शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

जयकुमार गोरे : विविध ठिकाणी भूमिपूजन

By admin | Updated: September 1, 2014 00:03 IST

१६ कोटींच्या विकासकामांचा डोंगर उभा करू शकलो,

दहिवडी: ‘माझ्या राजकीय वाटचालीत दहिवडी गावाची खूप मोलाची साथ लाभली असून, मी दहिवडीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्यामुळेच १६ कोटींच्या विकासकामांचा डोंगर उभा करू शकलो,’ असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.दहिवडी येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्मिता वायदंडे, पंचायत समिती सदस्य अतुल जाधव, सरपंच धनाजी जाधव, उपसरपंच बाळासो कोळेकर व ग्रामस्थ तसेच परिसरातील विविध गावचे सरपंच आणि उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.  आ. जयकुमार गोरे म्हणाले, ‘दहिवडी हे माणचे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे माझ्या माणच्या विकासाचा आरसा दहिवडीच्या रूपाने दिसला पाहिजे. त्यासाठी दहिवडीचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात नवीन प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, क्रीडा संकुल या मुख्य कामांबरोबरच अनेक छोटी-मोठी कामे करण्यात तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे यशस्वी झालो आहे. यापुढेही तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर विकासपर्व सुरूच ठेवायचे आहे.’आ. जयुकुमार गोरे म्हणाले, ‘माण तालुक्यात उरमोडीचे पाणी आणले आहे. माण तालुक्यात जलक्रांती करायची आहे. त्याचे पहिले पाऊल उचलले आहेत. पाणलोटच्या माध्यमातून हरितक्रांतीच्या यशापर्यंत आपण पोहोचलो आहे. आता पाणी आणले आहे, त्यामुळे यापुढील काळात आपल्याला औद्योगिक विकासाकडे लक्ष द्यायचे आहे. त्यामध्येही आपण यशस्वी होऊ’अतुल जाधव म्हणाले, ‘यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात दहिवडीत विकासकामे झाली नव्हती. आ. जयकुमार गोरे यांच्यामुळे दहिवडीत विकासकामांचा डोंगर उभा राहिला आहे.’यावेळी काशीद गल्ली येथील संतसेना महाराज भवन, कोकरेवस्ती येथील समाजमंदिर, गोसावी वस्ती येथे सभामंडप व कटपाळे वस्ती येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय काशीद, नितीन देवकर, सुभाष देवकर, डॉ. संजय काशीद, जनार्दन काशीद, बाळासाहेब कोकरे, प्रदीप कोकरे, पोपट कोकरे, तानाजी कोकरे, एकनाथ कोकरे, अरुण गोसावी, धनाजी गोसावी, विजय गोसावी, सुनील गोसावी, सचिन गोसावी, युवराज गोसावी, नाना गोसावी, हरिभाऊ गोसावी, शेखर गोसावी, संतोष गोसावी, तात्यासाहेब कटपाळे, मारुती कटपाळे, हणमंत कटपाळे, उत्तम कटपाळे, प्रदीप कटपाळे, बाळू कटपाळे, दशरथ कटपाळे, लक्ष्मण जाधव, विजय जाधव, सयाजी मोरे, सतीश शिंदे, संदीप जाधव, दत्ता देशमाने, किशोर साळुंखे, धनाजी साळुंखे, रवी सकुंडे आदी उपस्थित होते.यावेळी दहिवडीतील अंतर्गत तसेच वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या तब्बल १.५ कोटी रुपयांच्या नवीन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. (प्रतिनिधी)