शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST

कोपर्डे हवेली : सातबारावर पिकांची नोंदणी २०२१ ते २०२२ या महसुली वर्षापासून फक्त मोबाईलमध्ये ॲपच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ...

कोपर्डे हवेली : सातबारावर पिकांची नोंदणी २०२१ ते २०२२ या महसुली वर्षापासून फक्त मोबाईलमध्ये ॲपच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे महसूल खाते प्रयत्न करत असताना त्यामध्ये मर्यादा येऊ लागल्या आहेत. हे कसे करायचे म्हणून शेतकऱ्यांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पिकांची नोंदणी करण्यासाठी गावोगावी शिकाऊ टीम देण्याची मागणी होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप इन्स्टाॅल करुन प्रत्यक्ष शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकांची माहिती या ॲपमध्ये योग्यरित्या अचूकपणे भरून पिकांचा फोटो काढून भरावयाची आहे. यानंतर तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च माहिती भरणे गरजेचे आहे. एका रजिस्टर मोबाईलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येणार आहे. हा कार्यक्रम १५ ऑगस्टपासून ते १५ सप्टेंबरपर्यंतच महसूल खात्याच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. नंतर रब्बी हंगामातील पीक पाहणी सुरू होणार आहे.

याचे शेतकऱ्यांच्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामध्ये वेळेची बचत आणि हेलपाटे घालणे कमी होणार आहे. बॅंकेचे कर्ज घेताना अडचणी निर्माण होणार नाहीत. पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. पीक नोंदणी केली असेल तर त्या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर नुकसानभरपाई मदतीस पात्र असेल. शेतात जंगली प्राण्यांकडून नुकसान झाले तर जाहीर करण्यात आलेली मदत मिळणार आहे. जर आपण नोंदणी केली नाही तर आपले क्षेत्र पड म्हणून दाखविण्यात येईल. त्यामुळे पीक पाहणी नोंदणी होणे गरजेचे आहे.

पीक नोंदणीचा कार्यक्रम जाहीर होऊन पंधरा दिवस झाले तरी त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तलाठी कार्यालय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत तर ज्यांच्याकडे आहेत, त्यांना नोंदणी कशी करायची हे जमत नाही. त्यासाठी गावागावातील शिकाऊ उमदवारांची ई-पीक पाहणी करण्यासाठी सुशिक्षित मोबाईलचे ज्ञान असलेली टीम तयार करून हा कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

कोट

शेतकऱ्यांनी महसूल विभागाला सहकार्य करावे. आम्ही शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये युवा शेतकऱ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे.

दादासाहेब कणसे, तलाठी, कोपर्डे हवेली.

एका ॲण्ड्रॉईड मोबाईलवर २० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीसाठी होऊ शकते. त्याच्याऐवजी १०० संख्या करण्यात यावी तसेच अजून ही पध्दत सुलभ आणि सुटसुटीत करण्यात यावी. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.

सचिन नलवडे... अध्यक्ष, जिल्हा रयत क्रांती शेतकरी संघटना

चौकट

ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी

अनेक शेतकऱ्यांकडे साधे मोबाईल, रेंजचा अभाव, अनेकांना ही पध्दत डोकेदुखी वाटत आहे. काहीवेळेस ॲप डाऊनलोड होत नाही. शेतकऱ्यांच्या एका शेत गट नंबरची नोंद झाली तर दुसऱ्या गट नंबरची नोंद होत नाही, अशाही तक्रारी आहेत.