शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

बाबाराजे म्हणाले,‘ हवं तर माझे कान धरा!’

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

‘दगड’ विधान मागे : जनतेवर नव्हे तर निवडणुकीत खेळी करणाऱ्यांवर नाराज

सातारा : ‘शहरात मला अपेक्षित मतदान पडले नाही, त्याचे आत्मपरीक्षण आम्ही केले आहे. याबाबत कोणालाही दोष देत बसणार नाही. नागरिकांनी मतपेटीच्या माध्यमातून माझा कान पकडला. हेच काम करताना त्यांनी निवडणूक येईपर्यंत वाट पाहू नये. सातारकरांना माझ्याकडून संयमाची अपेक्षा आहेत. तो मी राखणार आहे. लोकांनी निवडणुकीआधी हवे तर माझा कान पकडावा,’ अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केली.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाराज होत ‘माझे हात दगडाखाली होते, आता दगड माझ्या हातात आहे.’ अशा शब्दात ही नाराजी व्यक्त केली होती. हे विधान मागे घेत त्यांनी आज ‘माझ्याकडून काम करताना चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी मला संधी द्या,’ अशी विनंती जनतेला केली.दरम्यान, खेळ्या करणाऱ्यांना पालिका निवडणुकीत जागा दाखविणार का? या प्रश्नाबाबत त्यांनी निवडणुकीआधी सगळेच समजेल, असेही सूचकपणे सांगितले. नगरपालिकेचे कामकाज करताना माझ्या एकट्याची सत्ता तिथे नाही. दोन्ही आघाड्यांना विश्वासात घेऊन कामे करावी, लागतात, असे सांगत त्यांनी आपला रोष सातारा विकास आघाडीवरही असल्याची जाणीव करुन दिली. आमदार भोसले म्हणाले, ‘काही समस्या राहिल्यानेच लोक नाराज होते. त्यांना माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्यातलाच एक आहे. निवडणूक निकालानंतर मी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती व्यक्त करायला नको होती, अशा भावना माझ्याजवळ अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. सातारा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. येथील बोगदा परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून व्यावसायिक आणि झोपडपट्टीवासीयांना दमदाटी करून हप्ता वसुली, खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा समाजविघातक गुंडप्रवृत्तींची दहशत मोडीत काढून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत.बोगदा परिसरात काही गुंड आणि गुन्हेगारांनी नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही समावेश आहे. दहशत माजवून झोपडपट्टीवासीयांसह छोटे-मोठे व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिकांना धमकावणे, मारहाण करून त्यांच्याकडे खंडणी, हप्त्याची मागणी करणे, अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अशा लोकांच्या कारवायांना प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. पोलीस कारवाई करण्याऐवजी राजकीय दबावाचे कारण पुढे करून अशा गुंडांना अभय देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. भीतीपोटी नागरिक अशा गुंडांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. पोलीस मात्र तक्रार नसल्याचे कारण पुढे करत कारवाई करण्याचे टाळतात.’ (प्रतिनिधी)बोगद्यातील गुंडांचा बंदोबस्त कराबोगदा परिसरातील गुंडगिरीविरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही दंड थोपटले आहेत. दमदाटी, हप्ता वसुली, खंडणीखोरांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या मतदार संघामध्ये असणाऱ्या गुंडगिरीविरोधात रणशिंग फुंकले होते. यानंतर लगेचच शिवेंद्रराजेही गुन्हेगारीविरोधात आक्रमक झाल्याचे दिसले.‘नागरिकांची सुरक्षा आमच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे अशा गुंड आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना कोणीही पाठीशी घालणार नाही, याची जाणीव ठेवून पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करावी,’ असेही ते म्हणाले.