शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

विष कालवणाऱ्यांची साहित्यातून बखोटी पकडा!

By admin | Updated: January 3, 2016 00:49 IST

हेमंत देसाई : साहित्यिकांनी समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी लिहितं राहावं

सातारा : ‘अनेक माध्यमांतून अंधश्रद्धेचा प्रचार सुुरू असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेले बलिदान वाया जाईल, अशी भीती निर्माण होत आहे. या खुज्या भूमिकेला खतपाणी घालण्याची प्रवृत्ती शिवाजी-संभाजींचे नाव घेऊन समाजात विष कालवत आहे. दादागिरी, दहशतीचं वातावरण निर्माण करू पाहणाऱ्यांची साहित्याच्या माध्यमातून बखोटी पकडण्याचं काम फूल आणि पानामध्ये रमलेल्या साहित्यिकांनी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार हेमंत देसाई यांनी येथे केले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरीत ग्रंथमहोत्सवामध्ये आयोजित केलेल्या ‘सामाजिक सलोखा व साहित्यिकांचा सहभाग’ या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या परिसंवादामध्ये विचारवंत प्रा. डॉ. कन्हैया कुंदप, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा, प्रा. अनिल बोधे यांनी सहभाग घेतला. सामाजिक सलोखा राखण्याच्या हेतूने प्रत्येक समस्येला भिडण्यासाठी साहित्यिकांनी जाणीवपूर्वक पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर या परिसंवादातून निघाला. देसाई म्हणाले, ‘साहित्यिक मंडळींनी स्तुतिपाठकांच्या संप्रदायामधून बाहेर पडून समाजाकडे एका सम्यक नजरेतून पाहावे, असे आवाहन करतानाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडण्यासाठी वाद घालणारे साहित्यिक विषमता दूर करण्यासाठी पुढे येत नाहीत,’ अशी जहरी टीका हेमंत देसाई यांनी आपल्या विवेचनात केली. ‘सामान्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मान मिळविण्यासाठी लेखन करण्याबरोबरच भांडणे लावणाऱ्या एका विशिष्ट प्रवृत्तीला साहित्यामधून अद्दल घडविण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रा. अनिल बोधे म्हणाले, ‘चांगलं साहित्य निर्माण करून समाजात सलोखा निर्माण करण्याचं काम साहित्यिकांचं आहे. ज्यांना सामाजिक भान आहे, अशीच मंडळी चांगले साहित्यिक होऊ शकतात. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यातून समाजातील प्रश्न मांडले गेले, आता तसे होताना दिसत नाही. साहित्यकृती निर्माण करून थांबण्यात धन्यता न मानता साहित्यिकांनी सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी व्हायला हवे.’ प्रा. डॉ. कन्हैया कुंदप यांनी सामाजिक सलोख्यासाठी महानुभाव साहित्याने दिलेले योगदान साहित्यप्रेमींपुढे मांडले. राजकारण आणि साहित्य या दोन गोष्टी सोबत घेऊन जात असताना दोन्हीमध्ये कधीही गफलत न करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण उत्तराची मांडणीही त्यांनी केली. शंकर सारडा यांनी सामाजिक प्रश्नांना भिडण्याची क्षमता साहित्यात नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘जे. कृष्णमूर्ती यांची प्रवचने महाविद्यालयात शिकत असताना मी ऐकली. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील प्रश्नांसारखेच वर्षानुवर्षे भिजत पडलेले अनेक प्रश्न ठरवलं तर चुटकीसरशी सोडविण्यासारखे आहेत. मी या प्रश्नांची उत्तरे साहित्यातून सोडविण्याचा गेल्या साठ वर्षांत प्रयत्न केला; पण वयाच्या ८० व्या वर्षीही मला ती सापडली नाहीत. भाऊबंदकी, वाद, ईर्ष्या, संघर्ष या बाबी आपल्या समाजात कायम आहेत, साहित्यातून ही मांडली गेली; पण त्याची उत्तरे शोधक पद्धतीने मांडली गेली नाहीत, याचीच मला खंत आहे.’ ग्रंथमहोत्सवाचे कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी परिसंवादात संवादक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी) मोदींच्या सुरक्षेची काळजी सबनिसांना कशाला? अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाक भेटीदरम्यान सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली होती. वास्तविक मोदींची काळजी घेण्यासाठी शासनाकडे स्वतंत्र खाती आहेत. सबनीस यांनी साहित्याची काळजी घ्यावी, अशी शालजोडी हेमंत देसाई यांनी आपल्या विवेचनातून मारली.