शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

‘माणुसकी’च्या पाणपोईतून मिळतोय ‘गारवा’

By admin | Updated: April 12, 2017 22:55 IST

कऱ्हाडात सोय : सामाजिक संघटना, मित्रमंडळांचा पुढाकार; प्रवाशांपासून ते चक्क गाढवांसाठीही पाणपोई

कऱ्हाड : सध्या कडक उन्हाळा निर्माण झाला असल्याने तापमानाचा पारा चाळीस अंशावर पोहोचला आहे. अशात घोटभर पाण्यासाठी घसा कोरडा पडेपर्यंत लोकांना फिरावं लागत आहे. शहरातही तीच परिस्थिती आहे. मात्र, शहरात येणाऱ्या प्रवासी व पर्यटकांचे पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून येथील काही सार्वजनिक मंडळे व रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पाणपोई सुरू केल्या आहेत. माणुसकीच्या भावनेतून सुरू केलेल्या या पाणपोई सध्या नागरिकांच्या कोरड्या घशाला ‘गारवा’ मिळून देत आहेत. सध्या वाढलेल्या उन्हामुळे ऐन एप्रिल महिना हा मेप्रमाणे जाणवू लागला आहे. शहरात तर जिकडे-तिकडे थंडगार ज्युस सेंटर, लिंबू सरबत विक्रीची दुकाने वाढली आहेत. असे सहज व कुठेही उपलब्ध होणारे थंडगार पाणी लोकांना व प्रवाशांना पिता यावे म्हणून शहरात काही सार्वजनिक मंडळे, रिक्षा संघटना तसेच युवक मित्र-परिवार यांच्या वतीने शहरात अकराहून अधिक ठिकाणी थंड पाण्याच्या पाणपोर्इंची सोय केली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी पालिकेच्या वतीने पिण्याच्या पाणपोर्इंची सोय करण्यात आली आहे खरी. मात्र, त्या पाणपोर्इंची अवस्था आज ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशी झाली आहे. काही ठिकाणी पाणपोई आहेत. मात्र, त्यामध्ये पाणीच नाही. तर काही ठिकाणी पाणपोई तसेच पाणीही आहे. मात्र, ते पिण्यास योग्य नाही. येथील पालिका व शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी साधे पाणी तर कर्मचाऱ्यांसाठी मात्र, वॉटर कूलरच शुद्ध थंडगार पाण्याची सोय करण्यात आली आहे. याउलट शहरात ठिकठिकाणी मातीच्या माठात त्याला कापडी फडके गुंडाळून थंडगार शुद्ध पाणी लाकडाच्या मंडपाच्या तसेच झाडांच्या सावलीच्या आडोशाला ठेवण्यात आले आहेत. सध्या वातावरणात उष्माचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. शहरात छोट्या-मोठ्या कामासाठी येणाऱ्या लोकांना घोटभर पाण्यासाठी ज्युस सेंटर व हॉटेलमध्ये जावं लागत आहे. फुक्कट मिळणारे थंडगार पाणी पिण्याचे सोडून कृत्रिम पद्धतींनी तयार केलेल्या ज्युस व शीतपेयांचेच सेवन लोकांकडून केले जात आहे. (प्रतिनिधी) शीतपेयांमध्ये असणारे घटक...उन्हाळा ऋतूमध्ये शरीराला थंडगार पदाथास्वत:साठी थंडगार कूलर अन् पंखे...शहरातील शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी थंडगार कूलर, फ्रीज अन् पंखे यांची सोय केलेली दिसून येत आहे. मात्र, नागरिकांसाठी ना कूलर, ना थंड पाणी अशा सोयी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना अशा कार्यालयांमध्ये येताना स्वत: बरोबर पाणी घेऊन यावे लागत आहे.र् ंची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत असते. अशात जर थंडगार पाणी पिले की, त्याचा कमी प्रमाणात परिणाम होतो. थंडगार असलेल्या विविध ज्युस, सरबत तसेच कोल्ड्रिंक्समध्ये साखर, कृत्रिम रंग व वास, सायट्रिक अ‍ॅसिड, कॅफेन, सोडियम या घटकांचा समावेश करण्यात आलेला असतो.