शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

जिल्ह्यात भुईमूग अन् सोयाबीन वगळता इतर तेलवर्गीय पिकांचे प्रमाण अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST

सातारा : बाजारपेठेत दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर वाढत असले तरी, त्या तुलनेत सातारा जिल्ह्यात सोयाबीन आणि भुईमूग वगळता इतर तेलवर्गीय ...

सातारा : बाजारपेठेत दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर वाढत असले तरी, त्या तुलनेत सातारा जिल्ह्यात सोयाबीन आणि भुईमूग वगळता इतर तेलवर्गीय पिकांचे प्रमाण कमी आहे. करडई, सूर्यफूल, तीळ आणि कारळा या पिकांचे क्षेत्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.

आहारात खाद्यतेल महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे या तेलाची मागणी सतत वाढत जाते. पण सद्यस्थितीत तेलाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे तेलवर्गीय पिकांना अधिक महत्त्व येऊ लागले आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता, येथे भुईमूग आणि सोयाबीन हीच तेलवर्गीय पिके अधिक प्रमाणात घेतली जातात. कारण, पाण्याची उपलब्धता असल्याने या पिकांचे क्षेत्र चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तर भुईमूग आणि सोयाबीन पीक हक्काचे समजले जाते. सोयाबीन हे फक्त खरीप हंगामातच घेतले जाते. २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये सोयाबीन क्षेत्रात १३ हजार हेक्टरची वाढ झालेली होती. तसेच सोयाबीन हे पीक फक्त पश्चिम भागापुरतेच मर्यादित न राहता जिल्ह्याच्या माण, खटाव अशा दुष्काळी भागातही घेण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलीच अर्थप्राप्ती होताना दिसून येऊ लागली आहे. त्यामुळे क्षेत्रात वाढ होत आहे.

करडई पीक नावापुरतेच..

जिल्ह्यातील बहुतांशी शेती तुकड्याची आहे. त्यातच पश्चिम भागात मोठी धरणे आहेत. पाण्याची उपलब्धता झालेली आहे. पिकांना पाणी कमी पडत नाही. या तुलनेत पूर्वेकडील भाग दुष्काळी. दोन-तीन वर्षातून दुष्काळी स्थिती निर्माण होते. त्यातच शेतकऱ्यांचा कल नगदी पिके, फळबागांकडे अधिक आहे. त्यामुळे सोयाबीन आणि भुईमूग ही पिके वगळता इतर तेलवर्गीय पिकांकडे कल नाही. जिल्ह्यात शेतकऱ्याने खास करडईचे पीक घेतले, असे उदाहरण दुर्मिळ. त्यामुळे करडई पीक नावापुरतेच असते. दोन वर्षांचा विचार करता, करडई क्षेत्र ५० हेक्टरच्या आत आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात सतत वाढ...

जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. या हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे तीन लाख हेक्टरच्या वर असते, तर यामधील ६० ते ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेतले जाते. दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. तसेच भुईमूग खरीप हंगामात घेण्यात येतो. तसेच पूर्व भागातील शेतकरी रब्बीच्या काळातही हे पीक घेतात. जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पूर्वेकडे अत्यल्प प्रमाण. त्यातच पश्चिम भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वळलेला आहे. उसानंतर सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेतली जातात. त्यामुळे तेलवर्गीय पिकांकडे ओढा खूपच कमी आहे. करडई, कारळा, सूर्यफूल अशी पिके कुठेतरी घेतली जातात. पण, याचे क्षेत्र हे मर्यादित असते.

- रामराव पाटील, शेतकरी

तेलपीक पेरणी क्षेत्र

२०२० २०१९ घट वाढ

[हेक्टरमध्ये)

करडई ४६ ३६ ... १०

सोयाबीन ७३३२९ ६००७५ ...१३२५४

सूर्यफूल १४१ १२९ ... १२

भुईमूग ३३०९३ ३३४९१ ३९८ ...

कारळा ६४७ ६८२ ... ३५