शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अपेक्षा लवंगीची... फुटला अ‍ॅटमबॉम्ब!

By admin | Updated: October 20, 2014 22:36 IST

उत्कृष्ट तयारी : विक्रमसिंह पाटणकरांच्या बालेकिल्ल्यातील गावांमध्येही शंभूराजांनी पाच वर्षांत उभारले जाळे

अरुण पवार - पाटण -नेहमीप्रमाणे हजार-पाचशेच्या घरात जय-पराजय ठरेल, असा अंदाज असतानाच १८८२४ चे भरभक्कम मताधिक्य घेऊन शंभूराज देसाई विधानसभेत प्रवेशकर्ते झाले आणि दिवाळीच्या तोंडावर लवंगी फटाके फुटण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पाटण मतदारसंघात चक्क अ‍ॅटमबॉम्ब फुटला! मागील निवडणुकीत अत्यल्प मताधिक्याने विक्रमसिंह पाटणकर निवडून आले होते. पराभवाचे शल्य नुसतेच मनात न बाळगता शंभूराज देसाई यांनी २००९ नंतर लगेच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केल्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे.२००९ मध्ये केवळ ५८० मतांनी झालेला पराभव चटका लावणारा असला तरी दुसऱ्यात दिवशी बाहेर पडून २०१४ च्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांनी अगदी मतदान तोंडावर येईपर्यंत मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला. प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर जाऊन, ‘आमदार पाटणकर तुमच्या गावात आले का,’ याच मुद्द्याला हात घालून प्रचार केला. दुसरीकडे, आमदार असूनही जनसंपर्कासाठी कमी वेळ दिल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची फळी दुबळी निघाल्यामुळे पाटणकर पिता-पुत्रांना मोठा पराभव सहन करावा लागला. त्यातच पाटण, कोयना या त्यांच्या बालेकिल्ल्यातीलच १२ हजारांचे मताधिक्य गायब झाले. त्याच्या कारणांचा पाटणकर शोध घेतीलच; पण काही जणांनी पडद्याआड राहून शंभूराज देसाईंना मदत केल्यामुळेच हा बालेकिल्ला हातून गेल्याची चर्चा आहे.आजतागायत शंभूराज देसाईंना कोयना विभागातील गावांमधून कधीच मताधिक्य मिळाले नव्हते, ते मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत मिळाले. ते १६० इतके होते. तिथेच पाटणकर गटाचे रथी-महारथी अवाक झाले. त्यानंतर कोयना (हेळवाक) व पाटण गटातून सत्यजित पाटणकरांना जवळपास १५ हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते, ते तीन हजारांवर घसरले. यातच शंभूराज देसाईंचा गनिमी कावा यशस्वी झाल्याचे दिसून आले. पाटण शहरातील एक-दोन मतदानकेंद्रांवर तर देसाई-पाटणकर ‘फिफ्टी-फिफ्टी’ कौल निघाला. शंभूराज यांचा घरचा मतदारसंघ मरळी-मोरणा भाग तर यावेळी पेटून उठल्याचे दिसून आले. या ठिकाणी जवळपास ४ हजारांचे मताधिक्य देसाईंना मिळाले. त्यानंतर चाफळ-तारळे विभागातील गावांनीदेखील पाटणकरांना साथ दिली नसल्याचे दिसून आले. म्हणूनच शंभूराज देसाई १४ व्या फेरीपर्यंत सत्यजित पाटणकरांना जोरदार टक्कर देत राहिले. त्यानंतर मल्हारपेठ, ढेबेवाडी, कुंभारगाव, सुपने, तांबवे या विभागातील सर्व गावांनी शंभूराजांना डोक्यावर घेतल्याचे दिसले. एकंदरीत मतदारसंघातील सर्वच विभागांतून शंभूराज देसाई अग्रेसर राहिले आणि पाटणकर पिता-पुत्रांचे नियोजन कोलमडल्याचे निकालावरून दिसून आले. (प्रतिनिधी)सत्यजित यांना स्वीकारले नाहीतत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांना मंत्रिपदही मिळाले होते. त्यापूर्वी २० वर्षे आमदार असल्याने त्यांचा कार्यकर्ता प्रत्येक गावात भक्कम होता. विक्रमसिंहांच्या विचारसरणीच्या व्यक्ती गावेच्या गावे सांभाळत. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी सत्यजितसिंहांना पुढे केले. त्यातच गुणाचा ‘ईगो’ दुखावला, तर कुणाची नापसंती, यामुळे पाटणकर गटात चैतन्य दिसले नाही. विक्रमसिंह मैदानात असते तर कदाचित चित्र काहीसे वेगळे दिसले असते.चिकाटी कामी आलीपाटणकरांच्या ध्यानी-मनीही नसेल, तेव्हापासून शंभूराज यांनी पाटण तालुका गाववार पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. जाईल तेथे, प्रत्येक गावात कार्यकर्ते ‘चार्ज’ केले. नुसतेच ‘चार्ज’ केले नाहीत तर ते शेवटपर्यंत तसेच राहतील याची काळजी घेतली. त्यामुळे देसार्इंची सुप्त लाट सतत तालुक्यात राहिली. मतदारांनी केली तुलनाशंभूराज देसाई विक्रमसिंह पाटणकरांशी निकराने झुंजले, यातच त्यांचा आक्रमक स्वभाव मतदारांना भावला. सतत काठावरचा पराभव होतो, ही सहानुभूती होतीच.दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांचा शांत, मितभाषी स्वभाव आणि वक्तृत्वही काहीसे फिके. तरुण मतदारांनी या दोहोंची या बाबतीत तुलना केल्याचे जाणवले.भूमिका स्पष्ट केल्याचा फायदाशंभूराज देसाई शिवसेनेचे; मात्र तालुक्यात ‘देसाई गट’ म्हणूनच गवगवा. केंद्रात मोदी सरकार आले, तशी देसाईंनी आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेचे वातावरण तयार केले. उद्धव ठाकरे यांना पाटणमध्ये आणून सभा घेतली. याचा फायदा झाला आणि तालुक्यातील मुंबईकर-पुणेकर देसाईंचे झाले.