शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक तळ्यांना मिळणार झळाळी!

By admin | Updated: April 2, 2016 00:04 IST

अजिंक्यतारा किल्ला : ७ तळी पुनरुज्जीवनाच्या वाटेवर; पाण्याची गळतीही थांबणार

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरील ऐतिहासिक तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ४९ लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामुळे किल्ल्यावरील दुरवस्थेत असणाऱ्या ७ तळ्यांना नवी झळाळी मिळणार आहे. या किल्ल्यावर तब्बल ९ पाण्याची तळी आहेत. किल्ल्यावर विस्तृत पठार आहे. या किल्ल्यावर पूर्वी शेती केली जात होती. याशेतीसाठी या तळ्यांतून पाणी उपलब्ध होत होते. वन्य प्राणी, पशुपक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ही तळी भागवत असल्याने वन्यप्राणी व पशुपक्ष्यांची संख्याही किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, वर्षानुवर्षे दुर्लक्षाच्या फेऱ्यात हा किल्ला अडकल्याने गडावरील पाण्याच्या मोठ्या तळ्यांकडे दुर्लक्ष झाले. साताऱ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नेहमीच पडतो. या किल्ल्यावरील तळी पावसाळ्यात भरतात. मात्र, पाणी गळती होऊन निघून जाते. गडावर मोजकेच पाणी शिल्लक राहत होते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी किल्ल्यावरील दोन तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या तळ्यांची गळती थांबविण्यात आली तसेच पडझडीच्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले. या दोन तळ्यांमध्ये सध्या चांगला पाणीसाठा होत असल्याने हे पाणी किल्ल्यावर लागवड केलेल्या वृक्षांसाठी वापरले जाते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ व त्यांचे सहकारी किल्ल्यावर या वृक्षांचे संगोपन करत आहेत. जलसंधारणाचीही कामे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाली आहेत. अजून ७ तळ्यांची दुरवस्था कायम आहे. तळ्यांमध्ये मोठा गाळ साठलेला आहे. तळ्यांची पडझड झालेली आहे. तसेच पावसाचे पाणी काही दिवसांतच गळती होऊन निघून जाते. या तळ्यांची दुरुस्ती केल्यास किल्ल्यावर पाणीसाठा होऊ शकतो. किल्ल्यावरील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय यानिमित्ताने कायमस्वरूपी होऊ शकते. या हेतूने जिल्हा प्रशासनाने किल्ल्यावरील तळ्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)अजिंक्यतारा किल्ल्यावरील तळ्यांसाठी निधी जाहीर झाला आहे. तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल, याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच केली जाईल. त्यानंतरच कामाचा आराखडा तयार होईल.- शरद दाभाडकर, कार्यकारी अभियंता उरमोडी धरण विभागअजिंक्यतारा किल्ल्याची उंची लक्षात घेता एवढ्या उंचीवर तळ्यांचे पुनरुज्जीवनाचे काम करणे हेच आव्हान आहे. तरी देखील उरमोडी विभागाच्या अभियंत्यांनी दोन तळ्यांचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केले होते. आता इतर दुर्लक्षित तळ्यांनाही झळाळी मिळण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील पशुपक्षी व झाडांची तहान भागेल. तसेच भूगर्भातील पाणीसाठाही यानिमित्ताने वाढण्यास मदत होईल.- डॉ. अविनाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते