शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज : जिल्हाधिकारी

By admin | Updated: July 4, 2014 00:33 IST

३१ मार्चपर्यंत ३६१४.४८ कोटींचे कर्जवाटप

सातारा : खरीप हंगामात बँकांनी पीक कर्ज वाटपास प्राधान्य दिले असून, आत्तापर्यंत बँकांनी खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. दरम्यान, जिल्हा अग्रणी बँकेने या वर्षीसाठी तयार केलेल्या पतपुरवठा आराखड्याच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ३६१४.४८ कोटींचे कर्जवाटप प्राथमिकता क्षेत्रासाठी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली. जिल्हा अग्रणी बँकेच्या बँकर्स समन्वय समितीची बैठक नियोजन भवनात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. होते. ‘आरबीआय’चे सहायक महाप्रबंधक मोहन सांगवीकर, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक जी. के. साळवेकर, महाबँकेचे महाप्रबंधक रवींद्र चव्हाण, अग्रणी बँक व्यवस्थापक संजय वाघ, प्रकल्प संचालक गिरीश भालेराव, जिल्हा बँकेचे उपमहाव्यवस्थापक भुजंग जाधव आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, ‘गेल्यावर्षी अग्रणी बँकेने ४२८४.१३ कोटींचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच व्यापारी बँकांद्वारे ३६१४.४८ कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. शेती क्षेत्रासाठी २५२६.१४ कोटी, उद्योगासाठी २३८.१० कोटी त्याचबरोबर अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी ८५०.२४ कोटींच्या कर्जपुरवठ्याचा समावेश आहे. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यात व्यापारी बँकांमार्फत २१८९.१७ कोटी, जिल्हा बँक १४२१.१७ कोटी, ‘आरआरबी’च्यावतीने ४.१३ कोटींच्या कर्जपुरवठ्याचा समावेश आहे.गिरीश भालेराव यांनी नवीन राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व कुटुंबांचे ‘एक कुटुंब एक खाते’ योजनेत खाते उघडण्याची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील बँकांनी १२९० बचतगटांना १४.५९ कोटींचे अर्थसहाय्य केले.यावेळी आनंद कटके, भुजंग जाधव, अनिल गोडबोले, ‘आरसेटी’चे राज्य समन्वयक सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध बॅँकांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)