शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

ऊसतोड मजुरांचा संकटांशी सामना

By admin | Updated: December 2, 2015 00:35 IST

\दररोजच जिवाशी खेळ : बैलगाडीचा समतोल सांभाळण्यासाठी लोंबकळण्याचा धोकादायक प्रयत्न

इरफान मुजावर--पट्टणकोडोली --बैलगाडीतून कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ऊसतोड मजुरांना रस्त्यामध्ये अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या चढ-उतारामुळे गाडीचा बिघडलेला समतोल सांभाळण्यासाठी कधी स्वत:च ‘जु’ला लोंबकळावे लागत आहे; तर कधी गाडीचा वेग आवरण्यासाठी हातात लाकडी ओंडका घेऊन ब्रेक लावण्याचा धोकादायक प्रयत्न करावा लागत आहे. यातून आपल्या जिवावर बेतण्याची शक्यता माहीत असतानाही केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलांवरून आलेले ऊसतोड मजूर कुटुंबासमवेत दररोजच जिवाशी खेळत आहेत.ऊसतोड मजूर कारखान्यांना बैलगाडीतून ऊस वाहतूक करतात. कडाक्याच्या थंडीत ऊसतोड करून रखरखत्या उन्हात ऊस वाहतूक करताना या मजुरांपुढे अनेक समस्या आवासून उभ्या राहतात. बहुतांशी ऊस वाहतूक बैलगाडीतून केली जाते. साखर कारखान्यापर्यंत पोहोच होईपर्यंत वेगवेगळ््या धोक्यांना या गाडीवानांना सामोरे जावे लागते. शेतामधील रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतवाहिन्यांचे जाळेच आहे. यातील काही ठिकाणी विद्युतवाहिन्या लोंबकळत आहेत. या वाहिन्यांना चुकवतच गाडीवानाला ऊस वाहतूक करावी लागते. या विद्युत वाहिन्यांचा थोडासा स्पर्शही त्यांच्या मृत्यूला आमंत्रण देणारा ठरू शकतो.बैलगाडी डांबरी रस्त्यावर आली की, बैलांचे पाय घसरून गाडीला मोठा अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. कारखान्यापर्यंत जाईपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यात चढ-उतार असतात. यावेळी बैलगाडीचा समतोल बिघडतो. अशा प्रसंगात गाडीवान आपल्या बैलांचा कासरा अर्धांगिनीच्या हातामध्ये देऊन स्वत: खाली उतरून चढतीला बैलगाडीच्या ‘जू’लाच लोंबकळून गाडीचा समतोल राखण्याचा धोकादायक प्रयत्न करतो. तर उतरतीलाही गाडीचा वेग आवरण्यासाठी हातामध्ये लाकडी ओंडका घेऊन गाडीचा वेग नियंत्रित करावा लागतो. अशा सर्व धोक्यांना सामोरे जाऊनच ऊस वाहतूक करावी लागते. ऊस वाहतूक करताना गाडीवानाचे संपूर्ण कुटुंबच गाडीवर बसलेले असते. साधी एखादी चूकही कुटुंबाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असतानाही हे ऊसतोड मजूर पोटासाठी धोकादायक परिस्थितीतही ऊस वाहतूक करतात.ऊस वाहतूक करताना बैलांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गाडीवानाला बैलांच्या मदतीसाठी खारीचा वाटा हा उचलावाच लागतो. तेही जीव मुठीत घेऊन. यातूनच अनेक अपघात होऊन अनेक बैलांचा मृत्यू झाला असून, अनेकजणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी गाडीवान हे धोकादायक पाऊल उचलत आहेत. आधुनिक गाड्या द्या ! साखर कारखान्यांकडून ऊसतोड मजुरांना दिल्या जाणाऱ्या बैलगाड्या या जुन्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे बैलगाड्या तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाडीच्या बनावटीमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करताना होणारे अपघात टाळता येतील.