शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST

कोपर्डे हवेली : सातबारावर पिकांची नोंदणी २०२१ ते २०२२ या महसुली वर्षापासून फक्त मोबाईलमध्ये ॲपच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ...

कोपर्डे हवेली : सातबारावर पिकांची नोंदणी २०२१ ते २०२२ या महसुली वर्षापासून फक्त मोबाईलमध्ये ॲपच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे महसूल खाते प्रयत्न करत असताना त्यामध्ये मर्यादा येऊ लागल्या आहेत. हे कसे करायचे म्हणून शेतकऱ्यांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पिकांची नोंदणी करण्यासाठी गावोगावी शिकाऊ टीम देण्याची मागणी होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप इन्स्टाॅल करुन प्रत्यक्ष शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकांची माहिती या ॲपमध्ये योग्यरित्या अचूकपणे भरून पिकांचा फोटो काढून भरावयाची आहे. यानंतर तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च माहिती भरणे गरजेचे आहे. एका रजिस्टर मोबाईलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येणार आहे. हा कार्यक्रम १५ ऑगस्टपासून ते १५ सप्टेंबरपर्यंतच महसूल खात्याच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. नंतर रब्बी हंगामातील पीक पाहणी सुरू होणार आहे.

याचे शेतकऱ्यांच्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामध्ये वेळेची बचत आणि हेलपाटे घालणे कमी होणार आहे. बॅंकेचे कर्ज घेताना अडचणी निर्माण होणार नाहीत. पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. पीक नोंदणी केली असेल तर त्या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर नुकसानभरपाई मदतीस पात्र असेल. शेतात जंगली प्राण्यांकडून नुकसान झाले तर जाहीर करण्यात आलेली मदत मिळणार आहे. जर आपण नोंदणी केली नाही तर आपले क्षेत्र पड म्हणून दाखविण्यात येईल. त्यामुळे पीक पाहणी नोंदणी होणे गरजेचे आहे.

पीक नोंदणीचा कार्यक्रम जाहीर होऊन पंधरा दिवस झाले तरी त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तलाठी कार्यालय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत तर ज्यांच्याकडे आहेत, त्यांना नोंदणी कशी करायची हे जमत नाही. त्यासाठी गावागावातील शिकाऊ उमदवारांची ई-पीक पाहणी करण्यासाठी सुशिक्षित मोबाईलचे ज्ञान असलेली टीम तयार करून हा कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

कोट

शेतकऱ्यांनी महसूल विभागाला सहकार्य करावे. आम्ही शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये युवा शेतकऱ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे.

दादासाहेब कणसे, तलाठी, कोपर्डे हवेली.

एका ॲण्ड्रॉईड मोबाईलवर २० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीसाठी होऊ शकते. त्याच्याऐवजी १०० संख्या करण्यात यावी तसेच अजून ही पध्दत सुलभ आणि सुटसुटीत करण्यात यावी. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.

सचिन नलवडे... अध्यक्ष, जिल्हा रयत क्रांती शेतकरी संघटना

चौकट

ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी

अनेक शेतकऱ्यांकडे साधे मोबाईल, रेंजचा अभाव, अनेकांना ही पध्दत डोकेदुखी वाटत आहे. काहीवेळेस ॲप डाऊनलोड होत नाही. शेतकऱ्यांच्या एका शेत गट नंबरची नोंद झाली तर दुसऱ्या गट नंबरची नोंद होत नाही, अशाही तक्रारी आहेत.