शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

जपानी पर्यटकांनाही भुरळ

By admin | Updated: September 11, 2016 00:25 IST

हंगाम फुलांचा : विदेशी पाहुण्यांसह विश्वास नांगरे-पाटील फुलं पाहण्यासाठी पठारावर

पेट्री : जैवविविधतेने नटलेल्या कास पठाराने आपल्या दुर्मीळ विविधरंगी फुलांच्या गालिच्याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली. फुलांचा हंगाम सुरू होताच देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देऊ लागले आहेत. जपानच्या परदेशी पाहुण्यांनी कास पठाराला भेट दिली. पठारावरील फुलं पाहून भारावलेल्या या परदेशी पाहुण्यांनीही आपल्या भाषेत ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ म्हणजेच ‘खूप सुंदर फुले’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, शनिवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही सहकुटुंब पठारावर हजेरी लावली. सातारा शहराच्या पश्चिमेस असलेले कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आाहे. विविधरंगी दुर्मीळ फुले हेच या पठाराचे मुख्य वैशिष्ट्य. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने असंख्य पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. विस्तृत पठार, ठिकठिकाणी कोसळणारे छोटे छोटे धबधबे, हवेतील थंडगार गारवा, चोहोबाजूला हिरवा निसर्ग, अधूनमधून दिसणारी धुक्याची दुलई त्यात नजर जाईल तिकडे विविधरंगी दुर्मीळ फुलांचे ताटवे असा मनाला मोहिनीटाकणारा स्वर्गीय सौंदर्याचा निसर्ग परदेशी पाहुण्यांना भुरळ पाडत आहे. चालू वर्षी कास पठाराला भेट देणाऱ्या जपानच्या परदेशी पाहुण्यांनी गतवर्षी देखील कास पठाराला फुलांच्या हंगामात भेट दिली होती. यंदाही जपानमधील काही पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. तसेच येथील प्रत्येक फुलाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागताना या पाहुण्यांनी ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ असं सांगून कासची फुले किती सुंदर आहे हे आपल्या भाषेत सांगितले.या अगोदर इंग्लड, जर्मनी या देशांतील परदेशी पाहुण्यांनीही कास पठाराला भेट दिली आहे. (वार्ताहर)गेंद, सीतेची आसवे, तेरडा या फुलांना आला बहरसध्या पठारावर निळी, लाल, पांढरी तसेच काही ठिकाणी पिवळ्या रंगाची फुले फुललेली दिसत असून, विविधरंगी फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. यामुळे कास पठार फुलांबरोबर हजारो पर्यटकांनी देखील बहरू लागले आहे. गेंद, सीतेची असवे, तेरडा असा एकत्रित विविधरंगी फुलांचा गालिचा पाहणे ही पर्यटकांसाठी आनंदाचीच पर्वणी असते. अशी पर्वणी अनुभवण्यास सुरुवात झाली असून, कित्येक पर्यटक हे नयनरम्य दृश्य आपापल्या कॅमेऱ्यात बंद करताना दिसत आहेत. हा फुलांचा हंगाम जास्त काळ टिकून राहण्यासाठी ऊन व पाऊस असे पोषक वातावरण राहणे अत्यावश्यक आहे. यामळे संपूर्णत: मदार निसर्गावर अवलंबून राहणार आहे.