शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

भरपूर खा.. मनसोक्त खेळा.. एन्जॉय करा!

By admin | Updated: April 2, 2016 00:04 IST

दहावीनंतरची सुटी : हे करायचं राहूनच गेलं असं वाटायला नको

प्रगती जाधव-पाटील -- सातारा --दहावीचं वर्ष म्हणून एप्रिलपासूनच मुलं अभ्यासाला लागलेली असतात. ते आता परीक्षेनंतर रिकामी झाली आहेत. सुटीत अवांतरचं दडपण घेण्यापेक्षा भरपूर खा.. मनसोक्त खेळा अन् एन्जॉय करण्यास हरकत नाही. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने पालक जरा जास्तच जागरूक असल्याचे पाहण्यास मिळते. त्यामुळे दहावीची परीक्षा झाली की, कोठे पेन्टिंग, इंग्लिश स्पीकिंगपासून ते अनेक क्लासेसची भूत मानगुटीवर बसवले जात आहे. हे प्रमाण काही वर्षांपूर्वी शहरात होते; पण त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पसरत आहे.वास्तविक पाहता बारावीचं वर्ष ज्याप्रमाणे टर्निंग पॉइंट असते. त्याचप्रमाणे काही अनुभवासाठी महत्त्वपूर्ण असते. अकरावीची परीक्षा झाल्याबरोबर बारावीचा अभ्यास सुरू होतो. त्यानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, त्यानंतर महाविद्यालयाचे टेन्शन, नोकरीचा शोध हे चक्र सुरू होते. त्यानंतर आपण खरे जगणचे विसरून जातो, असा अनेकांचा अनुभव आहे. पालकांची नस्ती गडबड१अनेक पालकांना विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा असे वाटते. विशेष म्हणजे कोणता तरी क्लास लावला तरच वेळेचा सदुपयोग होतो असे त्यांचे म्हणणे असते. म्हणून वाटेल तो क्लास लावून विद्यार्थ्यांना रूटीन घालून देण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे, असे तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त उतावीळ झालेले असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील आवडी-निवडी समजण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.गॅझेट जास्तीत-जास्त दोन तास२आपल्या पाल्याने दहावीची परीक्षा दिली म्हणजे तो आता मोठा झाला हा भ्रम पालकांनी दूर करावा. मोबाईल आणि संगणक या गॅझेटमुळे मुलांमध्ये आक्रमकता वाढत असल्याचे जगभरातील अभ्यासक सांगतात. त्यामुळे दिवसभरात विरंगुळा म्हणून या वयातील मुलांना दोन तासापेक्षा गॅझेट देऊ नये. त्यांना त्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा, असेही तज्ज्ञ सुचवतात.स्पर्धेत आरोग्याकडे दुर्लक्षच३स्पर्धेत टीकायचे असेल तर पळावे लागेल हे वाक्य सर्वच घरांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी किमान एकदा तरी ऐकलेले असतेच! ही वास्तविकता असली तरी आपल्याकडे अजूनही शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. सुट्टीच्या दिवसांत खूप कमी पालकांनी मुलांच्या आहार आणि विहाराकडे लक्ष दिले आहे. बहुतांश पालकांनी फक्त स्पर्धा आणि पुढील प्रवेश यांचा बाऊ करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे स्पेशल दुर्लक्ष केले आहे.पौगंडावस्थेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर राहायला फार आवडते. वरकरणी आपलं मूल किती शांत आणि एकलकोंडे वाटत असले तरीही त्याच्या मनात मैत्रिचीही नैसर्गिक भावना निर्माण होतेच. म्हणून सुट्टीच्या काळात पालकांनी पडद्यामागच्या प्रॉमटरच्या भूमिकेत राहावे. मुलांची दिनचर्या सक्तीने ठरवू नये. संवादाच्या माध्यमातून मुलांच्या आवडींचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. - डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञदहावी झाली रे झाली की पालकांनी फोन करून माझ्या मुलाची कल मापन चाचणी घ्या, अशी सुरुवात केली. एक वर्ष पूर्ण अभ्यासाच्या दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना इतक्यात कोणत्याही क्लास किंवा अन्य गोष्टींमध्ये जुंपू नये. पालकांना बऱ्याचदा त्यांची मूलं अभ्यासाच्या बाबतीत निष्काळजी वाटतात; पण विद्यार्थ्यांनाही पुढे जाण्याची आस असते हे पालकांनी विसरू नये. मिळालेल्या सुटीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.- दीपक ताटपुजे, शिक्षणतज्ज्ञदहावी म्हणून गेल्या वर्षभरात मुलीवर अभ्यासाचे दडपण होते. परीक्षा संपल्यानंतर लगेचच तिच्या शाळेचा ग्रुप चार दिवसांच्या सहलीवरही गेलाय. सुट्टीच्या कालावधीत तिचा छंद जोपासता येईल, असा एखादा वर्ग सुरू करण्याची तिची इच्छा असेल तरच आम्ही तिला तिकडे पाठवू. अन्यथा तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊ. दहावीच्या निकालानंतरच आम्ही पुढील प्रवेश आणि अन्य बाबींचा विचार करण्याचे ठरविले आहे.-विठ्ठल बोबडे, पालकदहावीत असल्यामुळे गेले वर्षभर बाहेर फिरणे, नातेवाइकांकडे जाणे जवळपास बंद होते. माझ्यामुळे आईचेही घराबाहेर पडणे काहीप्रमाणात बंदच होते. आता परीक्षा संपल्यानंतर तिच्यासह मलाही मोकळीक मिळाली आहे. पुढील एक महिना फिरणे आणि निवांत वेळ घालविण्याचे नियोजन आहे. मे महिन्यात जीम लावण्याचा विचार आहे. वर्षभर इतका अभ्यास केलाय की सुटीत कोणत्याही प्रकारचा अभ्यास नकोच वाटतोय.- प्रसाद भोसले, विद्यार्थी