शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

आरोग्य सेविकांच्या न्यायासाठी जन आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST

कऱ्हाड : आरोग्य अभियानाअंतर्गत पंधरा वर्षांपासून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना केंद्र शासनाने सन २०२१ ते २०२२ मध्ये प्रकल्प आराखड्यात ...

कऱ्हाड : आरोग्य अभियानाअंतर्गत पंधरा वर्षांपासून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना केंद्र शासनाने सन २०२१ ते २०२२ मध्ये प्रकल्प आराखड्यात पदे मंजूर न केल्याने आरोग्य विभागातील पद रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे आरोग्य सेविकांचे भविष्य धोक्यात आलेले आहे. त्यांच्या न्यासाठी मानव कल्याणकारी संघटना जन आंदोलन उभारणार आहे, असे मत राज्याध्यक्ष सलीम पटेल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ज्या आरोग्य सेविकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनहितार्थ सेवा बजावली त्यांचा शासनाने विश्वासघात केल्याने मानव कल्याणकारी संघटनेचे मुख्य मार्गदर्शक व ज्येष्ठ कायदा विशेष तज्ज्ञ व आरोग्य सेविका संघर्ष समितीचे मार्गदर्शक ॲड. अमर मुल्ला यांच्या आदेशानुसार मानव कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र आंदोलन उभे करेल.

औद्योगिक विभाग कायदा १९४७ नुसार २५ एफ कलमाप्रमाणे राज्य सरकारने एक महिना अगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे. तसेच ग्रॅच्युइटी कायदा १९७२ अन्वये कोणत्याही कंत्राटी कामगार पाच वर्षे एकाच ठिकाणी काम करीत असेल तर तो ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतो. मात्र, राज्य सरकारने हे सर्व नियम मोडून आरोग्य सेविकांना घरचा रस्ता दाखवला, असे प्रकार अनेक कंपन्यांमध्ये घडत आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगात प्रसिद्ध असणाऱ्या ओगले ग्लास वर्क्स लिमिटेड या कंपनीमध्ये कायम कामगारांना सुद्धा ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागले आहे. तर दुसरीकडे आरोग्य सेविकांना आरोग्य खात्यामार्फत बेकायदेशीर घरी जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कोसळले तर सर्वसामान्य जनतेच्या जीविताची काळजी कोण घेणार, असा प्रश्न मानव कल्याणकारी संघटनेच्या वतीने उपस्थित केला जात आहे.