शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना समित्या हरवल्या... रोगाचा शिरकाव वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा आकडा दीड हजारावर पोहोचला असताना आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत असताना काही महिन्यांपूर्वी अस्तित्वात असलेल्या गावोगावच्या कोरोना समित्या आणि शहरातील प्रभाग समित्या कुठे हरवल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मागील वर्षी संपूर्ण देशभर कोरोनाची लाट उसळली होती. सातारा जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली असतानाच प्रशासनाच्यावतीने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले. प्रत्येक गावांमध्ये स्थानिक लोकांची समिती नेमण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली होती. गावाबाहेरून गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची चौकशी समिती करत होती. पुणे, मुंबई तसेच इतर शहरांतून गावात येणाऱ्या व्यक्तीला अनेक ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच गावापासून दूर असलेल्या शाळेत अथवा समाज भवनात १४ दिवस लोकांना विलगीकरणात ठेवून नंतरच गावांमध्ये प्रवेश देण्यात येत होता.

अनेक गावांच्या वेशीवर गेट तयार करण्यात आले होते. रस्त्यावर झाडे तोडून टाकण्यात आली होती. दगड रचण्यात आले होते. गावात येणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. गावातील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नव्हती तर बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करत करू शकत नव्हती, अशा पद्धतीने अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच अडवले. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कोरोना महामारीने अनेक गावांमध्ये वेस ओलांडून गावात प्रवेश केलेला आहे. शहरामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मात्र कुठेही कंटेन्मेंट झोन पाहायला मिळत नाही, गावबंदी दिसत नाही, काही ठिकाणी तर विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण रस्त्यावर हिंडत आहेत. त्यांचा लोकांशी संपर्क येत आहे, तरीदेखील अशा रुग्णांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यामधील ७७८ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. प्रशासनाच्यावतीने ज्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, हे सदस्य सरपंच आता पदावर राहिलेले नाहीत. जे नवीन पदाधिकारी निवडून आले आहेत त्यांना कोरोनाच्या काळात नेमके काय काम करायचे आहे, याबाबतदेखील नेमकी दिशा मिळत नाही, तसेच गावांमधील लोकांचा वाईटपणा घ्यायला कोणीही तयार नाही. दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये चमकोगिरी करणारे काही नेतेमंडळींनी आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावात वेळी घरात बसून राहणे पसंत केलेले आहे. युद्धाचा शंखध्वनी ऐकून रस्त्यावर उतरलेले सैन्य ऐन रणांगण तापले असताना कुठे लपले? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आओ जाओ घर तुम्हारा

कोरोना महामारी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये थैमान घालत असताना लोक रोडावून गेल्याचे चित्र आहे. उपासमारीने मरण्यापेक्षा कोरोना झालेला बरा, अशीही काही जणांची मानसिकता आहे. त्यामुळे जगतील ते जगतील आणि मरतील ते मरतील... जणू अशीच भावना लोकांमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावांमध्ये आओ जाओ.. घर तुम्हारा.. अशी स्थिती आहे.

- सागर गुजर