शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

ईशान्येच्या वाऱ्याची झुळूक पश्चिमेला!

By admin | Updated: October 27, 2014 23:43 IST

कांदाटी खोऱ्याला जाग : स्वयंपूर्ण वनग्रामाचं स्वप्न सत्यात उतरण्याची सुचिन्हे

राजीव मुळ्ये - सातारा  -नि:शब्द कांदाटी खोरं लाँचच्या बुडबूड आवाजानं जागं झालेलं. तशी जाग या खोऱ्याला रोजच येते; पण यावेळी लाँचचा आवाज ईशान्येच्या वाऱ्याची झुळूक घेऊन आलेला. स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना जर ईशान्येकडील राज्यांमध्ये, घनदाट जंगलातल्या गावांत यशस्वी होऊ शकते, तर आमच्या पश्चिम घाटात का नाही..? विशिष्ट निग्रह करूनच सरकारी आणि बिगरसरकारी प्रतिनिधी पोहोचले मोरणी गावात...बामणोली विभागाचे वनक्षेत्रपाल (वन्यजीव) ए. एस. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पवार, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता डी. जे. जाधव, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, ‘ड्रोंगो’चे सुधीर सुकाळे, सागर गायकवाड आणि कोल्हापूरच्या आयुर्वेद-वनौषधी अभ्यासक अश्विनी माळकर... मोरणीच्या वाघजाई-महाकाली मंदिरात जमलेल्या गावकऱ्यांनी मीटिंंगसाठी मोरणीसह म्हाळुंगे आणि आरव ग्रामस्थांना खास शैलीत ‘बिनतारी वर्दी’ दिली. मंडळी जमेपर्यंत अनौपचारिक गप्पांमधून प्रतिनिधींनी गावकऱ्यांची स्थिती जाणून घेतली.कोयना धरण झाल्यानंतर गावातली ३०-४० घरं ठाणे जिल्ह्यात स्थलांतरित झाली आणि सुमारे १५ घरं राहिली. नंतर वाढून ती २० झाली. ८० ते ९० लोकसंख्या असलेल्या या गावात हिंंदू-मराठा समाजाची घरं अधिक. धनगर-गवळी समाजाचं एखाद्-दुसरं घर. भात, वरी, नाचणीची पिकं आधी रानडुकरं खातात. उरलेलं धान्य ९-१० महिने पुरतं. मग तापोळा किंंवा बामणोलीला मजुरीला जायचं. शंभर रुपये हजेरी. संध्याकाळी बाजार घेऊनच घरी यायचं. घरटी एक-दोन तरुण मुंबईत. आपापला संसार सांभाळून जमेल तितकी मदत करतात. गावात कुणी आजारी पडलं तर थेट खेडला (जि. रत्नागिरी) न्यावं लागतं. खेडहून अवघड रघुवीर घाट चढून शिंंदी-आरवपर्यंत एसटी येते. तिथपर्यंत पायीच!शेतीव्यतिरिक्त हिरडा, वावडिंंग, आवळा, आपट्याची झाडं गावकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक उत्पन्न देतात. आवळ्यावर मिठाचं पाणी टाकून ‘उसरी’ बनवली जाते. पॅकिंंग करून ती खेडच्या व्यापाऱ्याकडे नेऊन द्यायची. तो ५० रुपये किलोनं विकत घेतो आणि १०० रुपये पावशेर दरानं विकतो. बायाबापड्या बांबूच्या टोपल्या आणि इतर वस्तू तयार करतात; पण बाजारात घेऊन जायला दळणवळणाची व्यवस्था नाही. आकार बदलून बांबूच्या शोभेच्या वस्तू तयार करण्याची तयारी; पण पुन्हा प्रश्न तोच! बाजारपेठेत कोण नेणार? हमीभाव मिळणार का? कल्पना भरपूर. कष्टाची तयारी; पण वर्षानुवर्षे झळा सोसल्यामुळं कष्टाचा दाम खिशात पडेल याची शाश्वती उरलेली नाही. या स्थितीत ‘वन-जन जोडो’ अभियानातल्या सरकारी आणि बिगरसरकारी प्रतिनिधींनी काम सुरू केलंय. गावकऱ्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन, त्यांच्या संकल्पना विचारात घेऊन, अडचणी सोडवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांचीच मतं घेऊन या प्रतिनिधींनी ‘वनग्राम’ची संकल्पना मांडली आणि गावकऱ्यांनी ती उचलून धरली. हूऽऽऽऽऽ ‘ओव्हर अँड आउट’अँड्रॉइड मोबाइल घेऊन फिरणाऱ्यांना वाटतं, आपण सुधारलो. असेलही! पण एक दिवस नेटवर्क नसलेल्या भागात फिरलं की समजतं, प्रगती तंत्रज्ञानाची झाली; माणसाची नाही. कोणत्याही तंत्राशिवाय आपलं नेटवर्क तयार करू शकतो, तोच ‘माणूस.’ वाघजाईच्या मंदिरातून मीटिंंगसाठी पुकारा करणाऱ्याचं बिनतारी संदेशवहन पाहून याची खात्री पटली. ‘हूऽऽऽऽऽ’ असा पुकारा केला की त्याचा अर्थ ‘हॅलो.’ मग पलीकडून... सुमारे दोन किलोमीटरवरून तसाच पुकारा होतो. मग ज्याला संदेश द्यायचा, त्याचं नाव घेऊन ‘हूऽऽऽ’ केलं जातं. तिकडून संबंधित व्यक्ती जबाब देते. मग इकडून निरोप सांगायचा. मग दोन वेळा ‘हूऽऽऽऽऽ’ करायचं. याचा अर्थ ‘ओव्हर अँड आउट...’ म्हणजे, संदेश पोचला; संभाषण संपलं! आहे ना विलक्षण बिनतारी यंत्रणा!!