शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

परळी खोऱ्यात १२० हातपंप नादुरुस्त

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

नागरिक हतबल: ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची धास्ती

परळी : शासन एकीकडे पाणीटंचाई निवारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे शासनाने लाखो रुपये खर्च करून बसविलेले हातपंप नादुरुस्त होऊन पडले आहेत.नवीन विंधन विहिरींना खर्च करण्यापेक्षा या हातपंपाची दुरुस्ती केल्यास अनेक वाड्यांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटू शकेल. एकट्या परळी, ठोसेघर भागात सुमारे १२० हातपंप नादुरुस्त स्थितीत असून, त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कुणाची? याचीच माहिती ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला नसल्याचे दिसून येते. दहा-बारा वर्षांपूर्वी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्यात आले. सुरुवातीला दोन-तीन वर्षे हे हातपंप व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर देखभाल दुरुस्ती होत नसल्याने हे पंप बंद पडले आहेत. परळी खोऱ्यातील ठोसेघर, लावंघर, करंजे, पाटेघर, कारी, निढळ, पोगरवाडी आदी भागांतील सुमारे १२० हातपंप गेले कित्येक वर्षे नादुरुस्त स्थितीत उभे आहेत. अनेक वर्षे विनावापर राहिल्याने ते गंजून गेले आहेत. त्या हातपंपाची मालकी कुणाची व दुरुस्तीची जबाबदारी कुणाची याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे हातपंपाची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. शासनच अशाप्रकारे उदासीन असेल तर हातपंपाची दुरुस्ती होणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)गावातील काही हातपंप नादुरुस्त आहेत. वारंवार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या; परंतु यावर त्यांनी कोणतीच हालचाल केली नसून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.-राकेश माने, डबेवाडी ग्रामस्थ