शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘माणुसकी’च्या पाणपोईतून मिळतोय ‘गारवा’

By admin | Updated: April 12, 2017 22:55 IST

कऱ्हाडात सोय : सामाजिक संघटना, मित्रमंडळांचा पुढाकार; प्रवाशांपासून ते चक्क गाढवांसाठीही पाणपोई

कऱ्हाड : सध्या कडक उन्हाळा निर्माण झाला असल्याने तापमानाचा पारा चाळीस अंशावर पोहोचला आहे. अशात घोटभर पाण्यासाठी घसा कोरडा पडेपर्यंत लोकांना फिरावं लागत आहे. शहरातही तीच परिस्थिती आहे. मात्र, शहरात येणाऱ्या प्रवासी व पर्यटकांचे पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून येथील काही सार्वजनिक मंडळे व रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पाणपोई सुरू केल्या आहेत. माणुसकीच्या भावनेतून सुरू केलेल्या या पाणपोई सध्या नागरिकांच्या कोरड्या घशाला ‘गारवा’ मिळून देत आहेत. सध्या वाढलेल्या उन्हामुळे ऐन एप्रिल महिना हा मेप्रमाणे जाणवू लागला आहे. शहरात तर जिकडे-तिकडे थंडगार ज्युस सेंटर, लिंबू सरबत विक्रीची दुकाने वाढली आहेत. असे सहज व कुठेही उपलब्ध होणारे थंडगार पाणी लोकांना व प्रवाशांना पिता यावे म्हणून शहरात काही सार्वजनिक मंडळे, रिक्षा संघटना तसेच युवक मित्र-परिवार यांच्या वतीने शहरात अकराहून अधिक ठिकाणी थंड पाण्याच्या पाणपोर्इंची सोय केली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी पालिकेच्या वतीने पिण्याच्या पाणपोर्इंची सोय करण्यात आली आहे खरी. मात्र, त्या पाणपोर्इंची अवस्था आज ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशी झाली आहे. काही ठिकाणी पाणपोई आहेत. मात्र, त्यामध्ये पाणीच नाही. तर काही ठिकाणी पाणपोई तसेच पाणीही आहे. मात्र, ते पिण्यास योग्य नाही. येथील पालिका व शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी साधे पाणी तर कर्मचाऱ्यांसाठी मात्र, वॉटर कूलरच शुद्ध थंडगार पाण्याची सोय करण्यात आली आहे. याउलट शहरात ठिकठिकाणी मातीच्या माठात त्याला कापडी फडके गुंडाळून थंडगार शुद्ध पाणी लाकडाच्या मंडपाच्या तसेच झाडांच्या सावलीच्या आडोशाला ठेवण्यात आले आहेत. सध्या वातावरणात उष्माचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. शहरात छोट्या-मोठ्या कामासाठी येणाऱ्या लोकांना घोटभर पाण्यासाठी ज्युस सेंटर व हॉटेलमध्ये जावं लागत आहे. फुक्कट मिळणारे थंडगार पाणी पिण्याचे सोडून कृत्रिम पद्धतींनी तयार केलेल्या ज्युस व शीतपेयांचेच सेवन लोकांकडून केले जात आहे. (प्रतिनिधी) शीतपेयांमध्ये असणारे घटक...उन्हाळा ऋतूमध्ये शरीराला थंडगार पदाथास्वत:साठी थंडगार कूलर अन् पंखे...शहरातील शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी थंडगार कूलर, फ्रीज अन् पंखे यांची सोय केलेली दिसून येत आहे. मात्र, नागरिकांसाठी ना कूलर, ना थंड पाणी अशा सोयी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना अशा कार्यालयांमध्ये येताना स्वत: बरोबर पाणी घेऊन यावे लागत आहे.र् ंची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत असते. अशात जर थंडगार पाणी पिले की, त्याचा कमी प्रमाणात परिणाम होतो. थंडगार असलेल्या विविध ज्युस, सरबत तसेच कोल्ड्रिंक्समध्ये साखर, कृत्रिम रंग व वास, सायट्रिक अ‍ॅसिड, कॅफेन, सोडियम या घटकांचा समावेश करण्यात आलेला असतो.