शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

कोरोना समित्या हरवल्या... रोगाचा शिरकाव वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा आकडा दीड हजारावर पोहोचला असताना आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत असताना काही महिन्यांपूर्वी अस्तित्वात असलेल्या गावोगावच्या कोरोना समित्या आणि शहरातील प्रभाग समित्या कुठे हरवल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मागील वर्षी संपूर्ण देशभर कोरोनाची लाट उसळली होती. सातारा जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली असतानाच प्रशासनाच्यावतीने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले. प्रत्येक गावांमध्ये स्थानिक लोकांची समिती नेमण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली होती. गावाबाहेरून गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची चौकशी समिती करत होती. पुणे, मुंबई तसेच इतर शहरांतून गावात येणाऱ्या व्यक्तीला अनेक ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच गावापासून दूर असलेल्या शाळेत अथवा समाज भवनात १४ दिवस लोकांना विलगीकरणात ठेवून नंतरच गावांमध्ये प्रवेश देण्यात येत होता.

अनेक गावांच्या वेशीवर गेट तयार करण्यात आले होते. रस्त्यावर झाडे तोडून टाकण्यात आली होती. दगड रचण्यात आले होते. गावात येणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. गावातील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नव्हती तर बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करत करू शकत नव्हती, अशा पद्धतीने अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच अडवले. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कोरोना महामारीने अनेक गावांमध्ये वेस ओलांडून गावात प्रवेश केलेला आहे. शहरामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मात्र कुठेही कंटेन्मेंट झोन पाहायला मिळत नाही, गावबंदी दिसत नाही, काही ठिकाणी तर विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण रस्त्यावर हिंडत आहेत. त्यांचा लोकांशी संपर्क येत आहे, तरीदेखील अशा रुग्णांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यामधील ७७८ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. प्रशासनाच्यावतीने ज्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, हे सदस्य सरपंच आता पदावर राहिलेले नाहीत. जे नवीन पदाधिकारी निवडून आले आहेत त्यांना कोरोनाच्या काळात नेमके काय काम करायचे आहे, याबाबतदेखील नेमकी दिशा मिळत नाही, तसेच गावांमधील लोकांचा वाईटपणा घ्यायला कोणीही तयार नाही. दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये चमकोगिरी करणारे काही नेतेमंडळींनी आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावात वेळी घरात बसून राहणे पसंत केलेले आहे. युद्धाचा शंखध्वनी ऐकून रस्त्यावर उतरलेले सैन्य ऐन रणांगण तापले असताना कुठे लपले? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आओ जाओ घर तुम्हारा

कोरोना महामारी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये थैमान घालत असताना लोक रोडावून गेल्याचे चित्र आहे. उपासमारीने मरण्यापेक्षा कोरोना झालेला बरा, अशीही काही जणांची मानसिकता आहे. त्यामुळे जगतील ते जगतील आणि मरतील ते मरतील... जणू अशीच भावना लोकांमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावांमध्ये आओ जाओ.. घर तुम्हारा.. अशी स्थिती आहे.

- सागर गुजर