शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

परळी जिल्ह्यात माॅन्सूनचे धमाकेदार आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या कोसळधारा बरसत असल्याने काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले ...

परळी

जिल्ह्यात माॅन्सूनचे धमाकेदार आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या कोसळधारा बरसत असल्याने काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरणक्षेत्रातही पाण्याची चांगलीच आवक वाढली आहे. उरमोडीतही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाचे चारही वक्र दरवाजांमधून उरमोडी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. परळी खोऱ्यात पावसाची संततधार सुरु असून उरमोडी धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवार १७ जून रोजी रात्री ११ वाजता चारही वक्रद्वार ०.२५ मी उचलून ७५० व विद्युत गृह २०० असा एकूण ९५० क्यूसेक विसर्ग उरमोडी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

तसेच पावसाचा मारा कायम असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्याने शुक्रवार १८ जून रोजी सकाळी ९ वाजता वक्रद्वार क्र १ व ४ हे ०.२५ मी वरून 0.५० मी करण्यात आली. (गेट क्र १ व ४ हे ०.५० मी, गेट क्र २ व ३ हे ०.२५ मी) सध्या उरमोडी नदीपात्रात होत असलेला एकूण विसर्ग १४१३ क्यूसेक. कालवा १०० क्यूसेक. धरणातून होत असलेला एकूण विसर्ग १५१३ क्यूसेक इतका असून या कालावधीत उरमोडी नदीपात्रातून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.