शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

डोईवर हंडे.. पायाला चटके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

पेट्री : पश्चिमेस डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱ्याचे पाणी कमी होत पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण होऊन कुसुंबीमुरा ...

पेट्री : पश्चिमेस डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱ्याचे पाणी कमी होत पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण होऊन कुसुंबीमुरा (जावळी) येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. रात्री उंच कड्याकपारीत झऱ्याचे पाणी मिळवण्याच्या कसरतीतून पाय घसरूण विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेकडो जनावरांदेखील पाणीटंचाईच्या समस्येशी संघर्ष करावा लागत आहे.

कुसुंबीमुरा येथील २४ कुटुंबे असणाऱ्या आखाडेवाडीतील १५०-२०० लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना आतापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. ज्या झऱ्यातून पाणी टाकीत सोडले जात होते, त्या झऱ्याचेच पाणी कमी होऊ लागल्याने मागील आठवड्यात झऱ्यातून टाकीत आणण्याचा पाणीपुरवठा बंद झाला. सद्य:स्थितीला झऱ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन डोंगरातील एकूण तीन-चार झऱ्यांवर दोनशे-अडीचशे फूट खोल कड्यालगत झऱ्यावर रात्रं-दिवस पाणी भरण्यासाठी महिला, लहानगे, पुरुष मंडळी दिसत आहे.

डोंगरदरी, झाडा-झुडपांच्या मार्गाने छोट्या भांड्याने लहानगे, महिला, पाण्यासाठी धडपडत आहेत. पावसाळा सुरू व्हायला बराचसा कालावधी असून, वेळेत पडला तर ठीक अन्यथा पठारावरील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. अवकाळी पावसाने झऱ्याचे पाणी वाढले जात नसून पावसाळ्यातील पावसाने जेव्हा पठारावर पाणी साचून राहते तेव्हाच झऱ्याच्या पाण्यात वाढ होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थ शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत असून दिवसभर लहानगे भांडी घेऊन झऱ्यावर तळ ठोकून आहेत. झरा लोकवस्तीपासून काही अंतरावर असल्यामुळे आपल्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातून कडक उन्हात डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे. डोंगर उतारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्याने उंचमाथ्यावर आखाडेवाडी असल्याने त्याचा फायदा होणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

(चौकट)

दिवसा-उन्हाचा तर रात्री श्वापदांची भीती...

झऱ्यावर ग्रामस्थ नंबर लावून रात्रभर जागून आळीपाळीने पाणी भरत आहेत. तसेच रात्री पाण्यासाठी बाहेर पडायचं म्हटलं तर वन्यश्वापदांची भीती. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे डोंगरकपारीतील झरेही आता आटण्याच्या मार्गावर आहेत. डोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अद्याप भेडसावत नसला तरी पाण्यासाठी गुराख्यांना डोंगरावर झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.

(कोट...)

मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी झऱ्यांचा शोध घेऊन लोकसहभागातून बरेचसे प्रयत्न केले. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. २००५-२००६ पासून गाव पाणीटंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. प्रशासनाकडून बोअर मिळावी तसेच लवकरात लवकर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा.

-ज्ञानेश्वर आखाडे,आखाडेवाडी (कुसुंबीमुराद्ध

१२पेट्री

फोटो आहे...