शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या करातून शिक्षणासाठी दिला जाणारा निधी--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 20:35 IST

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात.

ठळक मुद्देराज्यातील पुढची पिढी घडविण्याची गुंतवणूक असल्याचे केले प्रतिपादनशिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो?

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात. त्या स्वाती महाडिकांचा उभ्या महाराष्ट्राला अभिमान असून, खरेतर त्यांच्या दोन्ही मुलांना तुम्ही विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचं पत्र आपण होऊन पाठवायला हवे,’ असे उद्गार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पतंगराव कदम, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत,भाजपचेजिल्हाध्यक्षविक्रमपावसकरउपस्थित होते.

‘राज्यातील कराच्या रूपातून मिळणाºया प्रत्येकी २ रुपये ४० पैशांपैकी ५७ पैसे आपण राज्यातील शिक्षणासाठी देतो. हा निधी म्हणजे खर्च नसून गुंतवणूक आहे,’ असे सांगून विनोद तावडे म्हणाले, ‘ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवत्ता एकाच मापात मोजता येणार नाही. त्यासाठी आपली परीक्षापद्धती जी घोकंपट्टीवर आधारलेली आहे. ती बदलावी लागणार असल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांनी काही उदाहरणे देऊन हे पटवून दिले. आता महाराष्ट्रातील शिक्षणात ते बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची वाटचाल विषद केली. रयतच्या भविष्यातील योजना सांगितल्या तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी किती पराकोटीचे प्रयत्न केले, हे उदाहरण देऊन सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. पतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेमुळे बहुजनांची मुलं कशी शिकली. ज्या काळात ज्या शिक्षणाची गरज होती. ते शिक्षण कर्मवीरांनी दिल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांच्या कामाचे कौतुकही केले.या कार्यक्रमाच्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे पहिले शाहू बोर्डींग सुरू केले, त्याची पाहणी केली. त्यांनतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणमंत्र्यांची उत्तरेशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणाच्या नंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायची मुभा दिली. ते मंचावरून खाली उतरून विद्यार्थ्यांमध्ये आले. विद्यार्थ्यांनी मनसोक्त प्रश्न विचारले. शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना त्यांचे समाधान होईल, अशी उत्तरे दिली. आरती पाटील या विद्यार्थिनीने एसएससीमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सीबीएसई व आयएससीई विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत का फरक पडतो? हे विचारले असता त्यावर शिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो? हे सांगितले. त्यात बदल करायची आवश्यकता असून, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.