शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

हायवेवर होतेय वाऱ्याशी स्पर्धा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:11 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाणही वाढतंय़ शेंद्रे ते पेठनाका या ८७ किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल ८०९ अपघात झालेत़ त्यामध्ये १२५ जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर ८५६ जण जायबंदी झालेत़स्टेअरिंगवर हात, अ‍ॅक्सिलेटरवर टाच, डोळ्यावर गॉगल अन् बंद काचा़ ‘स्पीडॅमीटर’चा काटा क्षणाक्षणाला पुढे सरकतो़ १००़़़ ११०़़़ १२० ़़़ तर कधी त्याही पुढे; पण जोपर्यंत अडथळा येत नाही, तोपर्यंत चालकाची ‘अ‍ॅक्सिलेटर’वरची टाच हटत नाही़ लक्ष कुठंही असलं तरी गाडीचा वेग मात्र वाढतच असतो़ बंद काचांमुळे वेगाची जाणीव होत नाही अन् ज्यावेळी जाणीव होते, त्यावेळी वाहनावर चालकाचा ताबा राहत नाही़ शेंद्रे ते पेठनाकादरम्यान चालकाचा ताबा सुटल्यानेच अनेक वाहने अपघातग्रस्त झाली आहेत़ त्यामध्ये काही वाहनांचा तर अक्षरश: चक्काचूर झालाय.वास्तविक, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोल्हापूर ते सातारा व सातारा ते कोल्हापूर या दोन्ही लेनवर एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे समोरून येणाºया वाहनाला धडक बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तरीही इतर राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरच जास्त आणि भयानक अपघात होतात. अनियंत्रित वेग, मोठ्या आवाजात लावली जाणारी म्युझिक सिस्टीम, चुकीच्या पद्धतीने होणारा ओव्हरटेकचा प्रयत्न, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सहप्रवाशाशी बोलणे, विश्रांती न घेता तासन्तास वाहन चालविणे, चालकाचे मद्यप्राशन आदी कारणे अपघाताला निमंत्रण देतात.शेंद्रे ते पेठनाकादरम्यान वारंवार भयानक अपघात होतायत. चालकांनी सावधानता बाळगावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही लावले गेलेत. मात्र, या फलकांकडे कोणताही चालक म्हणावे तेवढे लक्ष देत नाही, त्यामुळे अडथळ्याची अथवा धोक्याची पूर्वसूचना चालकाला मिळत नाही. परिणामी, ऐनवेळी समोर आलेला अडथळा किंवा धोका टाळण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून वाहने अपघातग्रस्त होतात. बहुतांश अपघातांत चालकाचा बेदरकारपणा प्रवाशांच्या जीवावर बेततो. रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनाला चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुसºया वाहनाची धडक बसते. वाहन नियंत्रित न झाल्यानेच हे अपघात घडतात. गत काही वर्षात झालेल्या अपघातांचा विचार करता बहुतांश अपघात बेजबाबदार चालकांमुळे झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‘स्पीडगन’ कहाँ है?महामार्गावर प्रतितास जास्तीत जास्त ८० पर्यंतचा वेग निर्धारित करण्यात आला आहे़ धावत्या वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ‘स्पीडगन’ही पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, त्या ‘स्पीडगन’चा वापरच होत नसल्याची परिस्थिती आहे. वेगमर्यादा ओलांडल्याने होणारी कारवाई नगण्य असल्यामुळे वेगाच्या मर्यादेचे भान चालकांना राहत नाही. परिणामी, अनेकवेळा अपघाताचा सामना करावा लागतो.