शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

कृषी कार्यालयाला अधिकारी मिळेना!

By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST

वादग्रस्त कार्यालय : खाबुगिरीत भरडतोय शेतकरी

युनूस शेख -इस्लामपूर --शासनाच्या मुख्य आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या येथील वाळवा तालुका कृषी कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. सध्या या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार शिराळ्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आहे. महामार्गालगत वाघवाडी फाट्यावर असणारे हे केंद्र खाबुगिरीसाठी प्रसिध्द असल्याने, इथे जायचे म्हटले की शेतकऱ्याला फुल्ल टेन्शन येते. कारभाऱ्याविना सुरु असलेला इथला कारभार बेफाम आहे.शासनाच्या अनेक विभागांपैकी एक, परंतु महत्त्वाचा विभाग म्हणून कृषी खात्याकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांसंबंधीची धोरणे, योजनांची माहिती देणे, पीकपाण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे, शासनाकडून अनुदानावर येणारे साहित्य, बी—बियाणे, कीटकनाशके योग्य व पात्र शेतकऱ्यांना देणे, शेतकरी विज्ञान मंडळाची स्थापना करणे, समूहशेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, अतिरिक्त पाण्याचा वापर टाळण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांच्या सहली यासह इतर अनेक महत्त्वाची कामे या विभागाकडून होत असतात.मुळातच हे कृषी कार्यालय इस्लामपूर शहरापासून ४ कि.मी. इतक्या अंतरावरील महामार्गालगतच्या वाघवाडी फाटा परिसरात आहे. वीस एकरहून अधिक क्षेत्र या कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. बीज-गुणन प्रक्षेत्र म्हणून १५-२0 वर्षांपूर्वी या परिसराची ख्याती होती. आता तिथे कोणत्या बी-बियाणांचे अथवा पिकाचे जनन-गुणन केले जाते, हा संशोधनाचा विषय आहे. शहराबाहेर असणाऱ्या या कार्यालयात जाऊन आपले काम होईल याची खात्री नाही. अधिकारीच भेटणार नसतील, तर काम कसे होणार, हा निराळाच भाग.या तालुका कृषी कार्यालयाच्या कामाचे वाभाडे पंचायत समितीच्या प्रत्येक सभेत निघते. मात्र त्याची तमा या कार्यालयाला किंवा त्यांच्या वरिष्ठांना असल्याचे दिसत नाही. मध्यंतरी तत्कालीन प्रांताधिकारी स्रेहल बर्गे यांनी पाणी अडविण्यासाठी छोटी शेततळी, बंधारे बांधणे व जुनी तळी, बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणी साठवणीच्यादृष्टीने उपयुक्त करणे, असा धडक कार्यक्रम राबवला. काम कृषी विभागाचे, मात्र धडपड महसूलची, अशी या कार्यक्रमाची अवस्था झाली. तालुका कृषी कार्यालय सवयीप्रमाणे या मोहिमेत उदासीन राहिल्याचेच स्पष्ट झाले. कागदोपत्री तपशील देणे, एवढाच एककलमी कार्यक्रम जोरात सुरु असतो.या कृषी कार्यालयाचे पूर्वीचे अधिकारी नेहमीच वादग्रस्त ठरले. ते या कार्यालयात रुजू कधी झाले व बदलून कधी गेले, याचीही वाच्यता झाली नाही. आपला कारभार झाकून ठेवण्यासाठी, प्रसंगी एखाद्यावर पोलिसात तक्रार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यांची बदली झाल्यापासून येथे पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही, ही या कार्यालयाची शोकांतिका आहे. शेतकरी हिताची धोरणे राबविणाऱ्या या कार्यालयाची अशी अवस्था असेल, तर शासन किंवा या विभागाचे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना काय सेवा देणार? हा प्रश्नच आहे.अवकाळीचे पंचनामे नाहीतआठ ते दहा दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. आभाळ फाटल्याच्या अवस्थेत झालेल्या मुसळधार पावसाने वाळवा परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शेतकऱ्यांच्या बागांमध्ये जाऊन या नुकसानीची पाहणी केली. मात्र शेतकरी नेहमी आतबट्ट्यातच रहावा, अशी धारणा असणाऱ्या तालुका कृषी कार्यालयाकडून तातडीने पंचनामे करण्याचे औदार्य दाखविण्यात आले नाही. आज चौकशी केल्यावर, पंचनाम्यांचे काम सुरु आहे, ते कधी संपेल सांगता येणार नाही, अशी उत्तरे मिळाली. अवकाळीचे नुकसान कागदावर राहण्याची शक्यता आहे.