शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

पाणीपुरी खाताय की, टायफाईडला निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडमुळे तब्बल दीड वर्षे बंद असलेली बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे सातारकरांची पावले पाणीपुरीवाल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडमुळे तब्बल दीड वर्षे बंद असलेली बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे सातारकरांची पावले पाणीपुरीवाल्या भय्याकडे आपसुकच वळू लागली आहेत. पण आवश्यक स्वच्छतेची काळजी न घेतल्याने ही पाणीपुरी टायफाईडला निमंत्रण देणारी ठरू शकते. म्हणून पाणीपुरीसह उघड्यावरील पदार्थ खाताना नागरिकांनी सावध राहावे, असे तज्ज्ञ सांगतात.

पावसाळ्यात बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. मात्र, या दिवसांत तापमानातील घट, शरिरातील कमी होणारी उष्णता, त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरिराचा प्रयत्न असतो. मात्र, या बदलातून अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्यापूर्वी तिथल्या स्वच्छतेची काळजी घेतली गेल्याचे पाहणे आवश्यक आहे.

दूषित अन्न किंवा पाण्याने हा आजार होतो. याला विषमज्वर असेही नाव आहे. पाणीपुरीतून हा आजार बळावतो. यातील पाणी हे उकळलेले नसते. दुसरं म्हणजे पाणीपुरी देताना विक्रेता वारंवार त्यात हात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळते. त्यामुळे पाणीपुरी खाताना खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

जिल्हा रूग्णालयातील टायफाईडचे रूग्ण :

जून : ७

जुलै : ९

ऑगस्ट : १४

आजाराची लक्षणे

मलमुत्राद्वारा दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हाताद्वारे टायफाईडचे विषाणू शरिरात प्रवेश करतात. आतड्यात जाऊन त्या जीवाणूंची संख्या वाढते. त्यानंतर ते आपला विषारी प्रभाव दाखवू लागतात. त्यामुळे विषबाधा होते. यामुळे मळमळणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, पोटात मुरडा मारणे, पाण्यासारखे पातळ हिरवट रंगाचे शौचाला होणे, रक्तमिश्रीत जुलाब होणे ही टायफाईडची मुख्य लक्षणे आहेत.

ही घ्या काळजी

शौचविधीनंतर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

घरामध्ये अन्न झाकून ठेवावे.

पाणी उकळून थंड करून प्यावे.

वैयक्तिक स्वच्छता पाळावी.

टायफाईडची लस घ्यावी.

पावसाळ्यात कच्च्या भाज्या, जास्त पिकलेली फळे टाळा.

.....................