शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक निवारा; पण हक्कासाठी आसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 23:38 IST

तब्बल दीडशे इमारती मोडकळीस : घर सोडण्यास नागरिकांचा नकार; पालिकेला कार्यवाही करण्यात अडचणी

दत्ता यादव - सातारा  संपत्तीच्या वादातून भाऊबंदकीमध्येच अनेकदा टोकाचे संघर्ष होत असतात. हे संघर्ष इतके विकोपाला जातात की, जीव गेला तरी बेहत्तर पण संपत्ती मिळालीच पाहिजे, अशी वृत्ती सध्या जनमाणसांमध्ये दिसू लागली आहे. शहरामध्ये तब्बल दीडशे इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक महिती उघड होऊनही पालिकेचा नाईलाज झाला आहे. कारण ज्या इमारतीवर धोकादायक असा शिक्का पडला आहे. त्या इमारतीमध्ये राहाणाऱ्या कुटुंबांचे हेवेदावे न्यायालयात गेल्यामुळे कोणीच माघारी घेत नाही. घर अंगावर केव्हाही कोसळण्याची शक्यता असतानाही केवळ घरावर हक्क राहावा, यासाठी अनेक कुटुंबे मृत्यूच्या सावलीखाली आपल्या संसाराचा गाडा हाकत असल्याचे विदारक चित्र साताऱ्यात समोर आले आहे.गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सिटीपोस्टाशेजारील जुन्या इमारतीची भिंत कोसळून दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची दुर्घटना घडली होती. त्यामुळे जुन्या इमारतींचा मुद्दा आणि नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर पालिका प्रशासन शहरामध्ये किती इमारत धोकादायक आहे, याचा सर्व्हे करतेच ; परंतु या दुर्घटनेमुळे पालिका प्रशासनाने प्रकर्षाने याची गंभीर दखल घेतली आणि शहरातील दीडशेहून अधिक इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. कारण परिस्थितीही तसीच आहे. घर खाली करा किंवा दुरूस्त करा, अशा स्वरूपाच्या नोटीसा पालिकेने प्रत्येकाला बजावल्या आहेत. परंतु या लोकांकडून पालिका प्रशासनाला कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्याची कारणेही अनेक आहेत. फार वर्षांपासून वास्तव्यास असणारे भाडेकरू, तसेच भाऊबंदकीचा वाद ही मुख्य कारणे आहेत. भाडेकरू व घरमालक तसेच भावांभावांतील वाद न्यायालयात गेल्यामुळे पालिका प्रशासनालाही कसलीही ठोस कारवाई करता येईना. केवळ धोक्याची सूचना देऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणेच पालिकेच्या हातात आता उरले आहे.घर कधीही कोसळू शकते, हे माहित असूनही अनेक कुटुंबे घर सोडायला तयार नाहीत. पालिकेच्या आदेशानुसार जर घर सोडलं तर पुन्हा ताबा मिळेल का, याची खात्री त्यांना वाटत नाही. घर मालकाने अथवा घरातील नातेवाईकाने जर पुन्हा घर बळकावले तर काय होईल, या विचारानेच अनेकजण अशा मोडकळीस आलेल्या घरामध्ये जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अनेकजणांचे न्यायालयात दावे सुरू असल्यामुळे पालिकेलाही बळाचा वापर करता येत नाही. यदाकदाचित दुर्देवी घटना घडली तर याला पालिकेलाच जबाबदार धरले जाणार. त्यामुळे इकडे विहीर तिकडे आड, अशी स्थिती पालिका प्रशासनाची झाली आहे. जुने वाडे अन घरे..४शहरात प्रामुख्याने जुने वाडे आणि घरे मोडकळीस आली आहेत. अपार्टमेंट सुस्थितीत आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आणि अशा प्रकारच्या इमारती धोकादायक असल्याचे माहित असूनही प्रशासनाला काहीच करता येत नाही. इतकी हतबला प्रशासनाची स्पष्ट होत आहे.