शहरं
Join us  
Trending Stories
1
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
2
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
3
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
4
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
5
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
6
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
7
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
8
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
9
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
11
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
12
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
13
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
14
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
15
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
16
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
17
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
18
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
19
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
20
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी

महाविद्यालय म्हणते, ‘तक्रार करा !’

By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST

युवकांची गुंडगिरी : ‘रयत’चे आवाहन, ‘कोणी त्रास दिला तर सहन करू नका’

सातारा : कोणत्याही टोळक्याने जर महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना त्रास दिला तर त्याची तक्रार थेट महाविद्यालय प्रशासन अथवा या शिस्त समितीकडे करावी. या टोळीत जे कोणी असतील, त्यांची गय केली जाणार नाही, असा परखड इशारा रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांनी दिला.रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयात ‘महाविद्यालयीन शिस्त समिती’ आहे. ही समिती महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अथवा बाहेर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तक्रार आली तर कारवाईचा निर्णय घेते. मात्र, या समितीकडेच तक्रारी येत नसल्याने ही समितीच बिनकामाची बनली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील वाय. सी. कॉलेज, डी. जी. कॉलेज, आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशन, शिवाजी कॉलेज परिसरात विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्रास देण्याचे नित्याचेच बनले आहे. परिणामी येथे अनेकदा वाद-विवादाचे प्रसंग घडण्याबरोबरच मारामारीचे प्रकारही घडले आहेत. महाविद्यालय प्रशासन मात्र आवारात घडले असेल तर आम्ही कारवाई करू, मात्र आवाराच्या बाहेर घडले असेल तर त्याची जबाबदारी आमची नाही, असे सांगत जबाबदारी झटकून टाकत आहे.‘रयत’च्या महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या शिस्त समितीकडे अनेकदा तक्रारी येतात. तक्रारदार तसेच ज्याने अन्याय केला आहे, अशांना समितीपुढे उभे केले जाते. दोघांचे म्हणणे ऐकून ही समिती आपला निर्णय देत असते. मात्र अलीकडच्या काही घटनांच्या अनुषंगाने तक्रारीच आलेल्या नाहीत. त्यामुळे कारवाई अथवा पोलिसांत तक्रार देता येत नसल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती. त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगतच महाविद्यालयीन प्रशासन अशा टोळ्यांवर तत्काळ कारवाई करेल, असे सांगितले. दरम्यान, या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार डॉ. अनिल पाटील यांच्याकडे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्याची ग्वाहीही अ‍ॅड. शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षारयत शिक्षण संस्थेने पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा केली आहे. या अनुषंगाने सचिव डॉ. गणेश ठाकूर म्हणाले, ‘महाविद्यालय कॅम्पसमध्ये टोळ्यांची दादागिरी नसते. महाविद्यालय सुटल्यानंतर बाहेर गुंडगिरी करणारे युवक त्रास देत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाविद्यालय सुरू होताना आणि सुटताना येथे पोलिसांनी पेट्रोलिंग केले तरी खूप फरक पडेल.’रयतच्या कोणत्याही महाविद्यालयात आम्ही असले प्रकार कधीही खपवून घेणार नाही. मुलांनीही थोडे धाडसी बनावे. त्यांनी तक्रार केली तरच आम्ही पुढील कारवाई करू शकणार आहे. तक्रार आली तर मागे-पुढे न पाहता अशा गुंड प्रवृत्तीच्या युवकांना आम्ही महाविद्यालयातून कायमचे काढून टाकू.- डॉ. गणेश ठाकूर, सचिव, रयत शिक्षण संस्थाबुरुंगलेच्या काळात बेशिस्तपणा वाढला...‘रयत’च्या सचिवपदी कार्यरत असताना डॉ. अशोक भोईटे असताना त्यांच्या काळात कधी अशा टोळ्यांची दादागिरी चालली नाही. ज्यांनी केली त्यांना प्रसादही मिळाला. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी अशा टोळ्यांचा चांगलाच बंदोबस्त केला. भोईटेंनंतर डॉ. जे. जी. जाधव आले. त्यांनीही कधी असले प्रकार चालू दिले नाहीत. डॉ. अरविंद बुरुंगले आले आणि त्यांनी राजकीय कार्यकर्ते सांभाळण्याच्या प्रयत्नात दुर्लक्ष केले आणि दादागिरी, युवकांचा धुमाकूळ असले प्रकार वाढले. त्यांच्याच काळात अनेक युवकांच्या टोळ्यांचे फावले आणि मारामारीचे प्रमाण वाढले. आता सचिवपदी डॉ. गणेश ठाकूर आले आहेत. त्यांनी या ‘रयत’च्या कॅम्पसमधील वातावरण भयमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.कॉलेज सुरू होताना आणि सुटताना साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. छेडछाड होत असेल तर मुलींनी स्वत:हून पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा.- अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक