शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

पाऊस अवकाळी.. द्राक्षबागांना अवकळा!

By admin | Updated: March 4, 2016 00:58 IST

कोट्यवधींचे नुकसान : गारांच्या मारामुळे द्राक्षे फुटली;

  युरोप देशातील निर्यातीवर परिणाम; मायणी भागात नुकसानीचे पंचनामे सुरू मायणी : मायणीसह परिसरातील गारुडी, हिवरवाडी, मुळीकवाडी, कलेढोण, आदी भागांमध्ये तीन दिवसांपासून पडत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे परिसरातील द्राक्षबागायती क्षेत्रासह जिरायत क्षेत्राचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे परदेशात जाणाऱ्या द्राक्षांचे प्रमाण घटल्यामुळे परकीय चलनावरच थेट परिणाम झालेला आहे. कलेढोण परिसरासह गारुडी, गारळेवाडी, मुळीकवाडी, कान्हरवाडी, पाचवड, तरसवाडी आदी भागामध्ये सुमारे ७०० ते ८०० एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. एक एकर द्राक्षबाग लागवडीसाठी साधारणत: तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. तसेच एक एकर युरोप (परदेशी) मार्केटमध्ये पाठविण्याचा खर्चही तीन ते चार लाख रुपये होत असतो. यामध्ये छाटणीपासून ते द्राक्षाच्या गाडीचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी लागणी, औषधे व इतर खर्चही मोठ्या प्रमाणात येत असतो. कमी पावसाचे प्रमाण असणाऱ्या या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीकडे आपला मोर्चा वळविला. यातून हजारो एकर क्षेत्र उभा राहिला; पण नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी पडण्यास सुरुवात होते. त्यावेळीपासून द्राक्ष तोडणी होईपर्यंत काही शेतकरी टँकरने पाणी पाजून बागा जगवत असतात. जे शेतकरी टँकरने पाणी देतात त्यांना आठवड्याला सुमारे दोन ते अडीच हजार खर्च होत असतो. अशा बिकट परिस्थितीत हे द्राक्ष क्षेत्र उभी राहत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. गारा पडल्यामुळे घडातील द्राक्षाचे मनी फुटले आहेत. यामुळे द्राक्षांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर अशी खराब द्राक्षे आता युरोपीय बाजारपेठेमध्ये जाऊ शकत नाहीत. गाराचा मार लागलेले द्राक्षाचे घड दोन ते तीन दिवसांमध्ये काळपट पडू लागतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही. ते द्राक्षाचे घड मनुका बनविण्यासाठीही चालत नाही व स्थानिक बाजारपेठेतही त्याला ग्राहक मिळत नाही. जर एक एकर क्षेत्रातील १५ टन द्राक्षे परकीय बाजारपेठेत सरासरी ४० ते ५० रुपये दरानी गेली तरी एक एकर क्षेत्रात सुमारे सहा ते आठ लाखांपर्यंत परकीय चलन मिळू शकते. पण ती आशा आता संपली आहे. गारुडी व कलेढोण या दोन ठिकाणी द्राक्षांच्या बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. (वार्ताहर) ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची काढणी, मळणीचाही हंगाम सध्या सुरू आहे. अनेकांच्या शेतात ज्वारी, गहू उभे आहेत, तर काहींनी काढून खाली टाकलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या गहू-ज्वारीला २००० ते ३००० पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत असतो; पण जर हे धान्य भिजले तर लाल व पांढरे पडण्याची शक्यता असते. ज्वारी व बाजरीपासून मिळणाऱ्या कडब्यावर येथील जनावरांचा वर्षाचा चारा प्रश्न मार्गी लागत असतो; पण अवकाळी पावसामुळेही जनावरांचा चारा प्रश्न उभा राहिलेला आहे, अशाप्रकारे या तीन-चार दिवसांच्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. द्राक्ष निर्यातीवर परिणाम युरोपीय बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्षाची डिसेंबर-जानेवारीपासूनच बागायतदारांची लगबग सुरू असते. व्यापारी येतात अन् मालाचे नमुने घेऊन जातात. त्यांच्याकडून सकारात्मकता दर्शविली गेल्यास दोन-तीन दिवसांत द्राक्षाची तोडणी सुरू होते. युरोप व स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येणाऱ्या द्राक्ष बागा जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चाळीस टक्के तोडणी अद्याप बाकी आजअखेर परिसरातील ६० ते ७० टक्के क्षेत्रातील द्राक्षांची तोडणी झालेली आहे. अजून ३० ते ४० टक्के क्षेत्रातील द्राक्षांची तोडणी बाकी आहे. एक एकर क्षेत्रातील साधारणपणे १० ते २० टनांपर्यंत द्राक्षे ही युरोपीय बाजारपेठेत जात असतात. यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलत मिळत असते.