शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

कृषी कार्यालयाला अधिकारी मिळेना!

By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST

वादग्रस्त कार्यालय : खाबुगिरीत भरडतोय शेतकरी

युनूस शेख -इस्लामपूर --शासनाच्या मुख्य आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या येथील वाळवा तालुका कृषी कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. सध्या या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार शिराळ्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आहे. महामार्गालगत वाघवाडी फाट्यावर असणारे हे केंद्र खाबुगिरीसाठी प्रसिध्द असल्याने, इथे जायचे म्हटले की शेतकऱ्याला फुल्ल टेन्शन येते. कारभाऱ्याविना सुरु असलेला इथला कारभार बेफाम आहे.शासनाच्या अनेक विभागांपैकी एक, परंतु महत्त्वाचा विभाग म्हणून कृषी खात्याकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांसंबंधीची धोरणे, योजनांची माहिती देणे, पीकपाण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे, शासनाकडून अनुदानावर येणारे साहित्य, बी—बियाणे, कीटकनाशके योग्य व पात्र शेतकऱ्यांना देणे, शेतकरी विज्ञान मंडळाची स्थापना करणे, समूहशेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, अतिरिक्त पाण्याचा वापर टाळण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांच्या सहली यासह इतर अनेक महत्त्वाची कामे या विभागाकडून होत असतात.मुळातच हे कृषी कार्यालय इस्लामपूर शहरापासून ४ कि.मी. इतक्या अंतरावरील महामार्गालगतच्या वाघवाडी फाटा परिसरात आहे. वीस एकरहून अधिक क्षेत्र या कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. बीज-गुणन प्रक्षेत्र म्हणून १५-२0 वर्षांपूर्वी या परिसराची ख्याती होती. आता तिथे कोणत्या बी-बियाणांचे अथवा पिकाचे जनन-गुणन केले जाते, हा संशोधनाचा विषय आहे. शहराबाहेर असणाऱ्या या कार्यालयात जाऊन आपले काम होईल याची खात्री नाही. अधिकारीच भेटणार नसतील, तर काम कसे होणार, हा निराळाच भाग.या तालुका कृषी कार्यालयाच्या कामाचे वाभाडे पंचायत समितीच्या प्रत्येक सभेत निघते. मात्र त्याची तमा या कार्यालयाला किंवा त्यांच्या वरिष्ठांना असल्याचे दिसत नाही. मध्यंतरी तत्कालीन प्रांताधिकारी स्रेहल बर्गे यांनी पाणी अडविण्यासाठी छोटी शेततळी, बंधारे बांधणे व जुनी तळी, बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणी साठवणीच्यादृष्टीने उपयुक्त करणे, असा धडक कार्यक्रम राबवला. काम कृषी विभागाचे, मात्र धडपड महसूलची, अशी या कार्यक्रमाची अवस्था झाली. तालुका कृषी कार्यालय सवयीप्रमाणे या मोहिमेत उदासीन राहिल्याचेच स्पष्ट झाले. कागदोपत्री तपशील देणे, एवढाच एककलमी कार्यक्रम जोरात सुरु असतो.या कृषी कार्यालयाचे पूर्वीचे अधिकारी नेहमीच वादग्रस्त ठरले. ते या कार्यालयात रुजू कधी झाले व बदलून कधी गेले, याचीही वाच्यता झाली नाही. आपला कारभार झाकून ठेवण्यासाठी, प्रसंगी एखाद्यावर पोलिसात तक्रार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यांची बदली झाल्यापासून येथे पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही, ही या कार्यालयाची शोकांतिका आहे. शेतकरी हिताची धोरणे राबविणाऱ्या या कार्यालयाची अशी अवस्था असेल, तर शासन किंवा या विभागाचे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना काय सेवा देणार? हा प्रश्नच आहे.अवकाळीचे पंचनामे नाहीतआठ ते दहा दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. आभाळ फाटल्याच्या अवस्थेत झालेल्या मुसळधार पावसाने वाळवा परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शेतकऱ्यांच्या बागांमध्ये जाऊन या नुकसानीची पाहणी केली. मात्र शेतकरी नेहमी आतबट्ट्यातच रहावा, अशी धारणा असणाऱ्या तालुका कृषी कार्यालयाकडून तातडीने पंचनामे करण्याचे औदार्य दाखविण्यात आले नाही. आज चौकशी केल्यावर, पंचनाम्यांचे काम सुरु आहे, ते कधी संपेल सांगता येणार नाही, अशी उत्तरे मिळाली. अवकाळीचे नुकसान कागदावर राहण्याची शक्यता आहे.