शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

ऐतिहासिक तळ्यांना मिळणार झळाळी!

By admin | Updated: April 2, 2016 00:04 IST

अजिंक्यतारा किल्ला : ७ तळी पुनरुज्जीवनाच्या वाटेवर; पाण्याची गळतीही थांबणार

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरील ऐतिहासिक तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ४९ लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामुळे किल्ल्यावरील दुरवस्थेत असणाऱ्या ७ तळ्यांना नवी झळाळी मिळणार आहे. या किल्ल्यावर तब्बल ९ पाण्याची तळी आहेत. किल्ल्यावर विस्तृत पठार आहे. या किल्ल्यावर पूर्वी शेती केली जात होती. याशेतीसाठी या तळ्यांतून पाणी उपलब्ध होत होते. वन्य प्राणी, पशुपक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ही तळी भागवत असल्याने वन्यप्राणी व पशुपक्ष्यांची संख्याही किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, वर्षानुवर्षे दुर्लक्षाच्या फेऱ्यात हा किल्ला अडकल्याने गडावरील पाण्याच्या मोठ्या तळ्यांकडे दुर्लक्ष झाले. साताऱ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नेहमीच पडतो. या किल्ल्यावरील तळी पावसाळ्यात भरतात. मात्र, पाणी गळती होऊन निघून जाते. गडावर मोजकेच पाणी शिल्लक राहत होते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी किल्ल्यावरील दोन तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या तळ्यांची गळती थांबविण्यात आली तसेच पडझडीच्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले. या दोन तळ्यांमध्ये सध्या चांगला पाणीसाठा होत असल्याने हे पाणी किल्ल्यावर लागवड केलेल्या वृक्षांसाठी वापरले जाते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ व त्यांचे सहकारी किल्ल्यावर या वृक्षांचे संगोपन करत आहेत. जलसंधारणाचीही कामे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाली आहेत. अजून ७ तळ्यांची दुरवस्था कायम आहे. तळ्यांमध्ये मोठा गाळ साठलेला आहे. तळ्यांची पडझड झालेली आहे. तसेच पावसाचे पाणी काही दिवसांतच गळती होऊन निघून जाते. या तळ्यांची दुरुस्ती केल्यास किल्ल्यावर पाणीसाठा होऊ शकतो. किल्ल्यावरील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय यानिमित्ताने कायमस्वरूपी होऊ शकते. या हेतूने जिल्हा प्रशासनाने किल्ल्यावरील तळ्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)अजिंक्यतारा किल्ल्यावरील तळ्यांसाठी निधी जाहीर झाला आहे. तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल, याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच केली जाईल. त्यानंतरच कामाचा आराखडा तयार होईल.- शरद दाभाडकर, कार्यकारी अभियंता उरमोडी धरण विभागअजिंक्यतारा किल्ल्याची उंची लक्षात घेता एवढ्या उंचीवर तळ्यांचे पुनरुज्जीवनाचे काम करणे हेच आव्हान आहे. तरी देखील उरमोडी विभागाच्या अभियंत्यांनी दोन तळ्यांचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केले होते. आता इतर दुर्लक्षित तळ्यांनाही झळाळी मिळण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील पशुपक्षी व झाडांची तहान भागेल. तसेच भूगर्भातील पाणीसाठाही यानिमित्ताने वाढण्यास मदत होईल.- डॉ. अविनाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते