शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोना समित्या हरवल्या... रोगाचा शिरकाव वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा आकडा दीड हजारावर पोहोचला असताना आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत असताना काही महिन्यांपूर्वी अस्तित्वात असलेल्या गावोगावच्या कोरोना समित्या आणि शहरातील प्रभाग समित्या कुठे हरवल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मागील वर्षी संपूर्ण देशभर कोरोनाची लाट उसळली होती. सातारा जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली असतानाच प्रशासनाच्यावतीने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले. प्रत्येक गावांमध्ये स्थानिक लोकांची समिती नेमण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली होती. गावाबाहेरून गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची चौकशी समिती करत होती. पुणे, मुंबई तसेच इतर शहरांतून गावात येणाऱ्या व्यक्तीला अनेक ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच गावापासून दूर असलेल्या शाळेत अथवा समाज भवनात १४ दिवस लोकांना विलगीकरणात ठेवून नंतरच गावांमध्ये प्रवेश देण्यात येत होता.

अनेक गावांच्या वेशीवर गेट तयार करण्यात आले होते. रस्त्यावर झाडे तोडून टाकण्यात आली होती. दगड रचण्यात आले होते. गावात येणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. गावातील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नव्हती तर बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करत करू शकत नव्हती, अशा पद्धतीने अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच अडवले. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कोरोना महामारीने अनेक गावांमध्ये वेस ओलांडून गावात प्रवेश केलेला आहे. शहरामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मात्र कुठेही कंटेन्मेंट झोन पाहायला मिळत नाही, गावबंदी दिसत नाही, काही ठिकाणी तर विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण रस्त्यावर हिंडत आहेत. त्यांचा लोकांशी संपर्क येत आहे, तरीदेखील अशा रुग्णांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यामधील ७७८ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. प्रशासनाच्यावतीने ज्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, हे सदस्य सरपंच आता पदावर राहिलेले नाहीत. जे नवीन पदाधिकारी निवडून आले आहेत त्यांना कोरोनाच्या काळात नेमके काय काम करायचे आहे, याबाबतदेखील नेमकी दिशा मिळत नाही, तसेच गावांमधील लोकांचा वाईटपणा घ्यायला कोणीही तयार नाही. दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये चमकोगिरी करणारे काही नेतेमंडळींनी आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावात वेळी घरात बसून राहणे पसंत केलेले आहे. युद्धाचा शंखध्वनी ऐकून रस्त्यावर उतरलेले सैन्य ऐन रणांगण तापले असताना कुठे लपले? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आओ जाओ घर तुम्हारा

कोरोना महामारी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये थैमान घालत असताना लोक रोडावून गेल्याचे चित्र आहे. उपासमारीने मरण्यापेक्षा कोरोना झालेला बरा, अशीही काही जणांची मानसिकता आहे. त्यामुळे जगतील ते जगतील आणि मरतील ते मरतील... जणू अशीच भावना लोकांमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावांमध्ये आओ जाओ.. घर तुम्हारा.. अशी स्थिती आहे.

- सागर गुजर