शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

हायवेवर होतेय वाऱ्याशी स्पर्धा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:11 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाणही वाढतंय़ शेंद्रे ते पेठनाका या ८७ किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल ८०९ अपघात झालेत़ त्यामध्ये १२५ जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर ८५६ जण जायबंदी झालेत़स्टेअरिंगवर हात, अ‍ॅक्सिलेटरवर टाच, डोळ्यावर गॉगल अन् बंद काचा़ ‘स्पीडॅमीटर’चा काटा क्षणाक्षणाला पुढे सरकतो़ १००़़़ ११०़़़ १२० ़़़ तर कधी त्याही पुढे; पण जोपर्यंत अडथळा येत नाही, तोपर्यंत चालकाची ‘अ‍ॅक्सिलेटर’वरची टाच हटत नाही़ लक्ष कुठंही असलं तरी गाडीचा वेग मात्र वाढतच असतो़ बंद काचांमुळे वेगाची जाणीव होत नाही अन् ज्यावेळी जाणीव होते, त्यावेळी वाहनावर चालकाचा ताबा राहत नाही़ शेंद्रे ते पेठनाकादरम्यान चालकाचा ताबा सुटल्यानेच अनेक वाहने अपघातग्रस्त झाली आहेत़ त्यामध्ये काही वाहनांचा तर अक्षरश: चक्काचूर झालाय.वास्तविक, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोल्हापूर ते सातारा व सातारा ते कोल्हापूर या दोन्ही लेनवर एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे समोरून येणाºया वाहनाला धडक बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तरीही इतर राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरच जास्त आणि भयानक अपघात होतात. अनियंत्रित वेग, मोठ्या आवाजात लावली जाणारी म्युझिक सिस्टीम, चुकीच्या पद्धतीने होणारा ओव्हरटेकचा प्रयत्न, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सहप्रवाशाशी बोलणे, विश्रांती न घेता तासन्तास वाहन चालविणे, चालकाचे मद्यप्राशन आदी कारणे अपघाताला निमंत्रण देतात.शेंद्रे ते पेठनाकादरम्यान वारंवार भयानक अपघात होतायत. चालकांनी सावधानता बाळगावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही लावले गेलेत. मात्र, या फलकांकडे कोणताही चालक म्हणावे तेवढे लक्ष देत नाही, त्यामुळे अडथळ्याची अथवा धोक्याची पूर्वसूचना चालकाला मिळत नाही. परिणामी, ऐनवेळी समोर आलेला अडथळा किंवा धोका टाळण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून वाहने अपघातग्रस्त होतात. बहुतांश अपघातांत चालकाचा बेदरकारपणा प्रवाशांच्या जीवावर बेततो. रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनाला चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुसºया वाहनाची धडक बसते. वाहन नियंत्रित न झाल्यानेच हे अपघात घडतात. गत काही वर्षात झालेल्या अपघातांचा विचार करता बहुतांश अपघात बेजबाबदार चालकांमुळे झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‘स्पीडगन’ कहाँ है?महामार्गावर प्रतितास जास्तीत जास्त ८० पर्यंतचा वेग निर्धारित करण्यात आला आहे़ धावत्या वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ‘स्पीडगन’ही पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, त्या ‘स्पीडगन’चा वापरच होत नसल्याची परिस्थिती आहे. वेगमर्यादा ओलांडल्याने होणारी कारवाई नगण्य असल्यामुळे वेगाच्या मर्यादेचे भान चालकांना राहत नाही. परिणामी, अनेकवेळा अपघाताचा सामना करावा लागतो.