शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

‘अनाथ’ होतो मी... आता मात्र ‘नाथ’ बनेन मी!

By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST

सामाजिक जाणिवा जागृत : महाविद्यालयीन युवकांचा ग्रुप रमतोय रिमांडहोमच्या मुलांमध्ये... गुड न्यूज

सचिन काकडे-- सातारा---बालवयात अनाथपणाचे दु:ख काय असते, याचा अनुभव घेत रिमांड होममध्ये शिक्षण घेतलेल्या एका युवकानं आपल्या महाविद्यालयीन मुलांचा ग्रुप तयार केला अन् त्यांच्यापुढे अनाथ मुलांच्या आनंदासाठी आपण काही केले पाहिजे, अशी कल्पना मांडली. ही कल्पना मित्रांनाही आवडली अन् गु्रपमधील प्रत्येकाच्या वाढदिवशी रिमांडमधील मुलांना शालेय वस्तू, खाऊ वाटप करण्याबरोबरच हा ग्रुप चिमुकल्यांमध्ये रमताना दिसत आहे. शिवाजी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या १५ ते २० विद्यार्थ्यांचा एक ग्रुप. एकत्र आल्यानंतर त्यांनी ‘माऊली सोशल सर्कल’ या नावाचा आपला ग्रुप तयार केला. या ग्रुपमधील एक विद्यार्थी म्हणजे आक्रम मणेर. आक्रमला एक जुळी बहीणही आहे. लहानपणीच डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या या भावंडांचे तिसरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण येथील रिमांड होममध्येच झाले. त्या आठवणींनी आजही आक्रमचे डोळे पाणावतात.कष्टप्रद जीवन जगून आज ही भावंड शिक्षण घेत आहे. या ग्रुपमधील अमोल वाघमोडे या विद्यार्थ्याचा वाढदिवस २९ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. मात्र, ‘माऊली ग्रुप’ ने हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून निरासग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य तर फुलवलेच तसेच आक्रमलाही एक सुखद धक्का दिला.या ग्रुपने प्रत्येकी तीनशे रुपये वर्गणी काढली. यानंतर त्यांनी एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे रिमांड होममधील १६० विद्यार्थ्यांना या पैशातून खरेदी केलेल्या वह्या, पेन व खाऊचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र ओसंडून वाहत होता.याप्रसंगी अमोल वाघमोडे, मनिष करपे, प्रशांत सोनावले, आम्रक मणेर, मर्जिणा मणेर, अनिकेत चव्हाण, बालाजी गोडसे, प्रवीण पवार, राहुल आटपाडकर, ओंकार पाटील, अमोल गावडे, अभिजित पाटील, दिनेश खरात, सुधीर फडतरे, सुमीत गवळी, नीलेश गटकुळ, कमरुद्दीन सुतार, आकाश जाधव, प्रतीक्षा सोनावले उपस्थित होते. दररोज पुस्तकवाचन स्पर्धेच्या युगात ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी ‘माउली सोशल सर्कल’ गु्रपने वाचन परंपरा जतन करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. ग्रुपमधील विद्यार्थी दररोज एकत्र येऊन एक तास वाचन करतात. एक विद्यार्थी वाचन करतो व इतर श्रवण करतात. ‘शिवाजी कोण होता’? या पुस्तकानंतर आता ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य’ या पुस्तकाचे वाचन यांनी सुरु केले आहे. पुस्तकातील अकरा पाने दररोज वाचली जातात. ज्यांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविले आहे, अशा मुलांचे जीवन किती कष्टप्रद असू शकते, ही कल्पनाही करू शकत नाही. वाढदिवस व अन्य बाबींसाठी आपण पैशांचा नेहमीच अपव्यय करतो. हे टाळून आमच्या ग्रुपने आज शेकडो मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. हा आनंद ‘त्या’ आनंदापेक्षा कितीतरी मोठा आहे. आमचे समाजकार्य असेच सुरु राहणार आहे.- मनीष करपे, विद्यार्थी