शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

हायवेवर होतेय वाऱ्याशी स्पर्धा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:11 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाणही वाढतंय़ शेंद्रे ते पेठनाका या ८७ किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल ८०९ अपघात झालेत़ त्यामध्ये १२५ जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर ८५६ जण जायबंदी झालेत़स्टेअरिंगवर हात, अ‍ॅक्सिलेटरवर टाच, डोळ्यावर गॉगल अन् बंद काचा़ ‘स्पीडॅमीटर’चा काटा क्षणाक्षणाला पुढे सरकतो़ १००़़़ ११०़़़ १२० ़़़ तर कधी त्याही पुढे; पण जोपर्यंत अडथळा येत नाही, तोपर्यंत चालकाची ‘अ‍ॅक्सिलेटर’वरची टाच हटत नाही़ लक्ष कुठंही असलं तरी गाडीचा वेग मात्र वाढतच असतो़ बंद काचांमुळे वेगाची जाणीव होत नाही अन् ज्यावेळी जाणीव होते, त्यावेळी वाहनावर चालकाचा ताबा राहत नाही़ शेंद्रे ते पेठनाकादरम्यान चालकाचा ताबा सुटल्यानेच अनेक वाहने अपघातग्रस्त झाली आहेत़ त्यामध्ये काही वाहनांचा तर अक्षरश: चक्काचूर झालाय.वास्तविक, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोल्हापूर ते सातारा व सातारा ते कोल्हापूर या दोन्ही लेनवर एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे समोरून येणाºया वाहनाला धडक बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तरीही इतर राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरच जास्त आणि भयानक अपघात होतात. अनियंत्रित वेग, मोठ्या आवाजात लावली जाणारी म्युझिक सिस्टीम, चुकीच्या पद्धतीने होणारा ओव्हरटेकचा प्रयत्न, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सहप्रवाशाशी बोलणे, विश्रांती न घेता तासन्तास वाहन चालविणे, चालकाचे मद्यप्राशन आदी कारणे अपघाताला निमंत्रण देतात.शेंद्रे ते पेठनाकादरम्यान वारंवार भयानक अपघात होतायत. चालकांनी सावधानता बाळगावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही लावले गेलेत. मात्र, या फलकांकडे कोणताही चालक म्हणावे तेवढे लक्ष देत नाही, त्यामुळे अडथळ्याची अथवा धोक्याची पूर्वसूचना चालकाला मिळत नाही. परिणामी, ऐनवेळी समोर आलेला अडथळा किंवा धोका टाळण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून वाहने अपघातग्रस्त होतात. बहुतांश अपघातांत चालकाचा बेदरकारपणा प्रवाशांच्या जीवावर बेततो. रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनाला चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुसºया वाहनाची धडक बसते. वाहन नियंत्रित न झाल्यानेच हे अपघात घडतात. गत काही वर्षात झालेल्या अपघातांचा विचार करता बहुतांश अपघात बेजबाबदार चालकांमुळे झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‘स्पीडगन’ कहाँ है?महामार्गावर प्रतितास जास्तीत जास्त ८० पर्यंतचा वेग निर्धारित करण्यात आला आहे़ धावत्या वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ‘स्पीडगन’ही पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, त्या ‘स्पीडगन’चा वापरच होत नसल्याची परिस्थिती आहे. वेगमर्यादा ओलांडल्याने होणारी कारवाई नगण्य असल्यामुळे वेगाच्या मर्यादेचे भान चालकांना राहत नाही. परिणामी, अनेकवेळा अपघाताचा सामना करावा लागतो.