शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल ओतले’; ४० ते ६० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

सातारा : मागील तीन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत; तर यापुढेही तेलाचा भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ...

सातारा : मागील तीन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत; तर यापुढेही तेलाचा भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, मागील वर्षातील मार्च महिन्याचा व आताचा विचार करता, एक लिटरच्या खाद्यतेलाच्या पिशवीमागे ४० ते ६० रुपयांची वाढ झालेली आहे.

देशात खाद्यतेलाला मोठी मागणी असते. कोणताही पदार्थ बनवायचा झाला तर तेलाशिवाय पर्याय नसतो. तसेच सण, समारंभ, विवाह सोहळे, विविध कार्यक्रम अशामध्ये खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण, भारतात खाद्यतेलाचे पाहिजे तेवढ्या प्रमाणात उत्पादन होत नाही. भारताची गरज भागविण्यासाठी बाहेरील देशातून खाद्यतेल आयात करावे लागते. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत आपल्या गरजेसाठी पाश्चात्त्य देशांतून ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो; तर ३० टक्के तेलाची निर्मिती ही भारतात होते.

सातारा जिल्ह्याचा विचार करता सूर्यफूल, शेंगदाणा, सोयबीन, पामतेल या खाद्यतेलांचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. मात्र, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल अधिक वापरण्यात येते. मागील वर्षभरात या खाद्यतेलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांना खर्चाचा ताळमेळ घालताना मोठी कसरत करावी लागत आहे.

खाद्यतेलाच्या एक लिटरच्या पिशवीबरोबर १५ किलोच्या डब्याचेही दर वाढले आहेत. मागील आठवड्यात १५ किलोंचा सूर्यफूल तेलाचा डबा २५०० ते २५५०, सोयाबीन २१०० ते २२००; तर शेंगदाणा तेलाचा डबा २४०० ते २६०० पर्यंत होता. मागील वर्षभराचा विचार करता डब्यामागे सरासरी ८०० रुपये वाढले आहेत.

..........................

खाद्यतेलाचा दर (प्रतिलिटर)

मार्च २०२० मार्च २०२१

सूर्यफूल १०० १७०

शेंगदाणा १४० १७०

पामतेल ८० १२०

सोयाबीन ९० १३५

राईस ब्रॅन १२० १५०

....................................

सूर्यफूल १७०

पामतेल १२०

......................

मार्चमध्ये उच्चांकी वाढ

मागील तीन महिन्यांत तेलाचे दर वाढले आहे; पण, मार्च महिन्यात उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून आले.

..............................................

कशामुळे झाली भाववाढ...

भारतात जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात होते; तर कोरोनामुळे पाश्चात्त्य देशातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. संबंधित देशांनी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी निर्यात कर वाढविला. त्यामुळे भारतात खाद्यतेलांचा दर वाढतच चालला आहे.

....................................................

गृहिणींच्या प्रतिक्रिया...

प्रत्येक घराचा महिन्याचा खर्च ठरलेला असतो. त्यानुसार नियोजन होते. पण, गेल्या काही महिन्यांत खाद्यतेलाचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे. काटकसर करावी लागत आहे. खाद्यतेलाचे दर कमी करून दिलासा देण्याची गरज आहे.

- शीतल देशमुख, सातारा

.........................

कोरोना विषाणू आल्यापासून महागाईची हद्दच झाली आहे. इंधन असो किंवा सिलिंडर टाकी यांचे भाव वाढतच चालले आहेत. त्यातच खाद्यतेलाचा दर वाढल्याने भाजीला फोडणी देताना विचार करावा लागतो. सर्वसामान्यांना तर याचा मोठा फटका बसलेला आहे.

- पुष्पलता आटपाडकर, कुरणेवाडी

.......................................

महागाई वाढतच चालली आहे. यातून सामान्य तसेच ज्यांची आर्थिक स्थिती बरी आहे, तेही सुटलेले नाहीत. आता तर खाद्यतेलाचा दर सतत उच्चांक करीत आहे. यामुळे किचन बजेट खऱ्या अर्थाने कोलमडले आहे. वर्षभरात तेल पिशवीमागे ५० रुपयांची वाढ झाली आहे.

- शालन पाटील, सातारा

...........................................................

भारतात परदेशातून ७० टक्के खाद्यतेल आयात होते. त्यामुळे तेलावर आपण बहुतांश पाश्चात्त्य देशांवर अवलंबून आहे. खाद्यतेल उत्पादक देशांनी कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढविला आहे. यामुळे आपल्याकडे दर वाढत चालले आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

...................................................................................