शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

ओलांडली साठी.... मोडले कंबरडे!

By admin | Updated: July 4, 2014 00:26 IST

गृहिणी अस्वस्थ : भाज्यांच्या दरवाढीने स्वयंपाकघर बनली ‘प्रयोगशाळा’

सातारा : ‘अच्छे दिन’ येणार, अशी आस असतानाच वाढत्या महागाईने मात्र अनेकांच्या तोंडचा घास पळवला आहे. तीस रुपये किलोने मिळणाऱ्या भाजीने चक्क साठी ओलांडली आहे. भाजीच्या वाढलेल्या या टप्प्यामुळे सर्वसामान्यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. आधी पेट्रोल आणि आता भाजीच्या दरांमधील वाढीमुळे येणारा पगार कुठे आणि कसा पुरवायचा असा प्रश्न नोकरदारांना पडला आहे.पावसाने ओढ दिल्याचा परिणाम भाजी उत्पादनावर झाला आहे. शहरात जिल्हाभरातून भाजीची आवक होते; पण मार्चपासून पडलेला कडक उन्हाळा आणि बेपत्ता झालेला पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आले. मिळेल तिथून पाणी आणून त्यांनी भाजीपाला टिकविण्याचा प्रयत्न केला; पण जून उलटूनही पाऊस नसल्याने भाज्यांचे उत्पादन घटले. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावर दिसू लागला. एक भाजी, आमटी, कोशिंबीर यासारखे जिन्नस असणारे ताट पाहण्याची सवय लागलेल्यांना भाजीच्या दराने पुकारलेला असहकार पचनी पडेनासा झालाय. मांसाहार करणाऱ्यांच्या घरात आठवड्यातून एक-दोनदा वेगळी चव चाखायला मिळते. मात्र, शुद्ध शाकाहारींच्या घरी जेवण म्हणजे महानगरांतील ‘कॉम्पॅक्ट फ्लॅट’ झालाय. जिथे जागा उपलब्ध नसल्यामुळे आहे त्याच्यातच सांभाळून घेणं क्रमप्राप्त झालंय. (प्रतिनिधी)