगले गुण होते. मात्र, अकरावीकडे बारावीच्या तयारीत दुर्लक्ष केले. दहावीच्या गुणांना थोडे अधिक महत्त्व देत त्याचे ५० टक्के गुण घेणे आवश्यक होते. त्यामुळे टक्केवारी घसरण्याची भीती राहिली नसती, पण सीईटीची संधी असल्याने पुढील परीक्षांच्या अभ्यासाची तयारी करणे आमच्या हातात आहे, ते आम्ही करू.

-

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी

सीबीएसई -

मुले :

मुली :

स्टेट बोर्ड

मुले :

मुली :