शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

पालिका नेमणार तज्ज्ञांची समिती--लोकमत इफेक्ट...

By admin | Updated: August 27, 2014 23:30 IST

निसर्गपूरक नगरविस्तार : गोडोलीतील पुरानंतर गांभीर्य लक्षात आल्याने हालचालींना वेग

सातारा : डोंगराळ भागात वसलेल्या सातारा शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि धोके टाळण्यासाठी अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे, ही बाब पालिकेला गोडोलीतील पुरानंतर पटली आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमण्याचा ठराव पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. नंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून या समितीला ‘जैवविविधता समिती’चा दर्जा देण्यात येईल.वीस आॅगस्ट रोजी पाऊण तासात ८२ मिलीमीटर पाऊस पडल्याने शहरात उडालेली दाणादाण अनेक मानवनिर्मित बाबींवर बोट ठेवून गेली. ठिकठिकाणी पाणी साचले. सातारच्या इतिहासात असा पाऊस अनेकदा पडला आहे; मात्र पाणी कधीच साचून राहिले नव्हते. या निमित्ताने ओढ्यांवरील अतिक्रमणे, ओढ्यांचे मार्ग बदलणे, नैसर्गिक प्रवाह पाइपमध्ये बंदिस्त करणे असे अनेक मुद्दे चर्चिले गेले. याखेरीज शहरातील चढ-उतार, डोंगरांचा शेजार, माती आणि खडकांचा प्रकार, ठिकठिकाणची भूगर्भातील पाणीपातळी अशा अनेक घटकांचा विचार नगररचनेत व्हावा, यासाठी जैवविविधता समितीची स्थापना करणे गरजेचे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. २००२ च्या जैवविविधता कायद्यान्वये स्थानिक स्वराज्य संस्थेत अशी समिती गरजेची असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले होते.नगरविकास आघाडीचे प्रतोद अविनाश कदम यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी याविषयी चर्चा केली. अनेक बाबतीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे बापट यांनीही मान्य केले. जैवविविधता समितीबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास अवधी लागू शकतो; तथापि तोपर्यंत तज्ज्ञांची समिती तयार करावी आणि पुढे तिला जैवविविधता समितीचा दर्जा द्यावा, अशी चर्चा होऊन पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मांडण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली. ठरावानंतर विविध ज्ञानशाखांची आणि त्यातील तज्ज्ञांची नावे निश्चित केली जातील. भूगर्भशास्त्र, जलस्रोत, भूरचनाशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, समाजशास्त्र, आपत्कालीन व्यवस्थापन आदी शाखांमधील तज्ज्ञ या समितीत असणे शक्य आहे. (प्रतिनिधी)शहराच्या काही भागांत भूगर्भजलपातळी अधिक असल्याने त्या ठिकाणी पर्जन्यजल पुनर्भरणाचे प्रकल्प करू नयेत, असा उलट सल्ला देण्याचीही वेळ येते, अशी शहराची भौगोलिक, नैसर्गिक स्थिती आहे. अशा स्थितीत तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असून, तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय आता घ्यावाच लागणार आहे.- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिकातज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचा ठराव पालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी मांडण्यात येईल. मंजुरीनंतर कोणकोणत्या क्षेत्रांतील तज्ज्ञांची निवड करायची, याचा निर्णय घेण्यात येईल. हे तज्ज्ञ केवळ सल्ले देण्याची क्षमता असणारेच नव्हे तर पुढाकार घेऊन काम करणारे असावेत, असा प्रयत्न केला जाईल.- अविनाश कदम, पक्षप्रतोद, नगरविकास आघाडी