शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक; नुकसान प्रस्तावासाठी सहा पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

सातारा : नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते; पण याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. कारण, ...

सातारा : नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते; पण याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. कारण, जाचक अटींचा अडथळा असायचा; मात्र आता बळीराजाची त्रासदायक अटीतून सुटका होणार असून, कृषी आयुक्तालयाने प्रस्तावासाठी सहा पर्याय दिले आहेत. यामुळे विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक बसण्याची शक्यता आहे.

शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्याची जबाबदारी एखाद्या कंपनीकडे असते. शेतकरी जमिनीत घेतलेल्या पिकांचा विमा उतरवतात. त्यासाठी ठराविक हप्ता भरला जातो, तसेच राज्य आणि केंद्र शासनही आपला वाटा देतात. यामध्ये नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते; पण त्यासाठी काही अटी होत्या. शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते, तसेच चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन माहिती भरली तर शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता नव्हती. यामुळे कंपन्या मालामाल अन् शेतकरी कंगाल, अशी स्थिती होती. परिणामी, या जाचक अटींच्याविरोधात शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर होता; पण नवीन नियमांमुळे याला कुठेतरी ब्रेक बसणार आहे.

....................................

आधी काय होते दोन पर्याय...

पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते. दिनांक, वेळ, नुकसानाची कारणे, प्रकार. सर्व्हे नंबर द्यावा लागत होता. त्याचबरोबर बँक, कृषी किंवा महसूल विभाग, टोल फ्री नंबरवरही माहिती देण्याची सोय होती.

........................................

हे आहेत नवीन सहा पर्याय

- शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शूरन्स ॲपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानाची माहिती स्वत: भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी पंचनाम्यासाठी बांधावर येणार आहेत.

- तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी ऑफलाइन तक्रार करू शकतात.

- नुकसानाची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही करता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज द्यावा लागेल.

- पीक विमा कंपनीच्या मेल आयडीवरही तक्रार करता येणार आहे.

- ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे, त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

.......................................................

अतिवृष्टीने साडेसात कोटींचे नुकसान...

जिल्ह्यात यावर्षीच्या जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. जवळपास ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके बाधित झाली होती. तर अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले.

.........................................................