शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे गुणदान विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. अकरावीकडे बहुतांश विद्यार्थ्यांनी रेस्ट इयर म्हणून बघितल्याने यंदा विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शिक्षक मात्र विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचा सल्ला देत आहेत.

बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाच्या दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा आमच्या गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या फॉर्म्युल्यानुसार अकरावी विद्यार्थ्यांचा घात करेल असे त्यांना वाटते आहे. शैक्षणिक तज्ज्ञांच्या मतेही विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात, पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांची यामुळे अडचण होणार आहे, विद्यार्थ्यांत भीती आहे, पण अकरावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

कोट

शिक्षक काय म्हणतात

फॉर्म्युल्यानुसार दहावीतील बेस्ट ऑफ ३ ची सरासरी घ्यायला सांगितली. त्यानुसार दहावीत ज्या मुलाला ६० टक्के असेल आणि ३ विषयांत चांगले गुण असतील, तर त्याच्या गुणांच्या सरासरी आधारावर बारावीचे मूल्यांकन करायचे आहे. त्यामुळे बारावीत विद्यार्थ्यांचे गुण कमी न होता वाढणार आहेत.

- विशाल ढाणे, खासगी क्लास चालक.

बहुतांश विद्यार्थी अकरावीला रेस्ट म्हणून बघतात, पण कोरोनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. मंडळाने दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार अकरावीच्या गुणालाही महत्त्व आले आहे. विद्यार्थी नापास होणार नाही, पण अकरावीच्या गुणांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर काहीसा परिणाम होईल.

- प्रा. डॉ. चंद्रकांत माने, पाटण.

विद्यार्थी काय म्हणतात

आमच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीची तयारी सुरू होते. त्यासाठी नाही म्हटलं तरी अकरावीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा परिणाम गुणांवरही होतो, पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो, अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे, पण बोर्डाने दिलेल्या फॉर्म्युलामुळे आमचे नुकसान होणार अशी भीती वाटते.

-

कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. हे विद्यार्थीहिताचे आहे. दहावीला चांगले गुण होते. मात्र, अकरावीकडे बारावीच्या तयारीत दुर्लक्ष केले. दहावीच्या गुणांना थोडे अधिक महत्त्व देत त्याचे ५० टक्के गुण घेणे आवश्यक होते. त्यामुळे टक्केवारी घसरण्याची भीती राहिली नसती, पण सीईटीची संधी असल्याने पुढील परीक्षांच्या अभ्यासाची तयारी करणे आमच्या हातात आहे, ते आम्ही करू.

-

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी

सीबीएसई -

मुले :

मुली :

स्टेट बोर्ड

मुले :

मुली :