शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटींचा निधी; द्यायचा कुणाला आधी!

By admin | Updated: January 20, 2015 23:34 IST

मावळत्या सरकारने जाता-जाता सर्व आमदारांना २ कोटी रूपयांचा निधी देवू केला़ निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सर्व निधी खर्च करून भूमीपूजने उरकून घेतली

कऱ्हाड : स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून आमदारांना ५० लाख रूपयांचा विशेष निधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच जाहीर केलाय; पण मूळच्या दोन कोटीसह एकूण अडीच कोटी रूपयांच्या आमदार निधीत काय ‘कात’ होणार का? अशीच भावना आमदारांच्यात आहे़ मावळत्या सरकारने जाता-जाता सर्व आमदारांना २ कोटी रूपयांचा निधी देवू केला़ निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सर्व निधी खर्च करून भूमीपूजने उरकून घेतली. चालू वर्षाचे बजेट संपण्यासाठी अडीच माहिने बाकी आहेत. त्यानंतर नवीन निधी मिळणाऱ रिकाम्या हाताने बसलेल्या आमदारांच्या हाती ५० लाख मिळणार असले तरी त्यात कुणाचे समाधान होणार, हा खरा प्रश्न आहे़ मुनगंटीवारांनी देऊ केलेला हा निधी अडीच महिन्यांत म्हणजे मार्चअखेर खर्च करायचा आहे; पण हे नेमके कसे वाटायचे?, कोणात्या गावांना द्यायचे? हा आमदारांपुढे प्रश्न आहे़ विधानसभेच्या ग्रामिण भागात साधारणत: मतदारसंघात १५० वर छोटी-मोठी गावे पाहायला मिळतात़ प्रत्येक आमदाराला वार्षिक २ कोटींचा निधी मतदार संघात देतानाच आमदारांना कसरत करावी लागते़ त्यामुळे हे ५० लाख अडीच महिन्यांसाठी मिळाले असले तरी आमदारांच्या चेहऱ्यावर समाधान मात्र दिसत नाही़ विकासकामे करत असताना आमदारांचा सभागृह, स्मशानभूमी, रस्ते, गटार यावर जास्त भर असतो़ बांधकामातील वाढते दर लक्षात घेतले तर आरसीसी सुमारे ८०० स्क्वेअर फुटांचे सभागृह बांधायचे म्हटले तरी १० लाख रूपये लागतात़ एक किलोमीटरचा चांगला सिमेंट काँक्रीटचा रस्ता करायचा म्हटलं तरी अंदाजे २० लाख रूपये खर्च अपेक्षित आहे़ एक किलोमीटर आरसीसी गटारला २२ ते २३ लाख रूपये खर्च अपेक्षित आहेत. स्मशानभूमीला ५ लाख रूपये पुरत नाहीत़ त्यामुळे कार्यकर्त्यांचे समाधान करताना नेते मेटाकुटीला येत आहेत़ (प्रतिनिधी)दर्जाचं काय ? मार्चअखेर निधी खर्च करायचा असल्याने एखाद्या गावाला कामासाठी निधी देणे, ते काम गडबडीत पूर्ण करून घेणे यामुळे कामाचा दर्जा कसा राहणार, याबाबत साशंकता तर आहेच; पण जवळचे ठेकेदार मात्र खूश आहेत, हे मात्र नक्की़ मतदारसंघातील मोठे रस्ते, सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जातात. परंतु, गावांतर्गत रस्त्यांसाठी आमदार निधीचाच वापर करावा लागतो. सध्या एक किलोमीटरचा डांबरी रस्ता करायचा म्हटला तरी पंधरा ते वीस लाख रुपये लागतात. मग तुम्हीच सांगा, आमचा आमदार निधी आम्ही कुठं अन् कसा पुरवायचा?- शिवेंद्रसिंहराजे भोसले- आमदार, सातारामाण-खटाव विधानसभा मतदारसंघातील दोन टोकाच्या गावातलं अंतर एकशे दहा किलोमीटर आहे. त्यात दुष्काळी अन् मागासलेला भाग. प्रत्येक क्षेत्रासाठी त्या-त्या समस्यांचे निकष लावूनच आमदार निधी मिळायला हवा. शेजारच्या ऊस पट्ट्यात अन् पाण्यासाठी तडफडणाऱ्या दुष्काळी भागातही तेवढाच निधी, हे अत्यंत अयोग्य आहे.- जयकुमार गोरे-आमदार, माण-खटावमाझ्या मतदारसंघात तीन तालुके अन् तीन मोठ्या नगरपालिका आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल साडेतीनशे गावे आहेत. अडीच कोटीचा निधी यात विभागला तरी प्रत्येक गावाला केवळ साठ-सत्तर हजार रुपये मिळू शकतात. मग कसं शक्य आहे, प्रत्येक गावाचा विकास साधणं ?- मकरंद पाटील=आमदार, वाई