शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाइकांच्या चौकशीने कोरोना रुग्णांचे होतेय खच्चीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कुटुंबात किंवा ओळखीच्यांमध्ये कोणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर फोनद्वारे होणाऱ्या चौकशीचा रुग्णांसह कुटुंबीयांनाही त्रास होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कुटुंबात किंवा ओळखीच्यांमध्ये कोणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर फोनद्वारे होणाऱ्या चौकशीचा रुग्णांसह कुटुंबीयांनाही त्रास होऊ लागला आहे. समाज माध्यमांद्वारे येणारी आणि खातरजमा न केलेली माहिती रुग्णांना सांगून त्यांना अधिक गोंधळात टाकण्याचे काम अनाहूतपणे होत आहे. त्यामुळे कोणालाही संसर्ग झाल्याची माहिती मिळाल्यास थेट फोन करण्यापेक्षा मेसेजद्वारे त्यांना दिलासा देण्याचे काम नातेवाइकांनी करावे. अनेकदा चौकशीसाठी आलेले फोन कोरोना रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचे पुढे येत आहे.

शतकातील सर्वात मोठा आजार म्हणून गणलेला कोरोनाने जवळपास प्रत्येक कुटुंबाला आपल्या मगरमिठीत घेतले आहे. कुटुंबातील एखादा सदस्य तरी पॉझिटिव्ह निघाल्याने आयसोलेशनसह सर्व बाबींना सामोरे जावं लागत आहे. जी कुटुंब छोट्याशा घरात राहतात त्यांच्या कुटुंबीयांना तर घर सोडून अन्यत्र राहण्याची वेळ येते. इतर आजारांमध्ये रुग्णाची सुश्रूषा करून त्याला दिलासा देण्याचा होणारा प्रयत्न या आजारात नसतो. त्यामुळे रुग्णाला एकाकी कोंडून घेऊन रहावे लागते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर धक्क्यात असलेला रुग्ण तर या आजाराच्या आणि एकटेपणाच्या विचारानेच घाबरून जातात. आपल्या कुटुंबाची होणारी फरपट पाहून ते स्वत:ला दोष देत असतात. वर्षानुवर्षे कुटुंबासह राहण्याची सवय असलेल्यांना एकाकीपण खायला उठते. यातून होणारा कोंडमारा रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवते. कोविड काळातील नकारात्मक विचार घालवून भविष्याची उमेद दाखवून रुग्णांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे.

चौकट :

फोनला उत्तर देण्यातच जातोय वेळ

कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती नातेवाइकांना समजल्यानंतर काळजीस्तव फोन केले जातात. कसं झालं, कुठं झालं, कोणाकोणाला झालं यासह काळजी घेण्यापर्यंतच्या गप्पा नातेवाईक मारतात. घरात कोरोनाचा रुग्ण असल्याने कुटुंबाची मानसिकता आधीच कोसळलेली असती. त्यात नातेवाइकांचे भरमसाठ फोन आणि उपदेशांमुळे कुटुंबीय त्रस्त होतात. दिवसभर येणाऱ्या फोनला उत्तर देताना तेच तेच बोललं गेल्यानेही मनावरील दडपण वाढतं. एकीकडे रुग्णाचे मनोबल वाढवत असताना त्यांच्या कुटुंबीयांनाही सकारात्मक उर्जेची आवश्‍यकता असते, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.

कोट :

समाजमाध्यमातून दणादण आदळणारी कोरोनाची माहिती खरी का खोटी याची खात्री कोणीच केली नाही. पण स्वत:ला या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ही सर्व माहिती रुग्णाच्या मनात फेर धरतेय. या काळात ताण असला तरीही खूप दिवसात जे केलं नाही, किंवा करायचं राहून गेलं अस वाटतयं ते करण्यात मन गुंतवलं तर कोविड काळ सुसह्य ठरू शकतो.

- डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ, सातारा

पॉईंटर

१. रुग्णांकडे फोन नकोच.

२. कुटुंबातील जबाबदार व्यक्तीने रुग्णाचे कॉल स्वीकारावेत.

३.निकटवर्तीयांचा ग्रुप करून त्याद्वारे आरोग्य माहिती द्यावी.

४.कोरोना किती भीतीदायक आहे, यापेक्षा तो बरा होऊ शकतो हे सांगा.

५. सरळठोक आलेल्या मेसेजचा भडिमार रुग्णांवर नको.

६. मानसिकरित्या खचलेल्या या रुग्णांना सकारात्मक विचार पोहोचवा.