शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाच वर्षे दुष्काळ...आता आमिषांचा पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे वॉर्डात फिरायला विसरलेल्या उमेदवार व त्यांच्या नेत्यांना आता पुन्हा मतदारराजाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे वॉर्डात फिरायला विसरलेल्या उमेदवार व त्यांच्या नेत्यांना आता पुन्हा मतदारराजाची आठवण झालेली आहे. मतदारांच्या दृष्टीने पाच वर्षे दुष्काळ होता. आता प्रत्येक नेता आमिषांचा पाऊस पाडत असल्याचे चित्र निवडणूक लागलेल्या गावागावांत पहायला मिळत आहे. उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये आता प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक गावांमध्ये तिरंगी लढती होत आहेत. वेगवेगळ्या गटाचे उमेदवार दिवसातून अनेकदा मतदारांच्या घराचे उंबरे झिजवत आहेत. कुठली भावकी कुणासोबत याचे अंदाज बांधले जात असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रचार फेऱ्या सुरू होत्या. ज्या मतदानाची खात्री वाटत नाही, तिथे वारंवार जाऊन सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी दबावाचे राजकारण खेळले जात आहे.

काही गावांत मतदार तणावाखाली आहेत. प्रशासनाने या संवेदनशील गावांमध्ये जाऊन पाहणी करण्याची गरज आहे.

बुधवारी सायंकाळी साडेपाचनंतर जाहीर प्रचार करता येणार नसल्याने उमेदवार आणि त्यांचे पॅनलप्रमुख रात्री उशिरापर्यंत वॉच ठेवून आहेत. सहकारी संस्थेत नोकरीला लावण्याचे आश्वासन अनेकांना दिले गेले असल्याने आता नेतेमंडळी किती लोकांना सहकारी संस्थेत नोकरी देणार हा प्रश्न निवडणुकीनंतर उभा राहू शकतो.

अनेक गावांत विकासकामांच्या मुद्द्यांवर प्रचार होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधक देखील सोयीचे राजकारण करत असल्याने वास्तविक विकासाचे मुद्दे बाजूला पडले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये तर पूर्वी केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढण्यात आलेले आहेत. ऐन निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्याने उमेदवार व पॅनल प्रमुखांची गोची होऊ लागलेली दिसते. अनेक गावांत आमदार व त्यांच्याविरोधात विधानसभा लढलेल्या उमेदवारांनी लक्ष घातले आहे. या निवडणुकीतून पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व पुढे येणार असल्याने काहींनी मोर्चेबांधणी हाती घेतलेली आहे, अशा परिस्थितीत मतदारांच्या डोक्यात मात्र गोंधळ दिसून येतो. भावकी, व्यक्तिगत संबंध या आधारावरच मतदार मतदान करणार असल्याचे दिसते.

निवडणूक लागलेल्या एकूण ग्रामपंचायती : ८७८

सदस्य संख्या : ७२६६

प्रभाग संख्या : २८१३

पूर्णत: बिनविरोध ग्रामपंचायती : १२३

अंशत: बिनविरोध ग्रामपंचायती : ९८

बिनविरोध सदस्य : २६३१

निवडणूक लढविणारे उमेदवार : ९५२१

जाहीर प्रचार आज थांबणार

निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार मतदान थांबण्याच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबविण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवार, दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार थांबेल. त्यानंतर मतदारांवर वैयक्तिक दबाव तसेच आमिषे दाखविण्याचे प्रकार वाढणार असल्याने प्रशासनाला जास्त दक्ष राहावे लागणार आहे.