शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक; नुकसान प्रस्तावासाठी सहा पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

सातारा : नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते; पण याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. कारण, ...

सातारा : नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते; पण याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. कारण, जाचक अटींचा अडथळा असायचा; मात्र आता बळीराजाची त्रासदायक अटीतून सुटका होणार असून, कृषी आयुक्तालयाने प्रस्तावासाठी सहा पर्याय दिले आहेत. यामुळे विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक बसण्याची शक्यता आहे.

शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्याची जबाबदारी एखाद्या कंपनीकडे असते. शेतकरी जमिनीत घेतलेल्या पिकांचा विमा उतरवतात. त्यासाठी ठराविक हप्ता भरला जातो, तसेच राज्य आणि केंद्र शासनही आपला वाटा देतात. यामध्ये नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते; पण त्यासाठी काही अटी होत्या. शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते, तसेच चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन माहिती भरली तर शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता नव्हती. यामुळे कंपन्या मालामाल अन् शेतकरी कंगाल, अशी स्थिती होती. परिणामी, या जाचक अटींच्याविरोधात शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर होता; पण नवीन नियमांमुळे याला कुठेतरी ब्रेक बसणार आहे.

....................................

आधी काय होते दोन पर्याय...

पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते. दिनांक, वेळ, नुकसानाची कारणे, प्रकार. सर्व्हे नंबर द्यावा लागत होता. त्याचबरोबर बँक, कृषी किंवा महसूल विभाग, टोल फ्री नंबरवरही माहिती देण्याची सोय होती.

........................................

हे आहेत नवीन सहा पर्याय

- शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शूरन्स ॲपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानाची माहिती स्वत: भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी पंचनाम्यासाठी बांधावर येणार आहेत.

- तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी ऑफलाइन तक्रार करू शकतात.

- नुकसानाची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही करता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज द्यावा लागेल.

- पीक विमा कंपनीच्या मेल आयडीवरही तक्रार करता येणार आहे.

- ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे, त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

.......................................................

अतिवृष्टीने साडेसात कोटींचे नुकसान...

जिल्ह्यात यावर्षीच्या जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. जवळपास ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके बाधित झाली होती. तर अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले.

.........................................................