शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

‘तहसील’मध्येच डेंग्यूच्या डासांची फॅक्टरी

By admin | Updated: November 28, 2014 00:15 IST

काखेत कळसा अन्... : सायकल दुकानातील टायरमधील पाणी टाकून देणाऱ्या तहसीलदारांच्या कार्यालयातच रोगाला आमंत्रण

सातारा : राज्यभर डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना जिल्हा प्रशासन डेंग्यूच्या उपाययोजनेबाबत जिल्हाभर प्रबोधन करत आहे. मात्र, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् आपण कोरडे पाषाण’ या उक्तीची प्रचिती सातारा तहसीलदार कार्यालयात येत आहे. कार्यालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य साठले आहे तर अवैध वाळू उपशाप्रकरणी जप्त केलेल्या बोटींमध्ये खराब पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. या साठलेल्या पाण्यात डासांची अंडी असल्याने भविष्यात येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सातारा तालुक्यातून विविध कामांसाठी तहसील कार्यालयात दाखल होणाऱ्या नागरिकांनाही डेंग्यूची लागण झाली, तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण राहणार नाही.सातारा शहरासह जिल्ह्यात जागोजागी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये फोटोसेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयाच्या आवारात साठलेली घाण दिसत नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. केंद्र शासनाने एका बाजूला स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत नागरिक हिरीरीने सहभागही घेत आहेत. सार्वजनिक स्वच्छतेचे धडे शासकीय अधिकारीही जागोजागी जाऊन देत आहेत. मात्र, आपले कार्यालय स्वच्छ करण्याची सुबुद्धी त्यांना आतापर्यंत झालेली नाही. केवळ एक दिवस रस्ता झाडून वृत्त प्रसिद्ध झाले की मोहीम थांबवायची, ही राजकारणी बुद्धी शासकीय अधिकाऱ्यांनाही सुचल्याचेच यातून दिसते. त्यामुळे आधी आपला परिसर स्वच्छ करावा, त्यानंतर लोकांना स्वच्छतेचे धडे द्यावेत, अशी कोपरखळी लोक मारत आहेत. दरम्यान, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठातर्फे काही दिवसांपूर्वी या परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा घाणीचे साम्राज्य साठू लागले असल्याने आता पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस स्वच्छतेसाठी काढल्यास घाणीवर नियंत्रण येऊ शकते. (प्रतिनिधी)अस्वच्छता करणाऱ्यांवर नियंत्रण अशक्यजप्त केलेल्या बोटींतील पाणी काढले तर त्यांचे बूड खराब होण्याची शक्यता असल्यानं त्यातील पाणी काढलेले नाही. डासांचं तेल टाकून घेतलंय. कचरा कुंडी ठेवलीय तरीही लोक बाहेरच कचरा टाकतात. या परिसरात पाच ते सहा कार्यालये आहेत. या परिसरात नेहमी वर्दळ असते, त्यामुळे कोण घाण करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.- राजेश चव्हाण, तहसीलदार