शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

परळी खोऱ्यात १२० हातपंप नादुरुस्त

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

नागरिक हतबल: ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची धास्ती

परळी : शासन एकीकडे पाणीटंचाई निवारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे शासनाने लाखो रुपये खर्च करून बसविलेले हातपंप नादुरुस्त होऊन पडले आहेत.नवीन विंधन विहिरींना खर्च करण्यापेक्षा या हातपंपाची दुरुस्ती केल्यास अनेक वाड्यांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटू शकेल. एकट्या परळी, ठोसेघर भागात सुमारे १२० हातपंप नादुरुस्त स्थितीत असून, त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कुणाची? याचीच माहिती ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला नसल्याचे दिसून येते. दहा-बारा वर्षांपूर्वी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्यात आले. सुरुवातीला दोन-तीन वर्षे हे हातपंप व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर देखभाल दुरुस्ती होत नसल्याने हे पंप बंद पडले आहेत. परळी खोऱ्यातील ठोसेघर, लावंघर, करंजे, पाटेघर, कारी, निढळ, पोगरवाडी आदी भागांतील सुमारे १२० हातपंप गेले कित्येक वर्षे नादुरुस्त स्थितीत उभे आहेत. अनेक वर्षे विनावापर राहिल्याने ते गंजून गेले आहेत. त्या हातपंपाची मालकी कुणाची व दुरुस्तीची जबाबदारी कुणाची याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे हातपंपाची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. शासनच अशाप्रकारे उदासीन असेल तर हातपंपाची दुरुस्ती होणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)गावातील काही हातपंप नादुरुस्त आहेत. वारंवार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या; परंतु यावर त्यांनी कोणतीच हालचाल केली नसून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.-राकेश माने, डबेवाडी ग्रामस्थ