शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांचा संकटांशी सामना

By admin | Updated: December 2, 2015 00:35 IST

\दररोजच जिवाशी खेळ : बैलगाडीचा समतोल सांभाळण्यासाठी लोंबकळण्याचा धोकादायक प्रयत्न

इरफान मुजावर--पट्टणकोडोली --बैलगाडीतून कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ऊसतोड मजुरांना रस्त्यामध्ये अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या चढ-उतारामुळे गाडीचा बिघडलेला समतोल सांभाळण्यासाठी कधी स्वत:च ‘जु’ला लोंबकळावे लागत आहे; तर कधी गाडीचा वेग आवरण्यासाठी हातात लाकडी ओंडका घेऊन ब्रेक लावण्याचा धोकादायक प्रयत्न करावा लागत आहे. यातून आपल्या जिवावर बेतण्याची शक्यता माहीत असतानाही केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलांवरून आलेले ऊसतोड मजूर कुटुंबासमवेत दररोजच जिवाशी खेळत आहेत.ऊसतोड मजूर कारखान्यांना बैलगाडीतून ऊस वाहतूक करतात. कडाक्याच्या थंडीत ऊसतोड करून रखरखत्या उन्हात ऊस वाहतूक करताना या मजुरांपुढे अनेक समस्या आवासून उभ्या राहतात. बहुतांशी ऊस वाहतूक बैलगाडीतून केली जाते. साखर कारखान्यापर्यंत पोहोच होईपर्यंत वेगवेगळ््या धोक्यांना या गाडीवानांना सामोरे जावे लागते. शेतामधील रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतवाहिन्यांचे जाळेच आहे. यातील काही ठिकाणी विद्युतवाहिन्या लोंबकळत आहेत. या वाहिन्यांना चुकवतच गाडीवानाला ऊस वाहतूक करावी लागते. या विद्युत वाहिन्यांचा थोडासा स्पर्शही त्यांच्या मृत्यूला आमंत्रण देणारा ठरू शकतो.बैलगाडी डांबरी रस्त्यावर आली की, बैलांचे पाय घसरून गाडीला मोठा अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. कारखान्यापर्यंत जाईपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यात चढ-उतार असतात. यावेळी बैलगाडीचा समतोल बिघडतो. अशा प्रसंगात गाडीवान आपल्या बैलांचा कासरा अर्धांगिनीच्या हातामध्ये देऊन स्वत: खाली उतरून चढतीला बैलगाडीच्या ‘जू’लाच लोंबकळून गाडीचा समतोल राखण्याचा धोकादायक प्रयत्न करतो. तर उतरतीलाही गाडीचा वेग आवरण्यासाठी हातामध्ये लाकडी ओंडका घेऊन गाडीचा वेग नियंत्रित करावा लागतो. अशा सर्व धोक्यांना सामोरे जाऊनच ऊस वाहतूक करावी लागते. ऊस वाहतूक करताना गाडीवानाचे संपूर्ण कुटुंबच गाडीवर बसलेले असते. साधी एखादी चूकही कुटुंबाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असतानाही हे ऊसतोड मजूर पोटासाठी धोकादायक परिस्थितीतही ऊस वाहतूक करतात.ऊस वाहतूक करताना बैलांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गाडीवानाला बैलांच्या मदतीसाठी खारीचा वाटा हा उचलावाच लागतो. तेही जीव मुठीत घेऊन. यातूनच अनेक अपघात होऊन अनेक बैलांचा मृत्यू झाला असून, अनेकजणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी गाडीवान हे धोकादायक पाऊल उचलत आहेत. आधुनिक गाड्या द्या ! साखर कारखान्यांकडून ऊसतोड मजुरांना दिल्या जाणाऱ्या बैलगाड्या या जुन्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे बैलगाड्या तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाडीच्या बनावटीमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करताना होणारे अपघात टाळता येतील.