शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

जिल्ह्यात भुईमूग अन् सोयाबीन वगळता इतर तेलवर्गीय पिकांचे प्रमाण अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST

सातारा : बाजारपेठेत दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर वाढत असले तरी, त्या तुलनेत सातारा जिल्ह्यात सोयाबीन आणि भुईमूग वगळता इतर तेलवर्गीय ...

सातारा : बाजारपेठेत दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर वाढत असले तरी, त्या तुलनेत सातारा जिल्ह्यात सोयाबीन आणि भुईमूग वगळता इतर तेलवर्गीय पिकांचे प्रमाण कमी आहे. करडई, सूर्यफूल, तीळ आणि कारळा या पिकांचे क्षेत्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.

आहारात खाद्यतेल महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे या तेलाची मागणी सतत वाढत जाते. पण सद्यस्थितीत तेलाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे तेलवर्गीय पिकांना अधिक महत्त्व येऊ लागले आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता, येथे भुईमूग आणि सोयाबीन हीच तेलवर्गीय पिके अधिक प्रमाणात घेतली जातात. कारण, पाण्याची उपलब्धता असल्याने या पिकांचे क्षेत्र चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तर भुईमूग आणि सोयाबीन पीक हक्काचे समजले जाते. सोयाबीन हे फक्त खरीप हंगामातच घेतले जाते. २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये सोयाबीन क्षेत्रात १३ हजार हेक्टरची वाढ झालेली होती. तसेच सोयाबीन हे पीक फक्त पश्चिम भागापुरतेच मर्यादित न राहता जिल्ह्याच्या माण, खटाव अशा दुष्काळी भागातही घेण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलीच अर्थप्राप्ती होताना दिसून येऊ लागली आहे. त्यामुळे क्षेत्रात वाढ होत आहे.

करडई पीक नावापुरतेच..

जिल्ह्यातील बहुतांशी शेती तुकड्याची आहे. त्यातच पश्चिम भागात मोठी धरणे आहेत. पाण्याची उपलब्धता झालेली आहे. पिकांना पाणी कमी पडत नाही. या तुलनेत पूर्वेकडील भाग दुष्काळी. दोन-तीन वर्षातून दुष्काळी स्थिती निर्माण होते. त्यातच शेतकऱ्यांचा कल नगदी पिके, फळबागांकडे अधिक आहे. त्यामुळे सोयाबीन आणि भुईमूग ही पिके वगळता इतर तेलवर्गीय पिकांकडे कल नाही. जिल्ह्यात शेतकऱ्याने खास करडईचे पीक घेतले, असे उदाहरण दुर्मिळ. त्यामुळे करडई पीक नावापुरतेच असते. दोन वर्षांचा विचार करता, करडई क्षेत्र ५० हेक्टरच्या आत आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात सतत वाढ...

जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. या हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे तीन लाख हेक्टरच्या वर असते, तर यामधील ६० ते ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेतले जाते. दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. तसेच भुईमूग खरीप हंगामात घेण्यात येतो. तसेच पूर्व भागातील शेतकरी रब्बीच्या काळातही हे पीक घेतात. जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पूर्वेकडे अत्यल्प प्रमाण. त्यातच पश्चिम भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वळलेला आहे. उसानंतर सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेतली जातात. त्यामुळे तेलवर्गीय पिकांकडे ओढा खूपच कमी आहे. करडई, कारळा, सूर्यफूल अशी पिके कुठेतरी घेतली जातात. पण, याचे क्षेत्र हे मर्यादित असते.

- रामराव पाटील, शेतकरी

तेलपीक पेरणी क्षेत्र

२०२० २०१९ घट वाढ

[हेक्टरमध्ये)

करडई ४६ ३६ ... १०

सोयाबीन ७३३२९ ६००७५ ...१३२५४

सूर्यफूल १४१ १२९ ... १२

भुईमूग ३३०९३ ३३४९१ ३९८ ...

कारळा ६४७ ६८२ ... ३५