शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जपानी पर्यटकांनाही भुरळ

By admin | Updated: September 11, 2016 00:25 IST

हंगाम फुलांचा : विदेशी पाहुण्यांसह विश्वास नांगरे-पाटील फुलं पाहण्यासाठी पठारावर

पेट्री : जैवविविधतेने नटलेल्या कास पठाराने आपल्या दुर्मीळ विविधरंगी फुलांच्या गालिच्याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली. फुलांचा हंगाम सुरू होताच देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देऊ लागले आहेत. जपानच्या परदेशी पाहुण्यांनी कास पठाराला भेट दिली. पठारावरील फुलं पाहून भारावलेल्या या परदेशी पाहुण्यांनीही आपल्या भाषेत ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ म्हणजेच ‘खूप सुंदर फुले’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, शनिवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही सहकुटुंब पठारावर हजेरी लावली. सातारा शहराच्या पश्चिमेस असलेले कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आाहे. विविधरंगी दुर्मीळ फुले हेच या पठाराचे मुख्य वैशिष्ट्य. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने असंख्य पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. विस्तृत पठार, ठिकठिकाणी कोसळणारे छोटे छोटे धबधबे, हवेतील थंडगार गारवा, चोहोबाजूला हिरवा निसर्ग, अधूनमधून दिसणारी धुक्याची दुलई त्यात नजर जाईल तिकडे विविधरंगी दुर्मीळ फुलांचे ताटवे असा मनाला मोहिनीटाकणारा स्वर्गीय सौंदर्याचा निसर्ग परदेशी पाहुण्यांना भुरळ पाडत आहे. चालू वर्षी कास पठाराला भेट देणाऱ्या जपानच्या परदेशी पाहुण्यांनी गतवर्षी देखील कास पठाराला फुलांच्या हंगामात भेट दिली होती. यंदाही जपानमधील काही पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. तसेच येथील प्रत्येक फुलाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागताना या पाहुण्यांनी ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ असं सांगून कासची फुले किती सुंदर आहे हे आपल्या भाषेत सांगितले.या अगोदर इंग्लड, जर्मनी या देशांतील परदेशी पाहुण्यांनीही कास पठाराला भेट दिली आहे. (वार्ताहर)गेंद, सीतेची आसवे, तेरडा या फुलांना आला बहरसध्या पठारावर निळी, लाल, पांढरी तसेच काही ठिकाणी पिवळ्या रंगाची फुले फुललेली दिसत असून, विविधरंगी फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. यामुळे कास पठार फुलांबरोबर हजारो पर्यटकांनी देखील बहरू लागले आहे. गेंद, सीतेची असवे, तेरडा असा एकत्रित विविधरंगी फुलांचा गालिचा पाहणे ही पर्यटकांसाठी आनंदाचीच पर्वणी असते. अशी पर्वणी अनुभवण्यास सुरुवात झाली असून, कित्येक पर्यटक हे नयनरम्य दृश्य आपापल्या कॅमेऱ्यात बंद करताना दिसत आहेत. हा फुलांचा हंगाम जास्त काळ टिकून राहण्यासाठी ऊन व पाऊस असे पोषक वातावरण राहणे अत्यावश्यक आहे. यामळे संपूर्णत: मदार निसर्गावर अवलंबून राहणार आहे.