शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

शंभर एकराचा मालक झाला भूमिहीन

By admin | Updated: February 25, 2015 00:07 IST

आरल गाव दुसऱ्यांदा विस्थापित : आधी कोयनेतून आता निवकणेतून स्थलांतर, एका गावाचे झाले तीन भाग, पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम

मणदूरे : कोयना धरणामुळे १९६० साली पूनर्वसन व १९९९ साली निवकणे धरणामुळे पुन्हा पूनर्वसीत होण्याची वेळ आलेल्या पाटण तालुक्यातील आरल गावच्या ग्रामस्थांवर भुमिहीन होण्याची वेळ आली आहे. १९७० च्या दशकात १०० एकर जमीन असणारा येथील शेतकरी सध्या अल्पभुधारकही राहिलेला नाही, हे दुर्दैव. एका गावाचं दोन वेगवेगळ्या धरणांमुळे दोनवेळा पुनर्वसन होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे काम सुुरू असताना १९६० साली सुमारे १५० गावांना आपलं गाव सोडून जावं लागलं. त्यापैकीच एक आरल हे गाव. त्याकाळी या गावाची लोकसंख्या १ हजार ५०० होती. तर कुटूंबसंख्या ९० च्या आसपास. संबंधित कुटूंबांपैकी काहींचे पूनर्वसन धरणापासुन काही अंतरावर तर काहींचे भिवंडीकडे. पुनर्वसनामुळे आरल गावाचे तीन भाग पडले. त्यामध्ये निवकणे आरल, चाफोली आरल आणि भिवंडी आरल या तीन ठिकाणी हे गाव विभागले गेले. त्यापैकी १७ कुटुंबे व १३५ लोकसंख्या असणारे गाव ‘निवकणे आरल’ म्हणून ओळखले गेले. १९६० साली या कुटूंबांनी पदरमोड करून १०० एकर जमीन विकत घेतली. त्यातूनच त्यांनी आपला चरीतार्थ सुरू केला. अशातच निवकणेतील एका ज्येष्ठ ग्रामस्थाने आपली जमिन पुनर्वसित आरल गावच्या गावठाणासाठी देवू केली. त्याच जमिनीवर पुनर्वसित आरल गाव वसलं. अद्यापही त्याचठिकाणी हे गाव नांदत आहे. सध्या येथील कुटुंबांची संख्या ४७ झाली आहे. तर लोकसंख्या २६३ वर पोहोचली आहे. १९९९ साली निवकणे धरणासाठी या पुनर्वसित आरल गावाची ६० एकर जमिन संपादित झाली. धरणाच्या कामासाठी जमिनी उकरल्याने जनतेला खायला अन्न मिळेना, अशी अवस्था झाली. १९८६ साली आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी विधानसभेत आवाज उठवून कोयना धरणासाठी पूनर्वसनाचा कायदा मंजूर करून घेतला. त्यानंतर श्रमीक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलन करून १९९० साली मुंढेवाडी ता. मंगळवेढा (सोलापूर) येथे अवघ्या ५ कुटुंबांना ५ एकराप्रमाणे जमिनी मिळवुन दिल्या. परंतू व्यावसायीकांची दमदाटी झाल्यानंतर या गावकऱ्यांनी आपला गावच बरा म्हणून परत आरल गाव गाठलं. मात्र १९९९ पासून पून्हा निवकणे धरणामुळे गावाचं पूनर्वसन करायचं ठरलं. परंतू शासनाला अजूनही मुहूर्त मिळेना, अशी अवस्था झाली आहे. २००१ पासून बंदी दिनांक असताना शासकीय अधिकाऱ्यांना अजूनही साधे संकलन रजिस्टर तयार करता आलेले नाही, ही शोकांतीका आहे. तळी, बांध, विहिरी यांचा मोबदला अजुनही मिळाला नाही. तर ६५ टक्के वरील व्याज उदरनिर्वाह भत्ता अजूनही मिळाला नाही. पूनर्वसनाचं भिजत घोंंगडं अजूनही कायम आहे. (वार्ताहर)श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून १९८६ पासून पूनर्वसनासाठी लढा देत आलोय. परंतू १९९९ पासून पून्हा नव्या स्वरूपात लढा देण्याची वेळ आलीय. येथील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी संघर्ष करीत असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे कसलेच सोयरसुतक नाही; आमचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. - अर्जुन सपकाळ, श्रमिक मुक्ती दलमी चौथीत असताना १९६० साली कोयना धरणातून आमचं गाव उठलं. त्यावेळी गाव पुन्हा कुठे वसणार ही चिंता ग्रामस्थांमध्ये होती. त्यावेळी गाव निवकणेत वसले. पून्हा १९९९ ला निवकणे धरणामुळे आमचं पुनर्वसन करायच ठरलं; पण आमची पिढी संपायची वेळ आली तरी शासनाला जाग येईना.- दगडू सपकाळज्येष्ठ ग्रामस्थ, आरलग्रामस्थांचा लढा संपता संपेना !कोयनेत असताना आरल गावातील काही ग्रामस्थांकडे शंभर एकर जमीन होती. एकट्या कुटूंबासाठी एवढी जमिन असल्याने गाव गुण्यागोविंदाने नांदत होते. सध्या मात्र ही कुटुंबे भूमीहिन झाली आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न उग्र बनला आहे. कोयना धरणामुळे गाव उठल्यानंतर पूनर्वसनासाठी २९ वर्ष या गावाने लढा दिला. त्यानंतर हे गाव निवकणेमध्ये वसले; पण १९९९ मध्ये निवकणे धरणामुळे या गावाला पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली. गेली ४४ वर्ष हे गाव लढा देत आहे.