शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कात्रेश्वरामुळे ‘कातरपट्टे’चं झालं कातरखटाव!

By admin | Updated: March 16, 2015 00:08 IST

आठशे वर्षांपूर्वीची कथा : मंदिर बांधण्यासाठी शंभू महादेवांनी शिवदासाला दृष्टांत दिल्याची आख्यायिका--नावामागची कहाणी-आठ

विठ्ठल नलवडे - कातरखटाव खटाव तालुक्यात कातरखटाव म्हणून ओळखले जात असलेल्या गावाचे नाव सुमारे आठशे वर्षांपूर्वी कवठे होते. या कवठे गावचे ग्रामदैवत ‘कवठेश्वर’ होते. या वरूनच पुढे गावाला कातरपट्टे अन् त्यांचा अपभं्रश ‘कातरखटाव’ असा झाला. तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. गावाच्या नावाबद्दल दंतकथा सांगितल्या जातात. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी येरळा नदीस मिळते. कवठेमध्ये शिवदास नावाचा गवळी शंभू महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम सोडला नाही. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला पाण्याची कावड घेऊन नदीवर आला स्रानसंध्या उरकली कावड पाण्याने भरली आणि ‘हर हर महादेव...’ म्हणून शिखर शिंगणापूरचा रस्ता धरला. त्याकाळी कवठे गावाच्या ‘कातरखटावच्या, उत्तरेस अरण्य होते. अशाच एका पहिल्या सोमवारी शिवदासानी शंभू महादेवाचा जप करीत शिखर शिंगणापूर गाठले कावडीतून कवठाई नदीचे पवित्र जलाचा शंभू महादेवास अभिषेक घातला आणि भक्तिभवाने दोन्ही हात जोडले. शंभू महादेव शिवदासाच्या अखंड भक्तीस प्रसन्न झाले. यावेळी ‘शंभू महादेव शिवदासला म्हणाले’ ‘बोल तुला काय हवं ते माग.’ तेव्हा शिवदास शंभू महादेवास म्हणाला, ‘नको फक्त तुच मला हवा आहेस.’ त्यावर शंभू महादेव शिवदासला म्हणाले, ‘आता तुला इतके लांबचे अंतर माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्या गावी वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत पाठीमागे बघायचे नाही.’शिवदासाने आपली कावड घेतली आणि आपल्या गावचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली ‘देव माझ्या पाठीमागे येईल का?’ आणि शिवदासाने पाठीमागे पाहिलेच. त्याला पाठीमागे कोणीच दिसले नाही, त्याला वाटले देवाने आपल्याला फसविले की काय, तो निराश होऊन आपल्या घरी पोहोचला. विचार करीत शिवदास झोपी गेला. ‘झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले ‘तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहिले त्या ठिकाणी मी गुप्त झालो. त्या ठिकाणी माझे शिवलिंग सापडेल.’ शिवदासला खडबडून जाग आली. शिवदासाने आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन ‘शिव’नामाचा जप करीत जमीन नांगरण्यास सुरुवात केली. आणि अचानक भयंकर मोठा आवाज झाला आणि जमिनीतून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या त्याक्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्ताचे रूपांतर पाण्यामध्ये झाले. आणि शिवलिंग वर आले. त्यावेळी शिवलिंगाची साळुंकी नांगराच्या फाळाने कातरली गेलीली दिसली. ‘त्यामुळे शिवलिंगास ‘कात्रेश्वर’ नावाने संबोधले गेले. त्याच वेळी कातरपट्टे, असे पुढे नाव पडले. पुढे-पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे ‘कातरखटाव’ झाले.