शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विकासासह शेतकऱ्यांनाही होणार फायदा

By admin | Updated: February 27, 2015 23:16 IST

पुणे-मिरज दुहेरी रेल्वेमार्ग : क्रॉसिंंगची समस्या संपुष्टात येणार

कोरेगाव : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरी करण्याचा निर्णय घेतल्याने सातारा जिल्ह्याचा मोठा विकास होणार आहे. औद्योगिक नगरी म्हणून विकसित होत असलेल्या लोणंदपासून शेणोलीपर्यंत शेतकऱ्यांना आपला शेती माल निर्यात करण्याबरोबरच देशाअंतर्गत मोठ्या शहरांमध्ये पाठविता येणार आहे. रेल्वेच्या सध्याच्या मार्गालगत अगोदरच भूसंपादन झाले असल्याने नव्या मार्गासाठी नव्याने भूमिसंपादन करावे लागणार नाही, त्यामुळे केवळ कामाचा श्रीफळ वाढविण्याच्या प्रतीक्षेत जनता आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला कर्नाटक आणि गोवा या राज्यांना जोडणारा रेल्वेमार्ग सातारा जिल्ह्यातून जातो. हा मार्ग जवळचा असून, त्यावर अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये स्थानके उभारण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांत पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे; मात्र एकेरी मार्गामुळे त्यावर मर्यादा येत होत्या. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या दुहेरी करणाला तत्वत: मान्यता दिल्याने याचा जनतेला मोठा फायदा होणार आहे. साधारणत: १२५ किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातो. रेल्वेने सध्याच्या मार्गालगतच यापूर्वी भूमिसंपादन करून ठेवले आहे. १२५ किलोमीटर अंतरामध्ये साधारणत: ४० किलोमीटर दुहेरी वा तिहेरी मार्ग सध्या आहे. ते स्थानकांच्या परिसरात असून, त्याचा वापर सध्या रेल्वे क्रॉसिंगसाठी केला जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी नव्या मार्गासाठी खर्च करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)नवीन पुलाची उभारणी गरजेचीजिल्ह्यातून रेल्वे मार्गासाठी कृष्णा नदी मोठी अडसर ठरणार आहे. सातारा, कोरेगाव आणि कराड तालुक्यांतून वाहत असलेली ही नदी सातत्याने रेल्वेमार्गाला आडवी जात असल्याने त्यावर पुलाची उभारणी करणे गरजेचे ठरणार आहे. त्याचबरोबर वसना नदीसह तत्सम छोट्या नद्या आणि ओढ्यांवर पूल उभारणे क्रमप्राप्त ठरणार आहे. शेतीमालाची वाहतूक वाढण्याची शक्यता रेल्वेमार्ग दुहेरी झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार असून, कारखान्यांसह खासगी कंपन्या व वाहतूकदारांना रेल्वेचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. माल वाहतुकीबरोबरच प्रवाशांची वर्दळ वाढल्यानंतर स्थानकांवरील उलाढाल देखील वाढणार आहे. क्रॉॅसिंगच्या समस्येला मिळणार पूर्णविरामदुहेरी मार्गामुळे क्रॉसिंगच्या समस्येला पूर्णत: मूठमाती मिळणार असून, सध्याचा रटाळ प्रवास जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. सध्या क्रॉसिंंगचे भूत पॅसेंजरवर बसत असल्याने कोल्हापूर-सातारा आणि सातारा-पुणे या अंतरासाठी तब्बल पाच तास प्रवास करावा लागत आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्या वेळापत्रकाप्रमाणे धावत नसल्याने सायंकाळी व रात्री पॅसेंजरमधून प्रवास करणे जिल्हावासीयांना धोक्याचे वाटत आहे.