शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करा

By admin | Updated: February 23, 2015 23:55 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : स्वस्त धान्य दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ‘बीपीएल’ आणि ‘एपीएल’ यांच्या भ्रष्ट अंदाजांच्या पायावर उभ्या असलेल्या लक्ष्याधारित वितरण व्यवस्थेला स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी सामान्य लोकांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात स्वस्त धान्य दुकानदार चळवळीच्या अग्रभागी राहतील, असा इशारा या दुकानदारांच्या महासंघाने दिला आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत १ लाख ५ हजार परवानाधारक असून, त्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने देशव्यापी मागणी दिनाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.अन्नसुरक्षा कायदा लागू करताना २०१५ ची कुटुंबसंख्या विचारात घेऊन ग्रामीण भागात ७६ टक्के लाभार्थ्यांना लाभ मिळावा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू, तांदळाबरोबरच डाळी, खाद्यतेल, साखर व इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, अंत्योदय शिधापत्रिकाधारकाप्रमाणे अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना ३५ किलो धान्य मिळावे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत केरोसिन कोट्यात दिवसेंदिवस होत असलेली कपात विचारात घेऊन केरोसिन विक्रेत्यांना किरकोळ गॅस विक्री परवाने द्यावेत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय ‘बीपीएल’ केशरी कार्डधारकांना साखर उपलब्ध करून द्यावी, विक्री कमिशनमध्ये वाढ करावी, सार्वजनिक वितरणातील सर्व परवानाधारकांना एक परवाना दोन कुटुंबे आधार मानून मानधन, महागाई भत्त्याशी जोडले जावे, अशा मागण्या करण्यात आल्या.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आॅनलाइन प्रणाली राबवून पारदर्शकता आणावी, या व्यवस्थेत कोणतेही बदल करताना परवानाधारक प्रतिनिधी आणि लाभार्थ्यांनाही निर्णयप्रक्रियेत घ्यावे, रोख अनुदानाऐवजी धान्यच द्यावे, शांताकुमार समितीच्या जनविरोधी शिफारशी रद्द कराव्यात, शालेय पोषण आहार, रोजगार हमी या मालाचे वितरण करणाऱ्या दुकानदारांची थकित रक्कम द्यावी आणि स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. (प्रतिनिधी)शेतकरीही संकटातसरकार धान्य गोळा करण्यात कपात करणार असल्याने शेतकऱ्यांना बड्या शेतकी कंपन्या आणि दलालांच्या मर्जीवर राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडणार आहेत. ‘एफसीआय’ संपुष्टात आणून खासगी कंपन्यांच्या हवाली करण्यासाठी धान्यांच्या किमती, साठेबाजी आणि सौदेबाजी जोडल्या गेल्यास विदारक परिस्थिती निर्माण होईल. अशा प्रकारच्या दुरुस्त्यांच्या आधारे अन्नसुरक्षा कायद्यात ढवळाढवळ करण्याच्या या हालचालींना संघटना ठामपणे विरोध करेल, असे निवेदनात म्हटले आहे.