शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करा

By admin | Updated: February 23, 2015 23:55 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : स्वस्त धान्य दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ‘बीपीएल’ आणि ‘एपीएल’ यांच्या भ्रष्ट अंदाजांच्या पायावर उभ्या असलेल्या लक्ष्याधारित वितरण व्यवस्थेला स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी सामान्य लोकांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात स्वस्त धान्य दुकानदार चळवळीच्या अग्रभागी राहतील, असा इशारा या दुकानदारांच्या महासंघाने दिला आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत १ लाख ५ हजार परवानाधारक असून, त्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने देशव्यापी मागणी दिनाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.अन्नसुरक्षा कायदा लागू करताना २०१५ ची कुटुंबसंख्या विचारात घेऊन ग्रामीण भागात ७६ टक्के लाभार्थ्यांना लाभ मिळावा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू, तांदळाबरोबरच डाळी, खाद्यतेल, साखर व इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, अंत्योदय शिधापत्रिकाधारकाप्रमाणे अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना ३५ किलो धान्य मिळावे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत केरोसिन कोट्यात दिवसेंदिवस होत असलेली कपात विचारात घेऊन केरोसिन विक्रेत्यांना किरकोळ गॅस विक्री परवाने द्यावेत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय ‘बीपीएल’ केशरी कार्डधारकांना साखर उपलब्ध करून द्यावी, विक्री कमिशनमध्ये वाढ करावी, सार्वजनिक वितरणातील सर्व परवानाधारकांना एक परवाना दोन कुटुंबे आधार मानून मानधन, महागाई भत्त्याशी जोडले जावे, अशा मागण्या करण्यात आल्या.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आॅनलाइन प्रणाली राबवून पारदर्शकता आणावी, या व्यवस्थेत कोणतेही बदल करताना परवानाधारक प्रतिनिधी आणि लाभार्थ्यांनाही निर्णयप्रक्रियेत घ्यावे, रोख अनुदानाऐवजी धान्यच द्यावे, शांताकुमार समितीच्या जनविरोधी शिफारशी रद्द कराव्यात, शालेय पोषण आहार, रोजगार हमी या मालाचे वितरण करणाऱ्या दुकानदारांची थकित रक्कम द्यावी आणि स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. (प्रतिनिधी)शेतकरीही संकटातसरकार धान्य गोळा करण्यात कपात करणार असल्याने शेतकऱ्यांना बड्या शेतकी कंपन्या आणि दलालांच्या मर्जीवर राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडणार आहेत. ‘एफसीआय’ संपुष्टात आणून खासगी कंपन्यांच्या हवाली करण्यासाठी धान्यांच्या किमती, साठेबाजी आणि सौदेबाजी जोडल्या गेल्यास विदारक परिस्थिती निर्माण होईल. अशा प्रकारच्या दुरुस्त्यांच्या आधारे अन्नसुरक्षा कायद्यात ढवळाढवळ करण्याच्या या हालचालींना संघटना ठामपणे विरोध करेल, असे निवेदनात म्हटले आहे.