शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल ओतले’; ४० ते ६० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

सातारा : मागील तीन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत; तर यापुढेही तेलाचा भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ...

सातारा : मागील तीन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत; तर यापुढेही तेलाचा भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, मागील वर्षातील मार्च महिन्याचा व आताचा विचार करता, एक लिटरच्या खाद्यतेलाच्या पिशवीमागे ४० ते ६० रुपयांची वाढ झालेली आहे.

देशात खाद्यतेलाला मोठी मागणी असते. कोणताही पदार्थ बनवायचा झाला तर तेलाशिवाय पर्याय नसतो. तसेच सण, समारंभ, विवाह सोहळे, विविध कार्यक्रम अशामध्ये खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण, भारतात खाद्यतेलाचे पाहिजे तेवढ्या प्रमाणात उत्पादन होत नाही. भारताची गरज भागविण्यासाठी बाहेरील देशातून खाद्यतेल आयात करावे लागते. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत आपल्या गरजेसाठी पाश्चात्त्य देशांतून ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो; तर ३० टक्के तेलाची निर्मिती ही भारतात होते.

सातारा जिल्ह्याचा विचार करता सूर्यफूल, शेंगदाणा, सोयबीन, पामतेल या खाद्यतेलांचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. मात्र, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल अधिक वापरण्यात येते. मागील वर्षभरात या खाद्यतेलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांना खर्चाचा ताळमेळ घालताना मोठी कसरत करावी लागत आहे.

खाद्यतेलाच्या एक लिटरच्या पिशवीबरोबर १५ किलोच्या डब्याचेही दर वाढले आहेत. मागील आठवड्यात १५ किलोंचा सूर्यफूल तेलाचा डबा २५०० ते २५५०, सोयाबीन २१०० ते २२००; तर शेंगदाणा तेलाचा डबा २४०० ते २६०० पर्यंत होता. मागील वर्षभराचा विचार करता डब्यामागे सरासरी ८०० रुपये वाढले आहेत.

..........................

खाद्यतेलाचा दर (प्रतिलिटर)

मार्च २०२० मार्च २०२१

सूर्यफूल १०० १७०

शेंगदाणा १४० १७०

पामतेल ८० १२०

सोयाबीन ९० १३५

राईस ब्रॅन १२० १५०

....................................

सूर्यफूल १७०

पामतेल १२०

......................

मार्चमध्ये उच्चांकी वाढ

मागील तीन महिन्यांत तेलाचे दर वाढले आहे; पण, मार्च महिन्यात उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून आले.

..............................................

कशामुळे झाली भाववाढ...

भारतात जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात होते; तर कोरोनामुळे पाश्चात्त्य देशातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. संबंधित देशांनी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी निर्यात कर वाढविला. त्यामुळे भारतात खाद्यतेलांचा दर वाढतच चालला आहे.

....................................................

गृहिणींच्या प्रतिक्रिया...

प्रत्येक घराचा महिन्याचा खर्च ठरलेला असतो. त्यानुसार नियोजन होते. पण, गेल्या काही महिन्यांत खाद्यतेलाचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे. काटकसर करावी लागत आहे. खाद्यतेलाचे दर कमी करून दिलासा देण्याची गरज आहे.

- शीतल देशमुख, सातारा

.........................

कोरोना विषाणू आल्यापासून महागाईची हद्दच झाली आहे. इंधन असो किंवा सिलिंडर टाकी यांचे भाव वाढतच चालले आहेत. त्यातच खाद्यतेलाचा दर वाढल्याने भाजीला फोडणी देताना विचार करावा लागतो. सर्वसामान्यांना तर याचा मोठा फटका बसलेला आहे.

- पुष्पलता आटपाडकर, कुरणेवाडी

.......................................

महागाई वाढतच चालली आहे. यातून सामान्य तसेच ज्यांची आर्थिक स्थिती बरी आहे, तेही सुटलेले नाहीत. आता तर खाद्यतेलाचा दर सतत उच्चांक करीत आहे. यामुळे किचन बजेट खऱ्या अर्थाने कोलमडले आहे. वर्षभरात तेल पिशवीमागे ५० रुपयांची वाढ झाली आहे.

- शालन पाटील, सातारा

...........................................................

भारतात परदेशातून ७० टक्के खाद्यतेल आयात होते. त्यामुळे तेलावर आपण बहुतांश पाश्चात्त्य देशांवर अवलंबून आहे. खाद्यतेल उत्पादक देशांनी कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढविला आहे. यामुळे आपल्याकडे दर वाढत चालले आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

...................................................................................