शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

परळी खोऱ्यात १२० हातपंप नादुरुस्त

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

नागरिक हतबल: ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची धास्ती

परळी : शासन एकीकडे पाणीटंचाई निवारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे शासनाने लाखो रुपये खर्च करून बसविलेले हातपंप नादुरुस्त होऊन पडले आहेत.नवीन विंधन विहिरींना खर्च करण्यापेक्षा या हातपंपाची दुरुस्ती केल्यास अनेक वाड्यांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटू शकेल. एकट्या परळी, ठोसेघर भागात सुमारे १२० हातपंप नादुरुस्त स्थितीत असून, त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कुणाची? याचीच माहिती ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला नसल्याचे दिसून येते. दहा-बारा वर्षांपूर्वी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्यात आले. सुरुवातीला दोन-तीन वर्षे हे हातपंप व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर देखभाल दुरुस्ती होत नसल्याने हे पंप बंद पडले आहेत. परळी खोऱ्यातील ठोसेघर, लावंघर, करंजे, पाटेघर, कारी, निढळ, पोगरवाडी आदी भागांतील सुमारे १२० हातपंप गेले कित्येक वर्षे नादुरुस्त स्थितीत उभे आहेत. अनेक वर्षे विनावापर राहिल्याने ते गंजून गेले आहेत. त्या हातपंपाची मालकी कुणाची व दुरुस्तीची जबाबदारी कुणाची याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे हातपंपाची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. शासनच अशाप्रकारे उदासीन असेल तर हातपंपाची दुरुस्ती होणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)गावातील काही हातपंप नादुरुस्त आहेत. वारंवार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या; परंतु यावर त्यांनी कोणतीच हालचाल केली नसून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.-राकेश माने, डबेवाडी ग्रामस्थ