शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

जनतेच्या करातून शिक्षणासाठी दिला जाणारा निधी--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 20:35 IST

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात.

ठळक मुद्देराज्यातील पुढची पिढी घडविण्याची गुंतवणूक असल्याचे केले प्रतिपादनशिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो?

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात. त्या स्वाती महाडिकांचा उभ्या महाराष्ट्राला अभिमान असून, खरेतर त्यांच्या दोन्ही मुलांना तुम्ही विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचं पत्र आपण होऊन पाठवायला हवे,’ असे उद्गार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पतंगराव कदम, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत,भाजपचेजिल्हाध्यक्षविक्रमपावसकरउपस्थित होते.

‘राज्यातील कराच्या रूपातून मिळणाºया प्रत्येकी २ रुपये ४० पैशांपैकी ५७ पैसे आपण राज्यातील शिक्षणासाठी देतो. हा निधी म्हणजे खर्च नसून गुंतवणूक आहे,’ असे सांगून विनोद तावडे म्हणाले, ‘ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवत्ता एकाच मापात मोजता येणार नाही. त्यासाठी आपली परीक्षापद्धती जी घोकंपट्टीवर आधारलेली आहे. ती बदलावी लागणार असल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांनी काही उदाहरणे देऊन हे पटवून दिले. आता महाराष्ट्रातील शिक्षणात ते बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची वाटचाल विषद केली. रयतच्या भविष्यातील योजना सांगितल्या तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी किती पराकोटीचे प्रयत्न केले, हे उदाहरण देऊन सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. पतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेमुळे बहुजनांची मुलं कशी शिकली. ज्या काळात ज्या शिक्षणाची गरज होती. ते शिक्षण कर्मवीरांनी दिल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांच्या कामाचे कौतुकही केले.या कार्यक्रमाच्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे पहिले शाहू बोर्डींग सुरू केले, त्याची पाहणी केली. त्यांनतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणमंत्र्यांची उत्तरेशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणाच्या नंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायची मुभा दिली. ते मंचावरून खाली उतरून विद्यार्थ्यांमध्ये आले. विद्यार्थ्यांनी मनसोक्त प्रश्न विचारले. शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना त्यांचे समाधान होईल, अशी उत्तरे दिली. आरती पाटील या विद्यार्थिनीने एसएससीमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सीबीएसई व आयएससीई विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत का फरक पडतो? हे विचारले असता त्यावर शिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो? हे सांगितले. त्यात बदल करायची आवश्यकता असून, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.