शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

धोकादायक निवारा; पण हक्कासाठी आसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 23:38 IST

तब्बल दीडशे इमारती मोडकळीस : घर सोडण्यास नागरिकांचा नकार; पालिकेला कार्यवाही करण्यात अडचणी

दत्ता यादव - सातारा  संपत्तीच्या वादातून भाऊबंदकीमध्येच अनेकदा टोकाचे संघर्ष होत असतात. हे संघर्ष इतके विकोपाला जातात की, जीव गेला तरी बेहत्तर पण संपत्ती मिळालीच पाहिजे, अशी वृत्ती सध्या जनमाणसांमध्ये दिसू लागली आहे. शहरामध्ये तब्बल दीडशे इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक महिती उघड होऊनही पालिकेचा नाईलाज झाला आहे. कारण ज्या इमारतीवर धोकादायक असा शिक्का पडला आहे. त्या इमारतीमध्ये राहाणाऱ्या कुटुंबांचे हेवेदावे न्यायालयात गेल्यामुळे कोणीच माघारी घेत नाही. घर अंगावर केव्हाही कोसळण्याची शक्यता असतानाही केवळ घरावर हक्क राहावा, यासाठी अनेक कुटुंबे मृत्यूच्या सावलीखाली आपल्या संसाराचा गाडा हाकत असल्याचे विदारक चित्र साताऱ्यात समोर आले आहे.गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सिटीपोस्टाशेजारील जुन्या इमारतीची भिंत कोसळून दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची दुर्घटना घडली होती. त्यामुळे जुन्या इमारतींचा मुद्दा आणि नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर पालिका प्रशासन शहरामध्ये किती इमारत धोकादायक आहे, याचा सर्व्हे करतेच ; परंतु या दुर्घटनेमुळे पालिका प्रशासनाने प्रकर्षाने याची गंभीर दखल घेतली आणि शहरातील दीडशेहून अधिक इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. कारण परिस्थितीही तसीच आहे. घर खाली करा किंवा दुरूस्त करा, अशा स्वरूपाच्या नोटीसा पालिकेने प्रत्येकाला बजावल्या आहेत. परंतु या लोकांकडून पालिका प्रशासनाला कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्याची कारणेही अनेक आहेत. फार वर्षांपासून वास्तव्यास असणारे भाडेकरू, तसेच भाऊबंदकीचा वाद ही मुख्य कारणे आहेत. भाडेकरू व घरमालक तसेच भावांभावांतील वाद न्यायालयात गेल्यामुळे पालिका प्रशासनालाही कसलीही ठोस कारवाई करता येईना. केवळ धोक्याची सूचना देऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणेच पालिकेच्या हातात आता उरले आहे.घर कधीही कोसळू शकते, हे माहित असूनही अनेक कुटुंबे घर सोडायला तयार नाहीत. पालिकेच्या आदेशानुसार जर घर सोडलं तर पुन्हा ताबा मिळेल का, याची खात्री त्यांना वाटत नाही. घर मालकाने अथवा घरातील नातेवाईकाने जर पुन्हा घर बळकावले तर काय होईल, या विचारानेच अनेकजण अशा मोडकळीस आलेल्या घरामध्ये जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अनेकजणांचे न्यायालयात दावे सुरू असल्यामुळे पालिकेलाही बळाचा वापर करता येत नाही. यदाकदाचित दुर्देवी घटना घडली तर याला पालिकेलाच जबाबदार धरले जाणार. त्यामुळे इकडे विहीर तिकडे आड, अशी स्थिती पालिका प्रशासनाची झाली आहे. जुने वाडे अन घरे..४शहरात प्रामुख्याने जुने वाडे आणि घरे मोडकळीस आली आहेत. अपार्टमेंट सुस्थितीत आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आणि अशा प्रकारच्या इमारती धोकादायक असल्याचे माहित असूनही प्रशासनाला काहीच करता येत नाही. इतकी हतबला प्रशासनाची स्पष्ट होत आहे.