शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

यंदा आटपाडीचाच आमदार होणे गरजेचे

By admin | Updated: August 25, 2014 22:09 IST

जयंत पाटील : दिघंचीतील कार्यक्रमात प्रतिपादन

दिघंची : आजपर्यंत आटपाडी तालुक्यावर राजकीयदृष्ट्या अन्याय झाला असून, आता वेळ आली आहे तालुक्यातील जनतेने एकसंध होण्याची. यंदा आमदार आटपाडी तालुक्याचाच झाला पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.बाबासाहेब देशमुख बँकेच्या दिघंची (ता. आटपाडी) शाखेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज (सोमवार) पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.पाटील म्हणाले की, परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने १९९५ मध्ये टेंभू पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजप, शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला व ही योजना मंजूर करून घेतली. त्यामुळे या योजनेचे खरे जनक राजेंद्रअण्णा देशमुखच आहेत. आटपाडीने आतापर्यंत खूपच सोसले आहे. मात्र या तालुक्याने आपला स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही. राष्ट्रवादी पक्षाला भक्कम ताकद दिली. आज संघर्षाची फळे चाखण्याची वेळ आली आहे. मतभेद बाजूला ठेवून एकसंधपणे अमरसिंह देशमुख यांना बळ द्यावे. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला टाळी दिली. पक्षाचे तिकीट नसेल, तर अमरसिंह देशमुख यांची अपक्ष उमेदवारी निश्चित आहे. टेंभू व उरमोडी धरणाचे पाणी राजेवाडी तलावामध्ये सोडावे. त्यामुळे दिघंची परिसरामधील शेतीच्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल.अमरसिंह देशमुख म्हणाले की, १९९० मध्ये तुम्हाला मदत केली. तेव्हा आमदार असतानाही माघार घेऊन तुम्हाला तीनवेळा मदत केली. आज आम्हाला मदत करण्याच्या वेळी तुम्ही आम्हाला फसविले. यावेळी गडी बदललाय. दोघांची मोळी बांधल्याशिवाय सोडणार नाही. कुस्ती निकालीच करणार. टेंभू पाणी योजना हा विषय संपला आहे. आता तुमचे काय? अशी टीका त्यांनी अनिल बाबर यांचा नामोल्लेख न करता केली.बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, माणगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष भगवानअप्पा मोरे, पं. स. सभापती अलकाताई भोसले, उपसभापती बळवंत मोरे, सरपंच पांडुरंग शिंदे, बँकेचे उपाध्यक्ष जयवंत देशपांडे, व्यवस्थापक भगवंत आडमुठे, बँकेचे कर्मचारी, हर्षवर्धन देशमुख, अनिल पाठक, भाऊसाहेब गायकवाड, भागवत माळी, नारायण चवरे, विष्णुपंत चव्हाण उपस्थित होते. संचालक सावता पुसावळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)