शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक; नुकसान प्रस्तावासाठी सहा पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

सातारा : नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते; पण याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. कारण, ...

सातारा : नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते; पण याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. कारण, जाचक अटींचा अडथळा असायचा; मात्र आता बळीराजाची त्रासदायक अटीतून सुटका होणार असून, कृषी आयुक्तालयाने प्रस्तावासाठी सहा पर्याय दिले आहेत. यामुळे विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक बसण्याची शक्यता आहे.

शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्याची जबाबदारी एखाद्या कंपनीकडे असते. शेतकरी जमिनीत घेतलेल्या पिकांचा विमा उतरवतात. त्यासाठी ठराविक हप्ता भरला जातो, तसेच राज्य आणि केंद्र शासनही आपला वाटा देतात. यामध्ये नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते; पण त्यासाठी काही अटी होत्या. शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते, तसेच चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन माहिती भरली तर शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता नव्हती. यामुळे कंपन्या मालामाल अन् शेतकरी कंगाल, अशी स्थिती होती. परिणामी, या जाचक अटींच्याविरोधात शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर होता; पण नवीन नियमांमुळे याला कुठेतरी ब्रेक बसणार आहे.

....................................

आधी काय होते दोन पर्याय...

पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते. दिनांक, वेळ, नुकसानाची कारणे, प्रकार. सर्व्हे नंबर द्यावा लागत होता. त्याचबरोबर बँक, कृषी किंवा महसूल विभाग, टोल फ्री नंबरवरही माहिती देण्याची सोय होती.

........................................

हे आहेत नवीन सहा पर्याय

- शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शूरन्स ॲपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानाची माहिती स्वत: भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी पंचनाम्यासाठी बांधावर येणार आहेत.

- तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी ऑफलाइन तक्रार करू शकतात.

- नुकसानाची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही करता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज द्यावा लागेल.

- पीक विमा कंपनीच्या मेल आयडीवरही तक्रार करता येणार आहे.

- ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे, त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

.......................................................

अतिवृष्टीने साडेसात कोटींचे नुकसान...

जिल्ह्यात यावर्षीच्या जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. जवळपास ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके बाधित झाली होती. तर अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले.

.........................................................