शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीचे नवनवे फंडे! गुंतवणुकीची नको घाई, हडप होईल कष्टाची कमाई

By संजय पाटील | Updated: June 14, 2023 12:39 IST

गुंतवणूक वाढविण्यासाठी काहींनी एजंट नेमले

संजय पाटीलकऱ्हाड : कष्ट करून आणि घाम गाळून कमावलेले पैसे असेच कुणाकडेही सोपवताना काळजी घ्यायला हवी. अल्पावधीत पैसे वाढवून मिळण्याचे आमिष आपली कष्टाची कमाई बुडीत घालवू शकते. चांगला परतावा, आकर्षक व्याज आणि कमी कालावधीत दामदुप्पट हे सध्या फसवणुकीचे फंडे बनलेत. त्यामुळे कोणत्याही खासगी क्षेत्रात पैसे गुंतवताना एकदा नव्हे तर दहा वेळा विचार करायला हवा.कऱ्हाडात चांगला परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची तब्बल पन्नास लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर दरमहा चार टक्क्याने परतावा आणि मूळ रक्कम सुरक्षित राहणार असल्याचे सांगून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली. सुरुवातीला काही दिवस गुंतवणूकदारांना परतावाही देण्यात आला.मात्र, तीन-चार महिन्यातच परतावा मिळणे बंद झाले. तसेच गुंतवलेली रक्कमही गुंतवणूकदारांना परत मिळालेली नाही. मुळातच एक खासगी फर्म दरमहा चार टक्के म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकांच्या व्याजदरापेक्षा कित्येक पटींनी जास्त परतावा कशी देऊ शकते, ही बाब विचार करायला लावणारी आहे.गुंतवणूकदारांनी सुरुवातीला केवळ हा एकच विचार केला असता तरी स्वत:ची फसवणूक टाळता आली असती. मात्र, जास्त परतावा मिळणार आणि मूळ रक्कम सुरक्षित राहणार, या हव्यासाने अनेकांनी असुरक्षित गुंतवणूक केली आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. एक-दोन नव्हे तर कित्येक लाख रुपये बेमालुमपणे हडपले गेले. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी मिळणाऱ्या लाभापेक्षा गुंतवणाऱ्या रकमेचा विचार करणे गरजेचे बनले आहे.

काय असते आमिष?चांगला परतावा : अनेक जण गुंतवणूक करून घेताना गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. दरमहा परतावा आणि मूळ रक्कम सुरक्षित, ही फसवी ऑफर दिली जाते.आकर्षक व्याजदर : राष्ट्रीयकृत, सहकारी बँका तसेच पतसंस्थाही ठेवींवर जास्तीत जास्त आठ टक्केपर्यंत वार्षिक व्याजदर देतात. मात्र, फसवणुकीच्या उद्देशाने पैसे घेणारे दरमहा चार ते पाच म्हणजेच वार्षिक पंचवीस ते तीस टक्क्याने परतावा देण्याचे आमिष दाखवतात.अल्पावधीत दामदुप्पट : गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी बँका, पतसंस्था किमान सात वर्षांचा कालावधी घेतात. मात्र, फसवणूक करणारे अगदी चार ते पाच वर्षात दामदुप्पट देण्याचे ‘गाजर’ दाखवतात.मूळ रक्कम सुरक्षित : गुंतवणूकदाराने जी रक्कम गुंतवली आहे, ती रक्कम सुरक्षित राहणार असल्याची खात्री देत त्या रकमेचा धनादेशही काहीजण देतात. मात्र, प्रत्यक्षात तो धनादेश बँकेत वटत नाही, हे गुंतवणूकदाराला फसवणुकीनंतर लक्षात येते.ठेवींवर कोण किती देते व्याजदर?७ : राष्ट्रीयकृत बँका९ : सहकारी बँका९.५ : पतसंस्था१० : पतपेढी१०.५ : क्रेडीट सोसायटी(आकडेवारी टक्केवारीमध्ये)

दाेन टक्के कमिशनवर एजंटगुंतवणूक वाढविण्यासाठी काहींनी एजंट नेमले आहेत. हे एजंट वेगवेगळी आमिषे दाखवून तसेच खात्री देऊन गुंतवणूक करायला प्रवृत्त करतात. त्या मोबदल्यात एजंटांना गुंतवलेल्या रकमेतील सुमारे दाेन टक्के कमिशन दिले जाते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक